शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खासगी रुग्णालयांची मनमानी आता तरी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात शासकीय रुग्णालयांमधील खाटा कमी पडल्याने खासगी रुग्णालयांमधील खाटा शासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळात शासकीय रुग्णालयांमधील खाटा कमी पडल्याने खासगी रुग्णालयांमधील खाटा शासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या. तरीही खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले आकारून नागरिकांची अक्षरश: लूट केली आणि अजूनही अवाच्या सवा बिले आकारण्याचे प्रकार सुरूच आहेत. यातून धडा घेऊन तरी शासनाने ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ हा कायदा अंमलात आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जवळपास आठ वर्षांपासून कायदा केवळ कागदावरच धूळखात पडून आहे.

राज्य सरकारकडे २०१४ पासून ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’चा मसुदा तयार आहे. आरोग्य मंत्र्यांनी नेमलेल्या समितीने हा मसुदा तयार केला होता. त्यामध्ये शासकीय आणि खासगी डॉक्टरांचाही समावेश होता. चार वर्षे हा मसूदा धूळखात पडून होता. २०१८ साली पुन्हा नवी समिती गठीत करण्यात आली. या समितीने थोडेफार काम केले, दुरुस्ती केली आणि त्यानंतर पुन्हा काहीच हालचाली झाल्या नाहीत.

सर्व राज्यांनी हा कायदा लागू करावा, अशी मागणी डॉ. अभय शुक्ला यांनी केली आहे. याबाबतचा अभ्यास नुकताच देशभरात करण्यात आला. ‘भारतातील खासगी आरोग्य सेवेच्या नियमनाचे विश्लेषण’ यासंदर्भात ‘साथी’ संस्थेचे डॉ. अभय शुक्ला, डॉ. कांचन पवार आणि डॉ. अभिजित मोरे यांनी सर्वेक्षण आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

जन आरोग्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला म्हणाले, “कोविडच्या काळात खासगी रुग्णालयांची मनमानी, शासकीय निर्णयांना डावलणे असे अनेक प्रकार समोर आले. जन आरोग्य अभियानातर्फे ५ फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराबाबत राज्यस्तरीय जनसुनावणी झाली. त्यामध्ये शंभरहून अधिक लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. खासगी वैद्यकीय क्षेत्रावर नियमनाची आणि नियंत्रण आणण्याची महाराष्ट्रात नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी हा कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे. कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी निधीची नव्हे, तर प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.”

सरकारकडे कायद्याचा मसुदा तयार आहे, ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तयार केलेला आराखडाही हातात आहे. दरांवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजनही प्रत्यक्षात उतवरले गेले. या सर्व उपाययोजनांवर केवळ कायद्याची मोहोर लागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के लोक खासगी वैद्यकीय सेवेवर अवलंबून आहेत. असे असताना कायद्याबाबत शासनाकडून दिरंगाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जन आरोग्य अभियानाने याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.