शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

प्राण्यांची जगण्यासाठी धडपड

By admin | Updated: March 12, 2017 03:24 IST

माणसाच्या हव्यासामुळे, वनव्यामुळे मावळ तालुक्यातील जैवविविधता व प्राणीजीवन धोक्यात आले असून, वन्यप्राण्यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे.

उर्से : माणसाच्या हव्यासामुळे, वनव्यामुळे मावळ तालुक्यातील जैवविविधता व प्राणीजीवन धोक्यात आले असून, वन्यप्राण्यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व निसर्गप्रेमींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. वन्यजीव प्राणिप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम व योजना राबविण्याविषयी कार्यक्रम घेतले जातात. मात्र, कार्यक्रमानंतर या सर्व गोष्टींचा सर्वांनाच विसर पडतो. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी शासनाने वेळोवेळी अनेक कायदे केले असले, तरी वन्यजीव आजही जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडताना दिसत आहेत. मात्र, याबाबतची दखल घेतली जात नाही. दिवसेंदिवस मानवी वस्ती तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात सरकत आहे. जंगलातील झाडांच्या व पाण्याच्या ठिकाणी मानवाने मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तरस, बिबट्या, हरण, ससे, रानडुकरे, रानमांजर व इतर छोटे-मोठे भूचर प्राणी यांची संख्या कमी झाली आहे. (वार्ताहर)अन्नाचा शोध : गावांमध्ये वाढला वावरपाण्याच्या शोधात, तसेच अन्न मिळविण्याच्या धडपडीत आज या डोंगरावरील वन्यजीवांची संख्या आता कमी झाली आहे. पाण्यासाठी व अन्नासाठी गावात येण्याच्या धडपडीत आत्तापर्यंत अनेक प्राण्यांना द्रुतगती महामार्गावर जीव गमवावा लागला आहे. अनेक शहरी धनिकांनी गुंतवणूक म्हणून ग्रामीण भागातील डोंगर खरेदी केले आहेत. आणि कोट्यवधींची स्थावर मालमत्ता सुरक्षित राहावी म्हणून त्याला तारेचे कुंपणही केले आहे. त्यामुळे हजारो वन्य जीवांचे वास्तव्य असणाऱ्या या वन जमिनीमध्ये कुंपणाचे जाळे निर्माण झाले आहे. या कुंपणामुळे या वन्य प्राण्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.वातावरण अनुकूल बनविण्याची गरज डोंगरांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे बनले आहे. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था व वन विभाग यांनी संयुक्तपणे काम केल्यास येथील वन्य जीवांचे हाल थांबवावेत.डोंगराळ भागातील प्राण्यांची वाताहतमावळ तालुक्याला मोठा डोंगर परिसर लाभला आहे. त्यामधून अनेक जीवांचे वास्तव्य पहावयास मिळते. बेडसेची लेणी, राजमाची किल्ला, कार्ल्याची लेणी, घोरवडेश्वर येथील लेणी, लोहगड किल्ला, तिकोणा किल्ला, लोणावळा येथील डोंगर दरीतील भाग या परिसरातील डोंगरदऱ्यांत वेगवेगळे प्राणी आपले वास्तव्य करून राहत आहेत. त्याचबरोबर लोणावळा-खंडाळा पासून ते पवना धरण व ठोकळवाडी, आंद्रा व शिरदे धरणापर्यंत डोंगरभाग व पसरलेल्या सपाट प्रदेशातही अनेक वन्यजीवांचे अस्तित्व आढळून येते. तालुक्यातील झपाट्याने वाढत्या नागरीकरणामुळे वन्यजीवांच्या वास्तव्यात अडथळा निर्माण झाला आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या द्रुतगती महामार्गामुळे या लगत असणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची वाताहत झाली.