शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंडोबांना शांत करण्याची जोरदार मोहीम

By admin | Updated: February 6, 2017 06:24 IST

महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताना सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी होऊ नये यासाठी अर्ज मागे घेण्याच्या काही तासांपूर्वी ए व बी फॉर्मचे वाटप केले

पुणे : महापालिका निवडणुकीची उमेदवारी जाहीर करताना सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी होऊ नये यासाठी अर्ज मागे घेण्याच्या काही तासांपूर्वी ए व बी फॉर्मचे वाटप केले. मात्र, इतकी दक्षता घेऊनही अनेक ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी अर्ज दाखल झाले नसले, तरी कार्यकर्त्यांच्या मनात उमेदवारीवरून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निवडणुकीमध्ये या नाराजीचा पक्षाला फटका बसू नये तसेच पक्षाच्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.महापालिका निवडणुकांसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळामध्ये जागांसाठी २६६१ अर्ज निवडणूक कार्यालयांमध्ये जमा झाले आहेत. यातील अनेक अर्जांवर विरोधी उमेदवारांकडून आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू झालेली अर्जांची छाननी प्रक्रिया अनेक कार्यालयांमध्ये रविवारी पहाटेपर्यंत सुरू राहिली. घोले रोड व भवानी पेठ निवडणूक कार्यालयांमधील छाननी प्रक्रिया, तर रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार व पदाधिकारी या प्रक्रियेत अडकून पडले होते. सोमवार (६ फेब्रुवारी) व मंगळवार (७ फेब्रुवारी) या दोन दिवशी सकाळी ११ ते ३ या वेळेत अर्ज मागे घेता येणार आहेत. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत घेऊ यापासून ते संघटनेतील विविध पदे देण्याचा शब्द दिला जात आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी ‘अर्थ’पूर्ण माघार घ्यावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या यंदा खूपच मोठी असल्याने सर्वाधिक बंडखोरी व नाराजीचे चित्र त्यांच्याकडे पहायला मिळत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यंदा पहिल्यांदाच आघाडी करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत बंडखोरी केली आहे. काही जागांवर तडजोड करणे शक्यच नसल्याने दोन्ही पक्षांच्या मैत्रीपूर्ण लढतीही पहायला मिळणार आहेत. शिवसेना, मनसे, रिपाइं यांनाही काही ठिकाणी बंडखोरी व नाराजीचा सामना करावा लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारांनी दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारल्या आहेत.