शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘कथा-शतक’ येणार भेटीला, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:50 IST

समाजात दिवसेंदिवस जातीयतेचे विष वेगाने पसरत आहे. जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांनी समाज पोखरत चालला आहे. राजकीय व्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी हे प्रश्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे  - समाजात दिवसेंदिवस जातीयतेचे विष वेगाने पसरत आहे. जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटनांनी समाज पोखरत चालला आहे. राजकीय व्यवस्था स्वत:च्या सोयीसाठी हे प्रश्न वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेषत: मुस्लिम समाजाबद्दल अन्य धर्मियांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. या जखमांवर फुंकर घालण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे नितांत गरजेचे बनले आहे. मुस्लिम समाजातील सकारात्मकतेचे दर्शन घडवणारे ‘कथा-शतक’ लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.गाव-वस्तीपासून शहरातील गरीबवस्तीपर्यंत भारतीय समाजाच्या चाललेल्या जीवन संघर्षात मुस्लिम समाजही खांद्याला खांदा लावून सहभागी झाला आहे.कोणत्याही समाज व्यवस्थेत काही बिघडत असताना काही सकारात्मकही घडत असते. मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न असले तरी अनेकांच्या जीवनात सकारात्मक घटना घडताना दिसतात. सामाजिक काम, अर्थाजर्नासाठी विधायक प्रयत्न, वंचितांना मदतीचा हात अशा मानवतेचे दर्शन घडवणाºया, परस्पर सहकार्याच्या मुस्लिम समाजातील प्रेरणादायी घटना समाजापुढे येणे गरजेचे आहे.या समाजाचे जीवन समग्रतेने जाणून घेता यावे, त्यांना भारतीय अशा सर्वसमावेशक नजरेतून पाहिले जावे, आणि सकारात्मक ऊर्जेचे दर्शन घडावे यासाठी ‘कथा-शतक’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.मुस्लिम समाजातील शंभर सकारात्मक कथा पुढील दोन वर्षांत समाजापुढे आणण्याचा अनोखा आणि विधायक उपक्रम हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटने हाती घेतला आहे.या माध्यमातून मुस्लिम बांधवांमधील सकारात्मकतेचा शोध घेतला जाणार आहे. यासाठी अध्यक्षा ईला दलवाई यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटचेसचिव राजेंद्र बहाळकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून, सर्व पदाधिकाºयांच्या सहकार्याने या प्रकल्पाला मूर्त स्वरुप देण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे....विनाकारण अढी निर्माण होतेय1 ईला दलवाई म्हणाल्या, ‘मुस्लिम समाज हा देशात पसरलेल्या आणि पसरवल्या जाणाºया गैरसमजांना आणि चुकीच्या माहितीला नेहमीच बळी पडला आहे. त्यामुळे उर्वरित समाजात मुस्लिम समाजाचे एकांगी चित्रच उमटत आहे. त्यामुळे या समाजाबद्दल विनाकारण अढी निर्माण झाली आहे.2 कथा, कादंबºया, चित्रपट आणि अन्य माध्यमातून, काही अपवाद वगळता मुस्लिम समाजाबद्दल नकारात्मक चित्र मांडले जाते. वास्तविक अन्य समाजाची सुख-दु:खे आणि मुस्लिम समाजाची सुख-दु:खे, अडीअडचणी, जीवनसंघर्ष वेगळे नाहीत. मुस्लिम समाजातही मोठ्या प्रमाणात कष्टकरी, कारागीर, मध्यम आणि उच्च वर्ग आहे. त्यांनानी आपल्या रोजीरोटीसाठी, शिक्षणासाठी, स्थिर जीवनासाठी, अभ्युदयासाठी संघर्ष करत आहे. ‘कथा-शतक’ हा त्यांच्या सकारात्मकतेचा आरसा बनणार आहे.’‘कथा-शतक’मधून महाराष्ट्र भरातील मुस्लिम समाजाची अभिव्यक्ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध व्यक्ती, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. ईला दलवाई, विनोद शिरसाठ यांच्यासह संपादक मंडळ तयार करुन कथा शब्दबद्ध केल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी साधारपणे दोन वर्षांचा कालावधी लागेल.- राजेंद्र बहाळकर, सचिव,हमीद दलवाई इस्लामिकरिसर्च इन्स्टिट्यूट

टॅग्स :PuneपुणेIslamइस्लाम