शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

ऊसतोडणी मजुरांना अतिसार

By admin | Updated: December 1, 2015 03:33 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. २५ मजुरांवर पारगाव व मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ५०० मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा वैद्यकीय सूत्रांनी केला आहे.आंबेगाव तालुक्यातील या कारखान्याच्या परिसरात ऊसतोडणी मजुरांची तात्पुरती वस्ती आहे. सध्या हंगाम सुरू असल्याने पाचशे ते सहाशे कामगार या भागात सहकुटुंब आहेत. जवळूनच वाहणाऱ्या घोड नदीचे पाणी पाईपलाईनने आणून व तेथे असलेल्या बोअरवेलचे पाणी हे मजूर वापरतात. कारखान्याच्या परिसरात घाण असते. अवकाळी पावसाचे घाण पाणी बोअरमध्ये झिरपून मजुरांना त्रास झाला असावा, असा अंदाज आहे. काल सायंकाळी पाचनंतर काही ऊसतोडणी मजुरांना जुलाब-उलट्या होऊ लागल्या. त्रास होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ही माहिती समजल्यावर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक बोलावले.दिवसभर उलट्या-जुलाब झालेल्या मजुरांपैकी ज्यांची स्थिती गंभीर होती, त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सने धामणी व मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, सलाईन लावून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली. काही जणांना घरी सोडण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी बहुतांश मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कारखाना परिसरातील वस्तीत जाऊन सर्वच मजुरांना प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधे देण्यात आली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजुरांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी भेट देऊन मजुरांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊनही या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली; त्यामुळे रुग्णांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)शुद्धीकरण प्रकल्प सुरू करूपिण्याचे पाणी दूषित प्यायल्यामुळे जुलाब-उलट्या झाल्या आहेत. ऊसतोडणी मजूर आणि ग्रामस्थ, ऊसउत्पादक शेतकरी यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कारखान्याने सुमारे २० ते २२ लाख रुपये खर्च करून शुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प कार्यान्वित केलेला नव्हता. येत्या दोन दिवसांत पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती बेंडे, वळसे-पाटील यांनी दिली.