शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘त्या’ विद्यार्थ्यांचा अभ्यास अपुराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 06:17 IST

लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही

पुणे : लांबलेल्या प्रवेश फे-यांमुळे इयत्ता अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी थेट कबुली दिली असून, प्रवेशप्रक्रियेला दोष दिला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही प्रक्रिया आॅक्टोबर महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सुरू राहिली. या कालावधीत एकूण नऊ फेºया घेण्यात आल्या असून, एकूण ९२ हजार ३५० प्रवेश क्षमतेपैकी ७१ हजार ५५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानुसार पुणे व पिंपरी- चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये एकूण २१ हजार २९५ जागा रिक्त राहिल्या आहेत. जवळपास चार महिने प्रवेशप्रक्रिया सुरू राहूनही रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे. प्रवेशासाठी इच्छुक असलेला एकही विद्यार्थी प्रवेशापासूून वंचित राहू नये, ही भूमिका घेऊन समितीकडून प्रक्रिया लांबविण्यात आली.अकरावीचे वर्ग दि. २६ जुलैपासून सुरू झाले, तोपर्यंत केवळ दोनच फेºया झाल्या होत्या. या फेºयांमध्ये केवळ २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता; तसेच बहुतेक मोठ्या महाविद्यालयांची संख्या त्यामध्ये जास्त होती. या प्रक्रियेतील नियमित चौथी फेरी आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यात संपली. तोपर्यंत केवळ ५० ते ५५ टक्के प्रवेश झाले होते. त्यानंतर दोन विशेष फेºया व ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार तीन फेºया घेण्यात आल्या. सहावी फेरी ३१ आॅगस्टपर्यंत सुरू राहिली. या फेरीत १ हजार ९११ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर सातवी फेरी म्हणजे दुसºया विशेष फेरीपर्यंत एकूण ६९ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ही फेरी ११ सप्टेंबरपर्यंत सुरू होती. सहाव्या फेरीनंतर झालेल्या तीन फेºयांत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यापैकी जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांचा दीड महिन्याचा अभ्यासक्रम बुडाला. या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, याबाबत कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आली नाही. महाविद्यालयांनीच या विद्यार्थ्यांसाठी जादा वर्ग घेण्याचे फर्मान समितीने सोडले होते; पण अनेक महाविद्यालयांना जादा वर्ग घेणे शक्य झालेले नाही.अकरावी प्रवेश : आॅडिट समिती कागदावर1 इयत्ता अकरावी प्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आतापर्यंत केवळ दोनच बैठका झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीयप्रवेशप्रक्रियेच्या प्रवेशाच्या नऊ फेºया झाल्या असल्या, तरी आॅडिट समितीच्या बैठकांबाबत प्रशासन उदासीन असल्याचे पुढे आले आहे. मागील काही वर्षांत अकरावी प्रवेशप्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. प्रवेश फेºयांची संख्या वाढविणे, कोटा प्रवेश समर्पित न करणे, प्रवेशातील अनियमितता यांसह विविध तक्रारी ‘सिस्कॉम’ या संस्थेने केल्या होत्या. 2प्रवेशप्रक्रियेचा अभ्यास करून, संस्थेने दर वर्षी याप्रवेशप्रक्रियेचे आॅडिट करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने राज्यात विभागनिहाय आॅडिट समित्या स्थापन केल्या. प्रवेशप्रक्रियेदरम्यान विविध बाबींवर चर्चा करून, त्यातील त्रुटी दूर करणे हा या समितीचा उद्देश आहे. त्यामुळे समितीच्या सातत्याने बैठका होणे अपेक्षित होते; मात्र जून महिन्यापासून प्रत्यक्षात केवळ दोनच बैठका झाल्या आहेत. पालक प्रतिनिधी म्हणून पुणे विभागीय आॅडिट समितीतील सदस्य व सिस्कॉमचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर म्हणाले, ‘प्रवेशप्रक्रियेदरम्यान आॅडिट समितीची पहिल्या फेरीवेळी एक आणि तिसºया फेºयापूर्वी दुसरी बैठक झाली. त्यानंतर आजपर्यंत प्रशासनाकडून बैठक घेण्यात आलेली नाही. दोन्ही बैठकांमध्ये विशेष असे काहीच झाले नाही. 3नेमके आॅडिट करायचे कशाचे, याबाबत शासनाचे आदेशच नाहीत, असे अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. नियमित फेºया पूर्ण झाल्यानंतर पुढील फेºयांमध्ये झालेले प्रवेश शंकास्पद आहेत. त्यामुळे अधिकाºयांकडून आॅडिट समितीचे बैठक घेतली जात नाही, असा आरोप धारणकर यांनी केला. राज्यात सर्वच विभागात ही स्थिती असण्याची शक्यता आहे. आता सिस्कॉमकडूनच अकरावी प्रवेशाबाबत अभ्यास करून, लवकरच त्याचा अहवाल तयार केला जाईल. त्यातील त्रुटी, उपाय योजना याचा समावेश त्यामध्ये केला जाईल.

टॅग्स :Studentविद्यार्थी