शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

अशी ही ‘तऱ्हा’: उत्पादनखर्च सोडाच, बाजारात पोहोचविण्याचाच खर्चही निघत नाही

By admin | Updated: May 29, 2017 02:16 IST

बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे फेकून दिला आहे. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा भरण्याचा आणि मार्केटपर्यंत पोहोचविण्याचाच खर्च निघत नाही. मग करायचे काय, असा सवाल उत्पादक करीत आहेत. सलग दोन वर्षे कांद्याची ही अशी तऱ्हा असल्याने शेतीच करायची की नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे.करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी या गावांत सध्या ही परिस्थिती आहे. कांदा पिकविणेच मुळात फार खर्चिक आहे. या पिकासाठी पूर्वमशागत, रान तयार करणे, बियाणे - रोपे, लागवड, खुरपणी, तणनाशक, कीटकनाशक, खते, वीजबिल, पाण्याच्या पाळ्या, काढणी, बारदाना, वाहतूक, अडत, हमाली इ. कामासाठी एक एकर कांदा पिकविण्यासाठी किमान ५० ते ६० हजारांचा खर्च येतो.आज चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रतिकिलोग्रॅम चार ते सात रुपये बाजारभाव आहे. एवढ्या कमी भावामध्ये उत्पादन खर्चच काय साधी मजुरीही भागत नाही. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजाने छातीवर दगड ठेवून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी उभे कांदापिक ट्रॅक्टरने नांगरत आहेत. कोणी पेटवून देतोय, तर कोणी त्यावर शेळ्या, मेंढ्या, जनावरे सोडतो आहे.एकरी फक्त दोनशे गोण्याच याशिवाय तालुक्यात झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक पातळीवर मजुरांची मोठी टंचाई असते. याशिवाय हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पादनक्षमता घटली आहे. आज एकरी फक्त दोनशे गोण्याच्या आसपास उत्पादन निघते. त्यात गोलटी, चिंगळी, जोड अशा कमी प्रतीच्या कांद्याचा समावेश असतो.हमीभाव द्या!गेल्या दोन वर्षांपासून ही अवस्था आहे. त्यामुळे कांदापिकास हमीभाव मिळावा, बारदाना व वाहतूकखर्च वाचवावा, विक्रीचे नियोजन असावे, वर्षभर कांदा निर्यात चालू असावी. तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला तरच शेती आणि शेतकरी जगू शकेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.२०० गोणी कांदा काढून तयार आहे. बाजाराअभावी सर्व कांदा शेतातच पडून आहे. - बाळासाहेब जगदाळे, शेतकरी करडेगतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांदा वखारीत पडून आहे. मातीमोल भावाने तरी कसा विकावा ?- अनिल पवार, शेतकरी चिंचणीकांद्याचा उत्पादनखर्चच भागत नाही. ५० गोणींची पट्टी मिळाली फक्त दोन हजार रुपये. कांदा न पिकवलेला बरा -खंडू माने,शेतकरी शिंदोडी