शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

विधी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमोल अवचिते पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमोल अवचिते

पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी घोषित झाला. त्यानंतर कॅप राऊंडची सुरुवात झाली. २९ जानेवारी २०२१ रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यांनतर प्रवेशासाठी १ ते ४ फेब्रुवारी ही अंतिम तारीख प्रवेश घेण्यासाठी दिली होती. त्यामुळे प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी पुण्यात आले. परंतु, महाविद्यालयात गेल्यानंतर सीईटी सेलची लिंक चालत नसल्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत प्रवेश घेता आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दिलेल्या वेळेत प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, पंजाब आदी राज्यांतून विद्यार्थी व पालक पुण्यात दाखल झाले. प्रवेश मिळेल या आशेने विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात वेळे आधी पोहोचले. मात्र, १ फेब्रुवारीला लिंक सुरू झालीच नाही. त्यामुळे प्रवेश घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २ ला देखील लिंक सुरू झालीच नाही. हा प्रकार प्रवेशाच्या (दि. ४) अंतिम तारखेपर्यत असाच प्रकार सुरू राहिल्याने तब्बल चार दिवस विद्यार्थ्यांसह पालकांना पुण्यात राहावे लागले. संबंधित विभागाला तक्रार केली असता प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा नव्याने दि. ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सीईटी सेलच्या भोंगळ कारभाराला वैतागून विद्यार्थ्यांनी व पालकांना परतीचा मार्ग धरला.

चौकट

दर वर्षी तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास

मराठवाडा, गडचिरोली, गोंदिया व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राहणारे विद्यार्थी अनेक दूरचा प्रवास करत पुण्यात आले. चार दिवसांपासून राहण्याची अडचण निर्माण झाली. पैशांची अडचण निर्माण झाली. लॉ सीईटी सुरू होऊन ५ वर्ष होऊन सुद्धा दरवर्षी त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

--

नेमके जबाबदार कोण, याची चौकशी करावी

चार दिवस पुण्यात थांबून देखील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही. प्रवेशासाठी आणलेले पैसे खर्च झाले. आता नव्याने दिलेल्या वेळेत पुण्यात यावे लागणार आहे. जर पुन्हा असे घडले तर याला जबाबदार कोण असणार आहे. सीईटी सेलच्या पुण्याच्या कार्यालयाने मुंबईच्या कार्यालयात संपर्क साधा, असे सांगितले. त्यामुळे नेमके याला जबाबदार कोण याची चौकशी शासनाने केली पाहिजे, अशी मागणी एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना केली.