शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही ‘तऱ्हा’: उत्पादनखर्च सोडाच, बाजारात पोहोचविण्याचाच खर्चही निघत नाही

By admin | Updated: May 29, 2017 02:16 IST

बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे फेकून दिला आहे. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा भरण्याचा आणि मार्केटपर्यंत पोहोचविण्याचाच खर्च निघत नाही. मग करायचे काय, असा सवाल उत्पादक करीत आहेत. सलग दोन वर्षे कांद्याची ही अशी तऱ्हा असल्याने शेतीच करायची की नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे.करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी या गावांत सध्या ही परिस्थिती आहे. कांदा पिकविणेच मुळात फार खर्चिक आहे. या पिकासाठी पूर्वमशागत, रान तयार करणे, बियाणे - रोपे, लागवड, खुरपणी, तणनाशक, कीटकनाशक, खते, वीजबिल, पाण्याच्या पाळ्या, काढणी, बारदाना, वाहतूक, अडत, हमाली इ. कामासाठी एक एकर कांदा पिकविण्यासाठी किमान ५० ते ६० हजारांचा खर्च येतो.आज चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रतिकिलोग्रॅम चार ते सात रुपये बाजारभाव आहे. एवढ्या कमी भावामध्ये उत्पादन खर्चच काय साधी मजुरीही भागत नाही. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजाने छातीवर दगड ठेवून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी उभे कांदापिक ट्रॅक्टरने नांगरत आहेत. कोणी पेटवून देतोय, तर कोणी त्यावर शेळ्या, मेंढ्या, जनावरे सोडतो आहे.एकरी फक्त दोनशे गोण्याच याशिवाय तालुक्यात झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक पातळीवर मजुरांची मोठी टंचाई असते. याशिवाय हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पादनक्षमता घटली आहे. आज एकरी फक्त दोनशे गोण्याच्या आसपास उत्पादन निघते. त्यात गोलटी, चिंगळी, जोड अशा कमी प्रतीच्या कांद्याचा समावेश असतो.हमीभाव द्या!गेल्या दोन वर्षांपासून ही अवस्था आहे. त्यामुळे कांदापिकास हमीभाव मिळावा, बारदाना व वाहतूकखर्च वाचवावा, विक्रीचे नियोजन असावे, वर्षभर कांदा निर्यात चालू असावी. तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला तरच शेती आणि शेतकरी जगू शकेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.२०० गोणी कांदा काढून तयार आहे. बाजाराअभावी सर्व कांदा शेतातच पडून आहे. - बाळासाहेब जगदाळे, शेतकरी करडेगतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांदा वखारीत पडून आहे. मातीमोल भावाने तरी कसा विकावा ?- अनिल पवार, शेतकरी चिंचणीकांद्याचा उत्पादनखर्चच भागत नाही. ५० गोणींची पट्टी मिळाली फक्त दोन हजार रुपये. कांदा न पिकवलेला बरा -खंडू माने,शेतकरी शिंदोडी