शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

By admin | Updated: May 6, 2015 06:15 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावून घेतली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सुमारे एक हजाराहून विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मोर्चा काढला.एमपीएससीतर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत अगदी काठावर पास झालेल्या अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले असून, त्यांची प्रथम श्रेणीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देणे हे तर्कसुसंगत व उचित आहे. मात्र, एमपीएससीने परीक्षेच्या निकषाबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून एकास आठ हे प्रमाण मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करताना लागू राहील, असे स्पष्ट केल्याने पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला आणि हा निर्णय रद्द करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रफुल्ल सोलंकी म्हणाला, ‘‘एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत. पूर्व परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध होत नाही. एकास आठ हे प्रमाण ठेवणे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे एमपीएससीने एकास सोळा असे प्रमाण ठेवावे.’’विशाल खिस्ते म्हणाला, ‘‘माझ्यासारखे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांकडे वळली आहेत. परंतु, अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल.’’यूपीएससीसह कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रमाणात घट केलेली नाही. यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने विद्यार्थांचे प्रामण ठरविणे अपेक्षित आहे; परंतु एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे खच्च१करण होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे प्रमाण एकास आठ ठेवू नये.- डॉ. आनंद पाटील, संचालक, स्टडी सर्कलएमपीएससीचा कारभार यूपीएससीप्रमाणे असणे आवश्यक आहे. एमपीएससीने यूपीएससीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थांची मागणी योग्य असून, एमपीएससी व शासनाने त्यानुसार निर्णय घेणे गरजेचे आहे.- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी