शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

By admin | Updated: January 5, 2017 03:12 IST

अंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत.

पराग कुंकुलोळ, चिंचवडअंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंधकारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरी काठी अंधाच्या हाती कधी पडणार, असा सवाल अंध बांधव, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.शासनाच्या विविध योजनांमधून अंधांसाठी पुनर्वसनाच्या विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहे. कित्येक अंध व्यक्ती समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करीत आहेत. या व्यक्ती समाजातील डोळस व्यक्ती बरोबर काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे.अंधांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आधुनिक व संगणकीकृत युगात आपण वावरत आहोत. अंधांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जोड देणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे सचिव अंध शिक्षक सतीश नवले यांनी व्यक्त केले.अंधांची शिक्षणप्रणाली व रोजगार यामध्ये मोठी तफावत आहे. ही पद्धत मध्यम कुटुंबातील मुलांना परवडणारी नाही. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर आहेत. याकरिता शासनाने अंधांच्या शिक्षणासाठी साधनांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे.अंध व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होईल. समाजकल्याण विभागाने त्यासाठी सहकार्य करायला हवे. तरच ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा व्यक्ती समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो. यासाठी प्रयत्न करायला हवेत. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने त्यांना सहानभूती दाखवून वा त्यांच्यावर दया करुन सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातुन मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते.या मुळे अशा व्यक्ती पालकांना व समाजाला भार वाटणार नाहीत. त्यांना जखडत ठेऊन अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे. स्वयंम रोजगारातून हा घटक यशस्वी होऊ शकतो असे मत जागृती सोशल फाउंडेशनचे राम फुगे व विश्वास काशीद यांनी व्यक्त केले आहे.