शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

एमपीएससीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

By admin | Updated: May 6, 2015 06:15 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावून घेतली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सुमारे एक हजाराहून विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मोर्चा काढला.एमपीएससीतर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत अगदी काठावर पास झालेल्या अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले असून, त्यांची प्रथम श्रेणीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देणे हे तर्कसुसंगत व उचित आहे. मात्र, एमपीएससीने परीक्षेच्या निकषाबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून एकास आठ हे प्रमाण मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करताना लागू राहील, असे स्पष्ट केल्याने पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला आणि हा निर्णय रद्द करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रफुल्ल सोलंकी म्हणाला, ‘‘एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत. पूर्व परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध होत नाही. एकास आठ हे प्रमाण ठेवणे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे एमपीएससीने एकास सोळा असे प्रमाण ठेवावे.’’विशाल खिस्ते म्हणाला, ‘‘माझ्यासारखे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांकडे वळली आहेत. परंतु, अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल.’’यूपीएससीसह कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रमाणात घट केलेली नाही. यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने विद्यार्थांचे प्रामण ठरविणे अपेक्षित आहे; परंतु एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे खच्च१करण होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे प्रमाण एकास आठ ठेवू नये.- डॉ. आनंद पाटील, संचालक, स्टडी सर्कलएमपीएससीचा कारभार यूपीएससीप्रमाणे असणे आवश्यक आहे. एमपीएससीने यूपीएससीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थांची मागणी योग्य असून, एमपीएससी व शासनाने त्यानुसार निर्णय घेणे गरजेचे आहे.- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी