शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थी नाहीत, तर शिक्षकभरतीही नको

By admin | Updated: January 7, 2016 01:42 IST

कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन ही विद्यार्थी महाविद्यालयाकडे वळण्याऐवजी खासगी क्लासकडे वळतात आणि परिणामी महाविद्यालये ओस

पुणे : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन ही विद्यार्थी महाविद्यालयाकडे वळण्याऐवजी खासगी क्लासकडे वळतात आणि परिणामी महाविद्यालये ओस पडली आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने यावरच उपाय करणारा आदेश काढला आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये वर्गात मुले येत नसतील, तर त्या महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असा आदेश विभागाने काढला आहे. यामुळे आता मुलांना वर्गाकडे आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाला कामाला लागावे लागणार आहे.महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावीच्या एकएका वर्गातील विद्यार्थिसंख्या मोठी आहे. मात्र, विद्यार्थी महाविद्यालयात येऊन शिकण्यापेक्षा खासगी क्लासकडे वळतात. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिकणारी विद्यार्थिसंख्या ही कमी असल्याची तक्रार सातत्याने विविध घटकांकडून करण्यात येत होती. एकीकडे विद्यार्थीच नाहीत, तर त्याच वेळी शिक्षकपदांसाठी महाविद्यालयांकडून मंजुरी मागविण्यात येते. विद्यार्थी महाविद्यालयात नसतील, तर शिक्षक तरी काय काम करणार, असा प्रश्न शिक्षण विभागाने उपस्थित केला आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयात विद्यार्थी वर्गात बसत नाहीत. त्या महाविद्यालयांची पटसंख्या कितीही असली, तरी नव्याने शिक्षकपदे मंजूर करूच नये, असे परिपत्रक पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढले आहे. या परिपत्रकात शिक्षण आयुक्तांनी सूचना दिल्याचा संदर्भ देण्यात आला आहे.