शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनमधील पास झालेले विद्यार्थी सहा महिन्यानंतर नापास ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:10 IST

राहुल शिंदे पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना ...

राहुल शिंदे

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुण मिळाले, तरी उत्तीर्ण झाल्याचे दाखविले. मात्र, तब्बल सहा महिन्यानंतर निकालात बदल करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

शासन निर्णयानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यानुसार शासकीय पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांचा निकाल आॅगस्ट महिन्यात प्रसिध्द झाला.परंतु, परीक्षेत 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुणांना उत्तीर्ण असल्याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरली गेली. या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालासमोर 35 गुण व उत्तीर्ण (पी)असा शेरा आला. प्रत्यक्षात 40 पेक्षा कमी गुण असणा-या विद्यार्थ्यांच्या निकालासमोर अनुत्तीर्ण (एफ) शेरा येणे अपेक्षित होते. मात्र, निकाल प्रसिध्द केल्यानंतर ही बाब तंत्रनिकेतनच्या परीक्षा विभागाच्या लक्षात आली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला होता. तसेच आपण उत्तीर्ण आहोत असा समज त्यांनी करून घेतला होता. परंतु, परीक्षा विभागाला आपली चूक लक्षात येण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला. ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी निकाल रद्द केला. तसेच याबाबत संकेतस्थळावर व महाविद्यालयाच्या आवारात नोटीस प्रसिध्द केली.

शासकीय तंत्रनिकेततर्फे कोरोना काळात अंतिम वर्षाच्या सुमारे 1 हजार 150 विद्यार्थ्यांची तब्बल 170 विषयांची परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यातील सुमारे 150 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. अंतिम वर्षाचा निकाल चांगला लागला असला तरी अंतिमपूर्व वर्षाच्या निकालात चुकीच्या पध्दतीने जाहीर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण कसे दाखवता,असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र,एका तांत्रिक चुकीमुळे निकालही चुकला असे तंत्रनिकेतनच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

-------------------------------------

काही कारणास्तव चुकीचा निकाल प्रसिध्द झाल्यास सहा महिन्यांपर्यंत त्यात दुरूस्ती करता येते,असे स्वायत्त महाविद्यालयाच्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.त्यामुळे तांत्रिक कारणामुळे तंत्रनिकेतनकडून सुधारित निकाल प्रसिध्द केला. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या मार्च महिन्यात परीक्षा देता येणार आहे.

-डॉ.विठ्ठल बांदल, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे