शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

ऊसतोडणी मजुरांना अतिसार

By admin | Updated: December 1, 2015 03:33 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. २५ मजुरांवर पारगाव व मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ५०० मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा वैद्यकीय सूत्रांनी केला आहे.आंबेगाव तालुक्यातील या कारखान्याच्या परिसरात ऊसतोडणी मजुरांची तात्पुरती वस्ती आहे. सध्या हंगाम सुरू असल्याने पाचशे ते सहाशे कामगार या भागात सहकुटुंब आहेत. जवळूनच वाहणाऱ्या घोड नदीचे पाणी पाईपलाईनने आणून व तेथे असलेल्या बोअरवेलचे पाणी हे मजूर वापरतात. कारखान्याच्या परिसरात घाण असते. अवकाळी पावसाचे घाण पाणी बोअरमध्ये झिरपून मजुरांना त्रास झाला असावा, असा अंदाज आहे. काल सायंकाळी पाचनंतर काही ऊसतोडणी मजुरांना जुलाब-उलट्या होऊ लागल्या. त्रास होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ही माहिती समजल्यावर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक बोलावले.दिवसभर उलट्या-जुलाब झालेल्या मजुरांपैकी ज्यांची स्थिती गंभीर होती, त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सने धामणी व मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, सलाईन लावून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली. काही जणांना घरी सोडण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी बहुतांश मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कारखाना परिसरातील वस्तीत जाऊन सर्वच मजुरांना प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधे देण्यात आली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजुरांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी भेट देऊन मजुरांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊनही या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली; त्यामुळे रुग्णांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)शुद्धीकरण प्रकल्प सुरू करूपिण्याचे पाणी दूषित प्यायल्यामुळे जुलाब-उलट्या झाल्या आहेत. ऊसतोडणी मजूर आणि ग्रामस्थ, ऊसउत्पादक शेतकरी यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कारखान्याने सुमारे २० ते २२ लाख रुपये खर्च करून शुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प कार्यान्वित केलेला नव्हता. येत्या दोन दिवसांत पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती बेंडे, वळसे-पाटील यांनी दिली.