शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अशी ही ‘तऱ्हा’: उत्पादनखर्च सोडाच, बाजारात पोहोचविण्याचाच खर्चही निघत नाही

By admin | Updated: May 29, 2017 02:16 IST

बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनिमोणे : बाजारभावाअभावी कांदा शेतकऱ्यांना रडवत आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे परिसरात व कांदा शेतात गाडण्याची अथवा जनावरांपुढे फेकून दिला आहे. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा भरण्याचा आणि मार्केटपर्यंत पोहोचविण्याचाच खर्च निघत नाही. मग करायचे काय, असा सवाल उत्पादक करीत आहेत. सलग दोन वर्षे कांद्याची ही अशी तऱ्हा असल्याने शेतीच करायची की नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे.करडे, आंबळे, चव्हाणवाडी, लंघेवाडी, मोटेवाडी, गुनाट, शिंदोडी, चिंचणी, निर्वी या गावांत सध्या ही परिस्थिती आहे. कांदा पिकविणेच मुळात फार खर्चिक आहे. या पिकासाठी पूर्वमशागत, रान तयार करणे, बियाणे - रोपे, लागवड, खुरपणी, तणनाशक, कीटकनाशक, खते, वीजबिल, पाण्याच्या पाळ्या, काढणी, बारदाना, वाहतूक, अडत, हमाली इ. कामासाठी एक एकर कांदा पिकविण्यासाठी किमान ५० ते ६० हजारांचा खर्च येतो.आज चांगल्या प्रतीच्या कांद्यास प्रतिकिलोग्रॅम चार ते सात रुपये बाजारभाव आहे. एवढ्या कमी भावामध्ये उत्पादन खर्चच काय साधी मजुरीही भागत नाही. त्यामुळे काही शेतकरी नाईलाजाने छातीवर दगड ठेवून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी उभे कांदापिक ट्रॅक्टरने नांगरत आहेत. कोणी पेटवून देतोय, तर कोणी त्यावर शेळ्या, मेंढ्या, जनावरे सोडतो आहे.एकरी फक्त दोनशे गोण्याच याशिवाय तालुक्यात झालेल्या औद्योगिक वसाहतीमुळे स्थानिक पातळीवर मजुरांची मोठी टंचाई असते. याशिवाय हवामानामध्ये होत असलेल्या बदलामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे अलीकडच्या काळात उत्पादनक्षमता घटली आहे. आज एकरी फक्त दोनशे गोण्याच्या आसपास उत्पादन निघते. त्यात गोलटी, चिंगळी, जोड अशा कमी प्रतीच्या कांद्याचा समावेश असतो.हमीभाव द्या!गेल्या दोन वर्षांपासून ही अवस्था आहे. त्यामुळे कांदापिकास हमीभाव मिळावा, बारदाना व वाहतूकखर्च वाचवावा, विक्रीचे नियोजन असावे, वर्षभर कांदा निर्यात चालू असावी. तसेच शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला तरच शेती आणि शेतकरी जगू शकेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.२०० गोणी कांदा काढून तयार आहे. बाजाराअभावी सर्व कांदा शेतातच पडून आहे. - बाळासाहेब जगदाळे, शेतकरी करडेगतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांदा वखारीत पडून आहे. मातीमोल भावाने तरी कसा विकावा ?- अनिल पवार, शेतकरी चिंचणीकांद्याचा उत्पादनखर्चच भागत नाही. ५० गोणींची पट्टी मिळाली फक्त दोन हजार रुपये. कांदा न पिकवलेला बरा -खंडू माने,शेतकरी शिंदोडी