शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

बुडीत बंधाऱ्याचा पथदर्शी प्रकल्प गाळात

By admin | Updated: April 19, 2017 04:14 IST

पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत

डिंभे : पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. यामुळे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाण्याऐवजी जास्त गाळच साचलेला दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत ते गाळाने भरू लागल्याने महाराष्ट्रातील हा पहिलावहिलाच पायलट प्रकल्प गाळाच्या गर्तेत सापडला आहे. आदिवासी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना राबविण्यात आली. आहुपे खोऱ्यातील बोरघर, अडिवरे, कोकणेवाडी, फुलवडे येथे; तर पाटण खोऱ्यात पाटण, साकेरी, महाळुंगे व तळपेवाडी येथे सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्चून पाटबंधारे विभागाने आठ बुडीत बंधारे बांधले. यामुळे २० आदिवासी गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच काहीअंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावता येईल, हा यामागचा उद्देश होता. काही वर्षे या पाण्याचा या भागाला दिलासाही मिळाला.या बंधाऱ्यांची उंची साडेपाच मीटर, पाया अडीच ते तीन मीटर, लांबी ५० मीटरपासून १०० मीटरपर्यंत अपेक्षित होती. मात्र, डिंभे धरण पाणलोट क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात येत असल्याने हे बंधारे बांधण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी व स्टील या वस्तूंच्या वहातुकीसाठी त्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीवर ठेकेदारांनी या बंधाऱ्यांची कामे उरकती घेतली. यामुळे बंधाऱ्यांचा पाया कच्चा राहिला, तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट झाले. परिणामी, आज अनेक बंधारे धरणातील पाणी कमी होऊ लागताच कोरडे ठणठणीत पडूत आहेत. सध्या तर या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.पावसाच्या पाण्याबरोबर दर वर्षी या धरणात डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती या बुडीत बंधाऱ्यांत साठून राहते.