शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपाला वेळीच रोखा

By admin | Updated: February 16, 2017 03:25 IST

काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या

हडपसर : काळा पैसा भारतात आणून तो सर्वसामान्य जनतेच्या बँक खात्यात जमा केला जाईल, अशी खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने नोटाबंदी करून सर्वसामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. त्यांना शहराच्या विकासाचे काही देणे-घेणे नाही , त्यामुळे या भाजपा सरकारला वेळीच रोखा व शहरातील विकास असाच अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला पुन्हा कारभार करण्याची संधी द्या, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ हडपसर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार जयदेव गायकवाड, जालिंंदर कामठे, जगन्नाथ शेवाळे, अंकुश काकडे, रूपाली चाकणकर, कैलासमामा कोद्रे, प्रशांत तुपे, नीलेश मगर, मंगेश तुपे, यांच्यासह प्रभाग क्रमांक २२ मुंढवा -मगरपट्टा प्रभागातील राष्ट्रवादीचे उमेदवार नगरसेवक चेतन तुपे, नगरसेविका चंचला कोद्रे, नगरसेवक बंडू गायकवाड, हेमलता नीलेश मगर, हडपसर गावठाण-सातववाडी प्रभाग क्रमांक २३ मधील नगरसेविका वैशाली बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विजय मोरे, योगेश ससाणे, रामटेकडी-सय्यदनगर २४ प्रभागातील उमेदवार आनंद आलकुंटे, प्रभाग क्रमांक २५ वानवडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार महापौर प्रशांत जगताप, माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, कांचन जाधव, दिलीप जांभुळकर, तसेच प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी-कौसर बागमधील उमेदवार नगरसेवक फारूक इनामदार, नगरसेविका नंदा लोणकर, संजय घुले, अस्मिता साळवे आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले केंद्र आणि राज्यातील या भाजपा सरकारने भावनिक घोषणा करून सत्ता मिळविली. त्यातील किती घोषणांची पूर्तता झाली, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. काळा पैसा शोधण्याच्या नादात नोटाबंदी केली. मात्र, त्यातून काळा पैसा सापडला तर नाहीच, उलट सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. दिवस उलटले, तरी व्यवहारात सुरळीतपणा आला नाही. पर्यायाने अनेक कंपन्यांनी कामगार कपात करत बेरोजगारांची संख्या वाढविली. सर्वसामान्यांचे रोजचे जीवनच उद्ध्वस्त केले. यांना आता वेळीच आवर घाला. पुणे शहर तसेच हडपसर बदलतंय, हे खरं आहे. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे पुण्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आपल्या भगिनी पुढे येतात, या भगिनींनी राजकारणात आदर्श निर्माण केला आहे. पालिकेत ५० टक्क्यांपेक्षा महिला आज चांगले नेतृत्त्व करतात. महिलांना संधी दिल्यानंतर कसे चांगले काम करतात, हे राष्ट्रवादीच्या सर्वच महिला नगरसेविकांनी विकासकामे करून सिद्ध केले आहे. शहर बदलतंय माहिती तंत्रज्ञान आणि जगातील व्यवसाय व शिक्षणासाठी पुणे हे अग्रेसर आहे. भाजपा असा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे असे सांगितले जाते, त्या-त्या भागात असलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे. चुकीची कामे करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली जात आहे. हे भाजपाचे दुर्दैव आहे. (वार्ताहर)