शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या दरात चार महिन्यात क्विंटलमागे ९५३ रुपयांनी वाढ

By admin | Updated: March 31, 2016 02:56 IST

चालू वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांच्या व ऊसउत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या साखरेला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. या महिन्यात २५ दिवसांत तब्बल २८० रुपयांची

सोमेश्वरनगर : चालू वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांच्या व ऊसउत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या साखरेला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. या महिन्यात २५ दिवसांत तब्बल २८० रुपयांची उसळी साखरेने घेतली आहे. मागील ४ महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ९५३ रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे वाढलेले दर पाहता, आता साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी याचा चांगलाच हातभार लागेल. बुधवारी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तशिरोळ या कारखान्याच्या साखरेला ३४७८ रूपये तर जिल्ह्यात विघ्नहर कारगान्याच्या साखरेला ३४१0 रूपये सर्वाधिक दर मिळाला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. १,९०० रुपये एवढ्या नीचांकीवर आलेली साखर आता ३,४७८ रुपयांवर गेली आहे. गेल्या ८ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २७८ रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर ५ महिन्यांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. दर वाढण्याअगोदर साखर कारखाने आर्थिक कचाट्यात सापडले होते. शासनाने ठरवून दिलेली एफआरपीसुद्धा देण्याइतपत परिस्थिती नव्हती. एफआरपी मिळणार की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत ऊसउत्पादक सापडले होते. मात्र, नाव्हेंबर महिन्यापासून जसजसे साखरेचे दर वाढू लागले, तशा एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एफआरपीचा ८० : २० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्के प्रमाणे सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केलेले आहेत. आता उर्वरित २० टक्क्यांप्रमाणे ३०० ते ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. या वाढलेल्या साखरेमुळे उर्वरित एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना कोणतीही अडचणी येणार नाही. सध्या साखर जरी वाढली असली, तरी एफआरपीपेक्षा जादा मिळणाऱ्या पैशांचा फायदा ऊसउत्पादकांना जरी मिळणार नसला, तरी त्याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल. अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखानदारी कर्जाच्या खाईत लोटली गेली होती. अनेक कारखान्यांवर करोडो रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे अनेक कारखाने बंदही पडले आहेत आणि जे चालू आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. मात्र, आता साखर वाढल्याने शेतकऱ्यांना कारखाने एफआरपीचे पैसे अदा करून उर्वरित पैसे हे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे साखरेचे अशीच परिस्थिती राहिली, तर कारखाने लवकरच कर्जमुक्त होऊन स्वभांडवली होतील. एफआरपी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारपुढे हात पसरावे लागत होते. (वार्ताहर) १ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरेच्या पोत्यावर २,२७० रुपये मूल्यांकन मिळत होते. ते तब्बल ६०५ रुपयांनी वाढल्याने सध्या २,८७५ रुपये मूल्यांकन मिळत आहे. यामध्ये काल पुन्हा साखर वाढल्याने मूल्यांकनही वाढणार आहे. ज्या पद्धतीने साखरेच्या दराचा आलेख वाढत गेला आहे, त्याप्रमाणे राज्य बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन वाढवून दिले आहे. काल पुन्हा साखर वाढली आहे. ८५ टक्क्यांच्या नियमानुसार साखरेचे मूल्यांकन देण्यात येईल. - रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बँक