शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सत्तावाटपावर अडली आघाडी

By admin | Updated: January 24, 2017 02:56 IST

जागांची चर्चा नंतर करूच; पण आघाडी केली तर निवडणुकीनंतर सत्तावाटप कसे करायचे ते आधीच लेखी ठरवू, या काँग्रेसच्या

पुणे : जागांची चर्चा नंतर करूच; पण आघाडी केली तर निवडणुकीनंतर सत्तावाटप कसे करायचे ते आधीच लेखी ठरवू, या काँग्रेसच्या मागणीवर महापालिका निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडीची चर्चा अडली असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने तसा प्रस्ताव दिला असून, त्यावर सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती मिळाली.मावळत्या सभागृहातही सत्तेमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. मात्र, पाच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसची नेहमीच फसवणूक केली, असे काँग्रेसच्या सदस्यांचे म्हणणे आहे. सत्तेची अखेरची दोन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याचा शब्द देण्यात आला होता; मात्र ते देण्यात आले नाही. उपमहापौरपद वगळता किरकोळ पदांवर भागविण्यात आले. त्यामुळे या वेळी निवडणुकीनंतर काय व कसे वाटप करणार त्याचा लेखी करार करावा, अशी मागणी काँग्रेसने राष्ट्रवादीकडे केली आहे.पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांचे जिथे उमेदवार आहेत, त्या जागा त्या त्या पक्षांकडे राहतील, असा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यामध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रईस सुंडके व अन्य काही काँग्रेस नगरसेवकांच्या जागाही राष्ट्रवादीने स्वत:च्या म्हणून मागितल्या आहेत. काँग्रेसने त्यालाही तीव्र विरोध केला आहे. तुमच्याकडे उमेदवार आला आहे, त्याला मिळालेली मते मात्र काँग्रेसचीच आहेत व काँग्रेसचीच राहणार आहेत, त्यामुळे त्या जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याही मुद्द्यावर माघार घेण्यात येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसला बजावण्यात आले असल्याची माहिती मिळाली.काँग्रेसच्या वतीने चर्चेत भाग घेणाऱ्या शहराध्यक्ष बागवे व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांना मुद्दे सांगितले असून, त्यावर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी किंवा सायंकाळी पुन्हा संयुक्त चर्चा होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)