शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

‘त्या’ विद्यार्थ्यांचा अभ्यास अपुराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 06:17 IST

लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही

पुणे : लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, एकूण ९२ हजार ३५० प्रवेश क्षमतेपैकी ७१ हजार ५५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानुसार पुणे व पिंपरी- चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये एकूण २१ हजार २९५ जागा रिक्त राहिल्या आहेत. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. प्रवेशासाठी इच्छुक असलेला एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली.अकरावीचे वर्ग दि. २६ जुलैपासून सुरू झाले, तोपर्यंत केवळ दोनच फेºया झाल्या होत्या. या फेºयांमध्ये केवळ २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता; तसेच बहुतेक मोठ्या महाविद्यालयांची संख्या त्यामध्ये जास्त होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. तोपर्यंत केवळ ५० ते ५५ टक्के प्रवेश झाले होते. त्यानंतर दोन विशेष फेºया व ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. या फेरीत १ हजार ९११ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर सातवी फेरी म्हणजे दुसºया विशेष फेरीपर्यंत एकूण ६९ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ही फेरी ११ सप्टेंबरपर्यंत सुरू होती. सहाव्या फेरीनंतर झालेल्या तीन फेºयांत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यापैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचा दीड महिन्याचा अभ्यासक्रम बुडाला. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नाही.अकरावी प्रवेश : आॅडिट समिती कागदावर1 इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आतापर्यंत केवळ दोनच बैठका झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीयप्रवेशप्रक्रियेच्या प्रवेशाच्या नऊ फेºया झाल्या असल्या, तरी आॅडिट समितीच्या बैठकांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पुढे आले आहे. मागील काही वर्षांत अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रवेश फेºयांची संख्या वाढविणे, कोटा प्रवेश समर्पित न करणे, प्रवेशातील अनियमितता यांसह विविध तक्रारी ‘सिस्कॉम’ या संस्थेने केल्या होत्या. 2प्रवेशप्रक्रियेचा अभ्यास करून, संस्थेने दर वर्षी याप्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने राज्यात विभागनिहाय आॅडिट समित्या स्थापन केल्या. प्रवेशप्रक्रियेदरम्यान विविध बाबींवर चर्चा करून, त्यातील त्रुटी दूर करणे हा या समितीचा उद्देश आहे. त्यामुळे समितीच्या सातत्याने बैठका होणे अपेक्षित होते; मात्र जून महिन्यापासून प्रत्यक्षात केवळ दोनच बैठका झाल्या आहेत. पालक प्रतिनिधी म्हणून पुणे विभागीय आॅडिट समितीतील सदस्य व सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले, ‘प्रवेशप्रक्रियेदरम्यान आॅडिट समितीची पहिल्या फेरीवेळी एक आणि तिसºया फेºयापूर्वी दुसरी बैठक झाली. त्यानंतर आजपर्यंत प्रशासनाकडून बैठक घेण्यात आलेली नाही. दोन्ही बैठकांमध्ये विशेष असे काहीच झाले नाही. 3नेमके आॅडिट करायचे कशाचे, याबाबत शासनाचे आदेशच नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर पुढील फेºयांमध्ये झालेले प्रवेश शंकास्पद आहेत. त्यामुळे अधिकाºयांकडून आॅडिट समितीचे बैठक घेतली जात नाही, असा आरोप धारणकर यांनी केला. राज्यात सर्वच विभागात ही स्थिती असण्याची शक्यता आहे. आता सिस्कॉमकडूनच अकरावी प्रवेशाबाबत अभ्यास करून, लवकरच त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यातील त्रुटी, उपाय योजना याचा समावेश त्यामध्ये केला जाईल.

टॅग्स :Studentविद्यार्थी