शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

वाणिज्य, कलाशाखेला पसंती, मूलभूत विज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे ...

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी लक्षणीय आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून विज्ञान शाखेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येचा विचार करता वाणिज्य व कला शाखेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, बीसीएस, बीसीए आदी अभ्यासक्रमांना प्राधान्य देतात. त्यानंतर बेसिक सायन्स अभ्यासक्रमाचा विचार करत आहेत.

--------------

मूलभूत विज्ञानविषयक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. बारावीनंतरच्या विज्ञान शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. कुठेच प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थी विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे अभियांत्रिकीसह इतर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी विज्ञान शाखेच्या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते.

- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-----------------

इन्कम टॅक्स, जीएसटीसह इतर घटकांचा समावेश वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. सीए, सीएस संदर्भातील काही तासांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत दिले जाते. तसेच त्यासाठी इंटर्नशीपही उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थी वाणिज्य अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन सीए, सीएस परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे वाणिज्य शाखेत प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-----------------

अकरावी प्रवेशाच्या कटऑफमध्ये घट झाली असली तरी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या कटऑफमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. मात्र, विद्यार्थ्यांकडून प्रथम प्राधान्य वाणिज्य शाखेस दिले जात आहे. त्यानंतर कला व विज्ञान शाखेस विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर

------------------------

केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागात सुध्दा विद्यार्थ्यांकडून वाणिज्य अभ्यासक्रमास सर्वाधिक पसंती दिली जात आहे. त्यानंतर कला व शेवटी विज्ञान शाखेस विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

- संजय चाकणे, प्राचार्य, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर