शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपाला वेळीच रोखा

By admin | Updated: February 16, 2017 03:25 IST

काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या

हडपसर : काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. त्यांना शहराच्या विकासाचे काही देणे-घेणे नाही , त्यामुळे या भाजपा सरकारला वेळीच रोखा व शहरातील विकास असाच अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला पुन्हा कारभार करण्याची संधी द्या, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ हडपसर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार जयदेव गायकवाड, जालिंंदर कामठे, जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, रूपाली चाकणकर, कैलासमामा कोद्रे, प्रशांत तुपे, नीलेश मगर, मंगेश तुपे, यांच्यासह प्रभाग क्रमांक २२ मुंढवा -मगरपट्टा प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेविका चंचला कोद्रे, नगरसेवक बंडू गायकवाड, हेमलता नीलेश मगर, हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक २३ मधील नगरसेविका वैशाली बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विजय मोरे, योगेश ससाणे, रामटेकडी-सय्यदनगर २४ प्रभागातील उमेदवार आनंद आलकुंटे, प्रभाग क्रमांक २५ वानवडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, कांचन जाधव, दिलीप जांभुळकर, तसेच प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी-कौसर बागमधील उमेदवार नगरसेवक फारूक इनामदार, नगरसेविका नंदा लोणकर, संजय घुले, अस्मिता साळवे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले केंद्र आणि राज्यातील या भाजपा सरकारने भावनिक घोषणा करून सत्ता मिळविली. त्यातील किती घोषणांची पूर्तता झाली, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काळा पैसा शोधण्याच्या नादात नोटाबंदी केली. मात्र, त्यातून काळा पैसा सापडला तर नाहीच, उलट सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. दिवस उलटले, तरी व्यवहारात सुरळीतपणा आला नाही. पर्यायाने अनेक कंपन्यांनी कामगार कपात करत बेरोजगारांची संख्या वाढविली. सर्वसामान्यांचे रोजचे जीवनच उद्ध्वस्त केले. यांना आता वेळीच आवर घाला. पुणे शहर तसेच हडपसर बदलतंय, हे खरं आहे. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आपल्या भगिनी पुढे येतात, या भगिनींनी राजकारणात आदर्श निर्माण केला आहे. पालिकेत ५० टक्क्यांपेक्षा महिला आज चांगले नेतृत्त्व करतात. महिलांना संधी दिल्यानंतर कसे चांगले काम करतात, हे राष्ट्रवादीच्या सर्वच महिला नगरसेविकांनी विकासकामे करून सिद्ध केले आहे. शहर बदलतंय माहिती तंत्रज्ञान आणि जगातील व्यवसाय व शिक्षणासाठी पुणे हे अग्रेसर आहे. भाजपा असा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे असे सांगितले जाते, त्या-त्या भागात असलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. चुकीची कामे करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली जात आहे. हे भाजपाचे दुर्दैव आहे. (वार्ताहर)