शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

बुडीत बंधाऱ्याचा पथदर्शी प्रकल्प गाळात

By admin | Updated: April 19, 2017 04:14 IST

पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत

डिंभे : पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. यामुळे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाण्याऐवजी जास्त गाळच साचलेला दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत ते गाळाने भरू लागल्याने महाराष्ट्रातील हा पहिलावहिलाच पायलट प्रकल्प गाळाच्या गर्तेत सापडला आहे. आदिवासी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना राबविण्यात आली. आहुपे खोऱ्यातील बोरघर, अडिवरे, कोकणेवाडी, फुलवडे येथे; तर पाटण खोऱ्यात पाटण, साकेरी, महाळुंगे व तळपेवाडी येथे सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्चून पाटबंधारे विभागाने आठ बुडीत बंधारे बांधले. यामुळे २० आदिवासी गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच काहीअंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावता येईल, हा यामागचा उद्देश होता. काही वर्षे या पाण्याचा या भागाला दिलासाही मिळाला.या बंधाऱ्यांची उंची साडेपाच मीटर, पाया अडीच ते तीन मीटर, लांबी ५० मीटरपासून १०० मीटरपर्यंत अपेक्षित होती. मात्र, डिंभे धरण पाणलोट क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात येत असल्याने हे बंधारे बांधण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी व स्टील या वस्तूंच्या वहातुकीसाठी त्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीवर ठेकेदारांनी या बंधाऱ्यांची कामे उरकती घेतली. यामुळे बंधाऱ्यांचा पाया कच्चा राहिला, तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट झाले. परिणामी, आज अनेक बंधारे धरणातील पाणी कमी होऊ लागताच कोरडे ठणठणीत पडूत आहेत. सध्या तर या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.पावसाच्या पाण्याबरोबर दर वर्षी या धरणात डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती या बुडीत बंधाऱ्यांत साठून राहते.