शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वास्तुशास्त्रात पंचतत्त्वांचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

आपले शरीर पंचातत्त्वाने बनले आहे, त्याचबरोबर ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves व कॉस्मिक एनर्जी इत्यादी सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर व मनावर ...

आपले शरीर पंचातत्त्वाने बनले आहे, त्याचबरोबर ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक waves व कॉस्मिक एनर्जी इत्यादी सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर व मनावर परिणाम होतो. म्हणूनच एखाद्याच्या घरी गेलो तर तिथे खूप प्रसन्न शांत आणि रिलॅक्स वाटते. तर एखाद्या ठिकाणी खूप अस्वस्थ, अशांत वाटते हे आपण अनुभवतो. पण, कारण लक्षात येत नाही. कारण, असते तिथली सकारात्मक किंवा नकारात्मक वास्तुरचना या सर्व गोष्टींचा अभ्यास, म्हणजेच वास्तुशास्त्र.

Every person needs a family to be happy and every family need the home which can keep them happy

आणि वास्तुशास्त्र हेच करते, तुमचे घर इतके सकारात्मक करते की तिथेच तुम्हाला स्वर्गाचा अनुभव होतो. पौराणिक कथेनुसार इंद्रप्रस्थमध्ये महासभा होती व वास्तुदोष होता असे म्हटले जाते व त्यामुळे महाभारत घडले. म्हणजेच आपल्या वास्तूच्या मुख्य दाराची दिशा, आपला मास्टर बेडरूम, देवघराची योग्य जागा, स्वयंपाक घर कुठे आहे, टॉयलेट योग्य दिशेत आहे का, जड भाग हलका भाग कुठल्या दिशेत आहे, पंचतत्त्वाचा असोसिएटेड दिशा आहेत तिथे योग्य का अयोग्य गोष्टी आहेत असे अनेक गोष्टींचा अभ्यास करून गृहरचना करणे म्हणजेच वास्तुशास्त्र.

या बेसिक गोष्टींबरोबर वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याच बारिक-बारिक गोष्टींचा अभ्यास केला जातो. उदाहरण तुम्ही झोपताना शक्यतो दक्षिणेकडे डोकं असावं. कारण, पृथ्वीचा चुंबकीय प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो म्हणजेच आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपलं तर आपण निसर्गाच्या एकरूप असतो, म्हणून शांत झोप लागते. अशा छोट्या छोट्य गोष्टींनी बराच फरक पडतो, ते जाणून घ्या व अमलात आणल्याने तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच जाणवेल.

समजा, वास्तु घेण्याआधी आपण आपल्या वास्तूचे परीक्षण नाही केले, तरी काळजी करू नका. काही साधे सोपे बदल रचनेमध्ये करून, तर काही यंत्र पिरॅमिड इत्यादी पद्धतीने आपण आपली वास्तू जास्तीत जास्त सकारात्मक नक्कीच करू शकतो. बऱ्याच वेळा किरकोळ बदल करून लोकांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. वास्तुतज्ज्ञांकडे गेलो म्हणजे गरज नसताना खर्च करावा लागेल, अशी शंका येऊ देऊ नका. सध्या फ्लॅट म्हटलं की, 100% वास्तू कम्प्लेंट असं नाहीच म्हणून थोडेफार रेमेडिजची गरज पडते. पण त्या खर्चापेक्षा रिझल्टचा फायदा खूपच जास्त असतो. आता एक उदाहरण- बराच वेळ अग्नेय दिशेची ऊर्जा कमी वाटत असेल किंवा परिपूर्ण नसेल तर तेथील ऊर्जा पूर्ण करायला साधा दिवा लावूनही आपण ते पूर्ण करून शकतो. थोडक्यात, आपल्या खिशाला परवडणारे साधे उपायही असतातच. फक्त काही वेळा वास्तुदोष खूप जास्त असतो, त्या वेळा मात्र वास्तूमध्ये मोठे बदल किंवा वास्तू बदलण्याची गरज पडते. पण ते खूप कमी वेळा होते.

या शास्त्राच्या साह्याने आपल्या घराची सकारात्मकता वाढवून नकारात्मकता कमीत कमी करणे यासाठी आपल्या वास्तूची तपासणी स्वतः करा व गरजेनुसार वास्तुतज्ज्ञ यांचा योग्य सल्ला घेऊन आपले घर स्वर्गरुपी करा.

- संगीता कोतकर