शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मंचरमध्ये तणाव, वरवंड येथे लाठीचार्ज

By admin | Updated: August 5, 2015 03:08 IST

मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने

पुणे : मतदान करण्यावरून होणारी बाचाबाची, विरोधक समोरासमोर आल्याने त्यांच्यात झालेली भांडणे, त्यामुळे काही ठिकाणी निर्माण झालेला तणाव, पण पोलिसांनी त्यात तातडीने हस्तक्षेप करीत केलेली कारवाई यामुळे मावळमधील घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले़ अनेक तालुक्यांत मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे दिसून येत होते़ जिल्ह्यात सरासरी ८५ टक्क्यांच्या वर मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे़ दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ७३ टक्के मतदान झाले होते़ जिल्ह्यातील जुन्नर, वेल्हा, घोडेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांतील दुर्गम भागात सकाळपासूनच मतदानाला उत्साह दिसून आला़ अनेक ठिकाणी मतदान सुरूझाल्याबरोबर रांगा लागल्याचे चित्र दिसत होते़ त्यामानाने मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालेल्या गावांमध्ये उत्साह कमी दिसून आला़ मंचर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत खासदार आणि आमदारांनी आपली शक्ती पणाला लावल्याने येथे अधिक चुरस दिसून येत होती़ त्यामुळे काही मतदान केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता़ पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली़ मतदान सुरू झाल्यानंतर सर्वत्रच उत्साह दिसून आला़ सकाळी मतदानाचा वेग चांगला होता़ अनेक ठिकाणी दुपारी १२ पर्यंतच ५० टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ दुपारनंतर हा वेग मंदावला़ सायंकाळी मात्र, त्यात पुन्हा वाढ झाली़ बारामती तालुक्यात साधारण ८८ टक्के मतदान झाले असून, पश्चिम भागात सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते़ अनेक ठिकाणी दोन पॅनलमध्ये चुरस दिसून आली़ इंदापूरला शांततेत मतदान पार पडले़ अनेक ठिकाणी मतदारांना ने-आण करण्यासाठी आलिशान गाड्यांची सोय केल्याचे दिसून येत होते़ इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात तुलनेने मतदानाचा वेग अधिक होता़ अनेक ग्रामपंचायतींत ९० टक्क्यांपर्यंत मतदान झाले़ हगारेवाडीत ९२ टक्के मतदान झाले, तर वालचंदनगरमध्ये सर्वांत कमी ६२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला़