शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

शासकीय योजनांची काठी अद्याप दूरच

By admin | Updated: January 5, 2017 03:12 IST

अंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत.

पराग कुंकुलोळ, चिंचवडअंध व्यक्तीला स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. अंध बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचे जीवन अधिकच अंधकारमय बनू लागले आहे. शासनाच्या योजनांची पांढरी काठी अंधाच्या हाती कधी पडणार, असा सवाल अंध बांधव, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांकडून उपस्थित होत आहे.शासनाच्या विविध योजनांमधून अंधांसाठी पुनर्वसनाच्या विविध योजना राबविल्या जात असल्या, तरी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची पूर्तता होत नसल्याने समाजातील हा घटक त्या सुविधांपासून वंचित राहत आहे. कित्येक अंध व्यक्ती समाजातील विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्य करीत आहेत. या व्यक्ती समाजातील डोळस व्यक्ती बरोबर काम करू शकतात हे सिद्ध झाले आहे.अंधांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत. आधुनिक व संगणकीकृत युगात आपण वावरत आहोत. अंधांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची जोड देणे महत्त्वाचे असल्याचे मत प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेचे सचिव अंध शिक्षक सतीश नवले यांनी व्यक्त केले.अंधांची शिक्षणप्रणाली व रोजगार यामध्ये मोठी तफावत आहे. ही पद्धत मध्यम कुटुंबातील मुलांना परवडणारी नाही. त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या किमती आवाक्याबाहेर आहेत. याकरिता शासनाने अंधांच्या शिक्षणासाठी साधनांची पूर्तता केली पाहिजे. त्यांना मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे.अंध व्यक्तीला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होईल. समाजकल्याण विभागाने त्यासाठी सहकार्य करायला हवे. तरच ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा व्यक्ती समाजाचा उत्पादक घटक बनू शकतो. यासाठी प्रयत्न करायला हवेत. १९८० नंतर समावेशक शिक्षण व २००३ ते ४ पासून सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत सर्वसामान्यांच्या शाळेत अंधांना शिक्षणाची परवानगी दिली आहे. परंतु अंध असल्याने त्यांना सहानभूती दाखवून वा त्यांच्यावर दया करुन सवलती देण्यापेक्षा त्याला स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.यामुळे अंध व्यक्तीच्या गरजा व आवाहने पूर्ण होऊ शकतील. यातुन मिळणारे शिक्षण लाभदायी व रोजगारयुक्त होऊ शकते.या मुळे अशा व्यक्ती पालकांना व समाजाला भार वाटणार नाहीत. त्यांना जखडत ठेऊन अंधत्वाचे भांडवल करण्यापेक्षा त्यांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन देणे महत्वाचे आहे. स्वयंम रोजगारातून हा घटक यशस्वी होऊ शकतो असे मत जागृती सोशल फाउंडेशनचे राम फुगे व विश्वास काशीद यांनी व्यक्त केले आहे.