शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांची मनमानी आता तरी रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात शासकीय रुग्णालयांमधील खाटा कमी पडल्याने खासगी रुग्णालयांमधील खाटा शासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना काळात शासकीय रुग्णालयांमधील खाटा कमी पडल्याने खासगी रुग्णालयांमधील खाटा शासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या. तरीही खासगी रुग्णालयांनी अवाजवी बिले आकारून नागरिकांची अक्षरश: लूट केली आणि अजूनही अवाच्या सवा बिले आकारण्याचे प्रकार सुरूच आहेत. यातून धडा घेऊन तरी शासनाने ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ हा कायदा अंमलात आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जवळपास आठ वर्षांपासून कायदा केवळ कागदावरच धूळखात पडून आहे.

राज्य सरकारकडे २०१४ पासून ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’चा मसुदा तयार आहे. आरोग्य मंत्र्यांनी नेमलेल्या समितीने हा मसुदा तयार केला होता. त्यामध्ये शासकीय आणि खासगी डॉक्टरांचाही समावेश होता. चार वर्षे हा मसूदा धूळखात पडून होता. २०१८ साली पुन्हा नवी समिती गठीत करण्यात आली. या समितीने थोडेफार काम केले, दुरुस्ती केली आणि त्यानंतर पुन्हा काहीच हालचाली झाल्या नाहीत.

सर्व राज्यांनी हा कायदा लागू करावा, अशी मागणी डॉ. अभय शुक्ला यांनी केली आहे. याबाबतचा अभ्यास नुकताच देशभरात करण्यात आला. ‘भारतातील खासगी आरोग्य सेवेच्या नियमनाचे विश्लेषण’ यासंदर्भात ‘साथी’ संस्थेचे डॉ. अभय शुक्ला, डॉ. कांचन पवार आणि डॉ. अभिजित मोरे यांनी सर्वेक्षण आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.

जन आरोग्य अभियानाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अभय शुक्ला म्हणाले, “कोविडच्या काळात खासगी रुग्णालयांची मनमानी, शासकीय निर्णयांना डावलणे असे अनेक प्रकार समोर आले. जन आरोग्य अभियानातर्फे ५ फेब्रुवारी रोजी खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराबाबत राज्यस्तरीय जनसुनावणी झाली. त्यामध्ये शंभरहून अधिक लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. खासगी वैद्यकीय क्षेत्रावर नियमनाची आणि नियंत्रण आणण्याची महाराष्ट्रात नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी हा कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे. कायदा प्रत्यक्षात आणण्यासाठी निधीची नव्हे, तर प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.”

सरकारकडे कायद्याचा मसुदा तयार आहे, ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने तयार केलेला आराखडाही हातात आहे. दरांवर नियंत्रण मिळवण्याचे नियोजनही प्रत्यक्षात उतवरले गेले. या सर्व उपाययोजनांवर केवळ कायद्याची मोहोर लागण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील ८० टक्के लोक खासगी वैद्यकीय सेवेवर अवलंबून आहेत. असे असताना कायद्याबाबत शासनाकडून दिरंगाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जन आरोग्य अभियानाने याबाबत आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.