शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची लढाई सुरूच ठेवायला हवी : कन्हय्याकुमार

By admin | Updated: March 29, 2016 03:43 IST

सध्या चालू असलेली लढाई ही विद्यार्थ्यांची लढाई असून ती सातत्याने सुरू ठेवायला हवी. या लढाईतील मी एक लढवय्या असून, समता आणि न्यायासाठी येत्या काळात महाराष्ट्रात येणार आहे, असे

पुणे : सध्या चालू असलेली लढाई ही विद्यार्थ्यांची लढाई असून ती सातत्याने सुरू ठेवायला हवी. या लढाईतील मी एक लढवय्या असून, समता आणि न्यायासाठी येत्या काळात महाराष्ट्रात येणार आहे, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्याकुमार याने पुण्यातील पत्रकारांना सांगितले.आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी कन्हय्याकुमारने पुण्यातील पत्रकारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हय्याकुमारच्या सभा महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. एप्रिल महिन्यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, अमरावती आणि औरंगाबाद या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. सभांचे नियोजन सुरू असून लवकरच तारखेची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, एआययूएफचे राज्य अध्यक्ष प्रसाद घागरे, गिरीश फोंडे, अभय टांकसाळ, सुशील लाड उपस्थित होते. सर्व पुरोगामी शक्तींना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणात सभा आयोजित केली जाणार आहे. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग असल्याने कन्हय्याला विरोध झालेला नाही. सभा घेण्यासाठी कोल्हापूरमधून सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे घागरे याने सांगितले. प्रसाद घागरे म्हणाले, ‘‘जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल विद्यार्थी नेता कन्हय्याला अटक करण्यात आली. मात्र, दिल्ली पोलिसांना उच्च न्यायालयात कन्हय्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. बनाव करून कन्हय्याला तुरुंगात डांबण्यात आले. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सत्ताधारी भाजप व त्यांच्या विद्यार्थी संघटना करीत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय व रानडे इन्स्टिट्यूटमध्येही असाच प्रकार घडला. या प्रकरणाची दिल्ली एआयएसएफने दखल घेऊन पुण्यातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. कन्हय्याकुमारने पुण्यात येऊन सभा घेण्याबाबत रानडे इन्स्टिट्यूट व फर्ग्युसन महाविद्यालयातील पत्र एआयएसएफ राज्य कौन्सिलला मिळाले आहे. पुण्यासह औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, नागपूर व अमरावती या ठिकाणी सभा घेण्याबाबत प्रस्ताव आला आहे.धमक्या देणं हे संघ आणि भाजपाला नवं नाही. ये इनकी आदत है..! असे सांगत त्याने अभाविपच्या धमकीची खिल्ली उडवली. आपल्याकडे लढल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही; त्यामुळे वेळोवेळी लढावे लागते. भाजपा काय आणि त्यांचा युवा मोर्चा काय; एकाच माळेचे मणी आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपला प्रवास सुरूच ठेवायला हवा. आम्ही पुण्यातील विद्यार्थ्यांसोबत आहोत. भारतात सध्या सत्तेचा गैरवापर करून लोकांना त्रास देणे सुरू आहे. मात्र, ही लढाई स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी आहे! जेएनयूपाठोपाठ फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रकार हा लोकशाहीला घातक आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट भाजपा व आरएसएससारख्या शक्ती घालत आहेत. सध्याचे सरकार हे अल्पसंख्याक, शेतकरी आणि गोरगरिबांच्या विरोधात आहे. या सरकारमुळे देशाच्या स्वातंत्र्यालाच धोका असल्याची टीका कन्हय्याने या वेळी केली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधात देशभरात कुठेही आंदोलने झाली, तर त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम मी करणार आहे, असेही तो म्हणाला.