शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुभाषचंद्र बोस बोस यांनी इंग्रज सत्तेचा बीमोड केला : संभाजी नाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ...

गराडे:सुभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कायमच अग्रणी राहिले. 'भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य' हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला.सुभाषबाबूंची जयहिंद ही सिंहगर्जना भारताच्या कानाकोप-यात घुमली.आझाद हिंद सेनेची स्थापना करुन इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले..नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज सत्तेचा बिमोड केला असे प्रतिपादन वीर नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष संभाजी नाटकर यांनी केली.

भिवरी येथील वीर नेताजी तरुण मंडळ व वीर नेताजी क्रिडा मंडळ यांच्यावतीने सुभाषचंद्र बोस यांची १२४ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी किल्ले पुरंदर वरून वीर नेताजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुभाषज्योत आणली.सुभाषज्योत मिरवणूक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी श्री.नाटकर बोलत होते.

यावेळी धनंजय चौधरी,नामदेव ढवळे,रामदास कटके , शहाजी लोणकर ,दत्ताञय ताम्हाणे ,जगन्नाथ कटके,म्हस्कू दळवी, सखाराम कटके, भाऊसाहेब कटके, बाळासाहेब कटके, सुहास कटके ,अशोक जगदाळे , राहुल कटके ,सुभाष लोणकर,आप्पासाहेब सावंत, किरण कटके, गौतम बागमार ,ललितकुमार मानकर , मोहन कटके,एस.पी.दळवी,नानासाहेब येळवंडे आदीसह कार्यकर्ते ,भिवरीकर ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांनी भिवरी येथे येवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृती चिरंतन टिकून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा व समाज संघटित होवून समाजसुधारणा व्हावी या उद्देशाने तत्कालीन पदाधिका-यांनी १९६८ साली वीर नेताजी मंडळाची स्थापना केली.तेव्हापासून आजपर्यंत त्या उद्देशाप्रमाणे अखंडीतपणे सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असल्याचे माऊली दळवी सांगितले. प्रास्तविक बाबाजी घिसरे यांनी केले.सुञसंचालन माऊली घारे यांनी केले.आभार अभिजीत दळवी यांनी मानले.

भिवरी (ता.पुरंदर ) येथे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी संभाजी नाटकर व वीर नेताजी मंडळाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते .