शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

साखरेच्या दरात चार महिन्यात क्विंटलमागे ९५३ रुपयांनी वाढ

By admin | Updated: March 31, 2016 02:56 IST

चालू वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांच्या व ऊसउत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या साखरेला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. या महिन्यात २५ दिवसांत तब्बल २८० रुपयांची

सोमेश्वरनगर : चालू वर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांच्या व ऊसउत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या साखरेला सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. या महिन्यात २५ दिवसांत तब्बल २८० रुपयांची उसळी साखरेने घेतली आहे. मागील ४ महिन्यांत साखरेची क्विंटलमागे तब्बल ९५३ रुपयांची वाढ झाली आहे. साखरेचे वाढलेले दर पाहता, आता साखर कारखान्यांना एफआरपी देण्यासाठी याचा चांगलाच हातभार लागेल. बुधवारी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दत्तशिरोळ या कारखान्याच्या साखरेला ३४७८ रूपये तर जिल्ह्यात विघ्नहर कारगान्याच्या साखरेला ३४१0 रूपये सर्वाधिक दर मिळाला. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. १,९०० रुपये एवढ्या नीचांकीवर आलेली साखर आता ३,४७८ रुपयांवर गेली आहे. गेल्या ८ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २७८ रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल. साखरेचे दर ५ महिन्यांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. दर वाढण्याअगोदर साखर कारखाने आर्थिक कचाट्यात सापडले होते. शासनाने ठरवून दिलेली एफआरपीसुद्धा देण्याइतपत परिस्थिती नव्हती. एफआरपी मिळणार की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत ऊसउत्पादक सापडले होते. मात्र, नाव्हेंबर महिन्यापासून जसजसे साखरेचे दर वाढू लागले, तशा एफआरपी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्य सरकार व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात एफआरपीचा ८० : २० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्के प्रमाणे सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे अदा केलेले आहेत. आता उर्वरित २० टक्क्यांप्रमाणे ३०० ते ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. या वाढलेल्या साखरेमुळे उर्वरित एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना कोणतीही अडचणी येणार नाही. सध्या साखर जरी वाढली असली, तरी एफआरपीपेक्षा जादा मिळणाऱ्या पैशांचा फायदा ऊसउत्पादकांना जरी मिळणार नसला, तरी त्याचा अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल. अनेक वर्षांपासून राज्यातील साखर कारखानदारी कर्जाच्या खाईत लोटली गेली होती. अनेक कारखान्यांवर करोडो रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे अनेक कारखाने बंदही पडले आहेत आणि जे चालू आहेत, त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. मात्र, आता साखर वाढल्याने शेतकऱ्यांना कारखाने एफआरपीचे पैसे अदा करून उर्वरित पैसे हे बँकांचे कर्ज फेडण्यासाठी उपयोगी पडतील. त्यामुळे साखरेचे अशीच परिस्थिती राहिली, तर कारखाने लवकरच कर्जमुक्त होऊन स्वभांडवली होतील. एफआरपी अदा करण्यासाठी साखर कारखान्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारपुढे हात पसरावे लागत होते. (वार्ताहर) १ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होती. गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे. गेल्या वर्षी हंगाम सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरेच्या पोत्यावर २,२७० रुपये मूल्यांकन मिळत होते. ते तब्बल ६०५ रुपयांनी वाढल्याने सध्या २,८७५ रुपये मूल्यांकन मिळत आहे. यामध्ये काल पुन्हा साखर वाढल्याने मूल्यांकनही वाढणार आहे. ज्या पद्धतीने साखरेच्या दराचा आलेख वाढत गेला आहे, त्याप्रमाणे राज्य बँकेच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने साखरेचे मूल्यांकन वाढवून दिले आहे. काल पुन्हा साखर वाढली आहे. ८५ टक्क्यांच्या नियमानुसार साखरेचे मूल्यांकन देण्यात येईल. - रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बँक