शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

संघर्षाला यश, मात्र असमाधानीच

By admin | Updated: August 7, 2016 04:26 IST

शहराला रोज पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरही महापौर प्रशांत जगताप यांनी त्याबद्दल असमाधानी असल्याचे म्हटले आहे. वाढत्या दबावामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना

पुणे : शहराला रोज पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतरही महापौर प्रशांत जगताप यांनी त्याबद्दल असमाधानी असल्याचे म्हटले आहे. वाढत्या दबावामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांना मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला व त्यातून त्यांनी पुण्याच्या रोजच्या पाण्याच्या कोट्यात कपात केलीच, असे महापौरांचे म्हणणे आहे. हक्काचे पाणी मिळावे यासाठी आता पुणेकरांनीच आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पाण्यासंबंधीची बैठक झाल्यानंतर लगेचच महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली. मागील ३ महिने महापौर या नात्याने पुण्याच्या पाण्यासाठी पालकमंत्री व पाटबंधारे विभाग यांच्याबरोबर संघर्ष केला. त्यात भारतीय जनता पक्ष वगळता सर्व जण सहभागी झाले. वाढत्या दबावामुळे अखेर पालकमंत्री बापट यांनी घाईघाईत कालवा समितीची बैठक आयोजित केली. त्यात त्यांनी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र पुण्यासाठीच्या पाण्याच्या कोट्यात कपात केली. मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला असल्यानेच त्यांनी पुणेकरांवर हा अन्याय केला, असा आरोप महापौर जगताप यांनी केला. जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीकपात करण्याची कोणतीही आवश्यकता नाही, अशीच भूमिका काही स्वयंसेवी संस्था, कार्यकर्त्यांनीही व्यक्त केली होती. शहराची पाण्याची रोजची गरज १२.५० एमएलडी धरणांमध्ये २६.५० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या ४ दिवसांत पुणेकरांना ६ महिने पुरेल इतके पाणी नदीत सोडले गेले. पावसाळ्याचे आणखी २ महिने शिल्लक आहेत. पुणे शहराची पाण्याची रोजची गरज १२.५० एमएलडी आहे. हे माहिती असूनही पालकमंत्र्यांनी पुण्याला रोज ११. ५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोध केल्यानंतर १२ एमएलडी पाणी देण्याचे जाहीर केले. त्यांची ही भूमिका पुणेकरांच्या विरोधात असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. दररोज १२.५० एमएलडी पाणी मिळणे हा पुणेकरांचा हक्क आहे व तोच डावलला जात आहे. आपण तर त्याविरोधात कायम आवाज उठविणारच आहोत, पण पुणेकरांनीही आता या निर्णयाला विरोध करावा, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले.