शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

By admin | Updated: January 5, 2017 03:12 IST

अंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत.

पराग कुंकुलोळ, चिंचवडअंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंधकारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरी काठी अंधाच्या हाती कधी पडणार, असा सवाल अंध बांधव, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.शासनाच्या विविध योजनांमधून अंधांसाठी पुनर्वसनाच्या विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहे. कित्येक अंध व्यक्ती समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करीत आहेत. या व्यक्ती समाजातील डोळस व्यक्ती बरोबर काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे.अंधांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आधुनिक व संगणकीकृत युगात आपण वावरत आहोत. अंधांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जोड देणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे सचिव अंध शिक्षक सतीश नवले यांनी व्यक्त केले.अंधांची शिक्षणप्रणाली व रोजगार यामध्ये मोठी तफावत आहे. ही पद्धत मध्यम कुटुंबातील मुलांना परवडणारी नाही. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर आहेत. याकरिता शासनाने अंधांच्या शिक्षणासाठी साधनांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे.अंध व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होईल. समाजकल्याण विभागाने त्यासाठी सहकार्य करायला हवे. तरच ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा व्यक्ती समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो. यासाठी प्रयत्न करायला हवेत. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने त्यांना सहानभूती दाखवून वा त्यांच्यावर दया करुन सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातुन मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते.या मुळे अशा व्यक्ती पालकांना व समाजाला भार वाटणार नाहीत. त्यांना जखडत ठेऊन अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे. स्वयंम रोजगारातून हा घटक यशस्वी होऊ शकतो असे मत जागृती सोशल फाउंडेशनचे राम फुगे व विश्वास काशीद यांनी व्यक्त केले आहे.