शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बाजार समितीवर गुन्हा दाखल करा; शहर स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:46 IST

दारे-खिडक्या तुडलेल्या... पाण्याची सोय नाही... प्रचंड अस्वच्छता... असह्य दुर्गंधी अशी स्थिती बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाची झाली आहे. यामुळे येथील कामगार व येणा-या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बाजार समितीला वारंवार सांगूनदेखील यामध्ये दुरुस्ती झालेली नाही.

पुणे : दारे-खिडक्या तुडलेल्या... पाण्याची सोय नाही... प्रचंड अस्वच्छता... असह्य दुर्गंधी अशी स्थिती बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाची झाली आहे. यामुळे येथील कामगार व येणाºया ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बाजार समितीला वारंवार सांगूनदेखील यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणातील पुणे शहर स्वच्छता मानांकनावर मोठा परिणाम होत असून, बाजार समितीवर तातडीने गुन्हा दाखल करा, असे थेट आदेशच महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाल दिले आहेत.गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने भाजीपाला व फळ बाजारामध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर स्वच्छ न केल्याने येथे देखील प्रचंड दुर्गंधी येत असते. रस्त्यांच्या कडेला बसलेले किरकोळ विके्रतेदेखील प्रचंड घाण करत असल्याने परिसरात नेहमीच कचºयाचे साम्राज्य असते. याबाबत आडते असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.महापालिकेकडे तक्रारीनंतर महापौरांचे आदेशफुलबाजार, फळे व भाजीपाला बाजारात एकूण १३ ते १४ स्वच्छतागृहे आहेत़ त्यातील ७ ते ८ स्वच्छतागृहांचा ठेका हा ठेकेदारांना दिला आहे. मात्र सर्वच स्वच्छतागृहांमध्ये अपुºया सोयी व दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती केवळ बघ्याचीच भूमिका घेणार का? असा सवालही कामगार युनियनचे कुडले आणि नांगरे यांनी उपस्थित केला होता. बाजार समितीकडे १३० स्वच्छता कर्मचारी आहेत, त्यातील ६० कायमस्वरूपी आहेत, तर ७० कर्मचारी हे ठेकेदारी आणि रोजंदारीवर असतानादेखील ही दुरवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याबाबत महापालिकेकडेदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. स्वच्छतागृहे व लगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी कळवूनदेखील काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर बाजार समितीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे