शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एमपीएससीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

By admin | Updated: May 6, 2015 06:15 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) एकूण पदांच्या आठ पट उमेदवारांनाच पूर्व परीक्षेतून निवडून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याची घोषणा केली आली. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हिरावून घेतली जाणार आहे. याला विरोध करण्यासाठी मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या सुमारे एक हजाराहून विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काळ्या फिती लावून मोर्चा काढला.एमपीएससीतर्फे यापूर्वी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत अगदी काठावर पास झालेल्या अनेक उमेदवारांना मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाले असून, त्यांची प्रथम श्रेणीच्या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी देणे हे तर्कसुसंगत व उचित आहे. मात्र, एमपीएससीने परीक्षेच्या निकषाबाबत परिपत्रक प्रसिद्ध करून एकास आठ हे प्रमाण मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करताना लागू राहील, असे स्पष्ट केल्याने पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढला आणि हा निर्णय रद्द करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रफुल्ल सोलंकी म्हणाला, ‘‘एमपीएससीचा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या संधी हिरावून घेतल्या जाणार आहेत. पूर्व परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध होत नाही. एकास आठ हे प्रमाण ठेवणे संकुचित वृत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे एमपीएससीने एकास सोळा असे प्रमाण ठेवावे.’’विशाल खिस्ते म्हणाला, ‘‘माझ्यासारखे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. काही वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षांकडे वळली आहेत. परंतु, अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल.’’यूपीएससीसह कर्नाटक, गुजरात या राज्यांनीही मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या निवडीच्या प्रमाणात घट केलेली नाही. यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने विद्यार्थांचे प्रामण ठरविणे अपेक्षित आहे; परंतु एमपीएससीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे खच्च१करण होणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मुख्य परीक्षेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे प्रमाण एकास आठ ठेवू नये.- डॉ. आनंद पाटील, संचालक, स्टडी सर्कलएमपीएससीचा कारभार यूपीएससीप्रमाणे असणे आवश्यक आहे. एमपीएससीने यूपीएससीप्रमाणेच विद्यार्थ्यांचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थांची मागणी योग्य असून, एमपीएससी व शासनाने त्यानुसार निर्णय घेणे गरजेचे आहे.- अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी