शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

गतवर्षी लॉकडाऊनमधील कडक निर्बंधामुळे अपघातांचे प्रमाण घटले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे रस्त्यांवर वाहनांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे २०२० मध्ये ४५५ अपघातांमध्ये २९७ जखमी आणि १४३ मृत्यू नोंदविले गेले. त्यातुलनेत यंदाच्या वर्षी लॉकडाऊनचे नियम काहीअंशी शिथिल झाल्याने रस्त्यांसह महामार्गावर देखील वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे जानेवारी ते २८ मे २०२१ अखेरपर्यंतच्या पाच महिन्यात २०३ अपघाताची नोंद झाली आहे. त्यात ७८ जणांचे मृत्यू आणि १४६ व्यक्ती जखमी झाल्या आहेत.

काही बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन न करणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपलसीट प्रवास करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे ही कारणे अनेकांच्या जीवावर बेतली आहेत. यातच महामार्गांवर ८० स्पीडपेक्षा जास्त वेगाने गाडी चालविणे, गाडीवरचा ताबा सुटणे आणि गाडीचे ब्रेक फेल होणे अशा कारणांमुळे अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कडक संचारबंदीमुळे अपघाताचे प्रमाण हे २०१८-२०१९ च्या तुलनेत घटलेले पाहायला मिळाले. मात्र यंदाच्या वर्षी लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवांसह विविध क्षेत्र सुरू ठेवली आहेत. लोणीकाळभोर आणि लोणीकंद पोलीस स्टेशन शहराच्या हद्दीत आल्याने त्या भागातील मार्चनंतर महामार्गावर झालेल्या १५ ते १६ अपघातांची संख्या देखील समाविष्ट झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यात ७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. अन्यथा ही संख्या ६० च्या आसपासची असती. तरीही नागरिकांचे प्रबोधन, वाहतुकीच्या नियमांची कडक अमंलबजावणी अन्यथा कारवाईचा बडगा यावर लक्ष्य केंद्रित करीत आहोत. मात्र मानवी चुका टाळल्या तर अपघात नक्कीच टाळता येतील असा सल्ला वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुले श्रीरामे यांनी दिला आहे.

----------------------------------------

कालावधी एकूण अपघात एकूण जखमी एकूण मृत्यू

2018 1049 657 220

2019 729 688 206

2020 455 297 143

1 जानेवारी ते 203 146 78

28 मे 2021 अखेर

-----------------------------------

२५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे अपघातांचे प्रमाण जास्त

वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन गाडी चालविणे अशा कारणांमुळे २५ ते ४५ वयोगटातील अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

------------------------------------

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. दुचाकीस्वारांनी गाडी चालविताना हेल्मेट परिधान केले पाहिजे. गतवर्षी जे १४३ जणांचे मृत्यू झाले. त्यामध्ये ८० दुचाकीस्वारांचे मृत्यू झाले आहेत. त्यात ७२ लोकांनी हेल्मेट घातलेले नव्हते. हेल्मेट घातले तर अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. महामार्गावर गाडी चालविताना स्पीड नियंत्रणात ठेवावा. वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघात टाळणे आपल्या हातात आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या अपघातांच्या ठिकाणांवर वाहतूक विभागाने विशेष लक्ष्य केंद्रित केले असून, त्या भागात दिशादर्शक फलक लावले आहेत. - राहुल श्रीरामे, उपायुक्त वाहतूक विभाग

-----------------------

काळ आला पण वेळ नाही

मी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे कात्रज हायवेमार्गे येत होतो. अचानक मागून एका कारची धडक बसली आणि मी बेशुद्ध झालो. लोकांनी लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. हाताला थोडी जखम झाली होती. मात्र पाठीला जोरदार हिसका बसला होता. माझे नशीब की फार काही झाले नाही. चूक माझी नसतानाही मला अपघाताला सामोरे जावे लागले. पण काळ आला असला तरी वेळ आली नाही म्हणून बचावलो.

- सूरज लांडगे, तरुण

--------------------