शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

बुडीत बंधाऱ्याचा पथदर्शी प्रकल्प गाळात

By admin | Updated: April 19, 2017 04:14 IST

पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत

डिंभे : पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. यामुळे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाण्याऐवजी जास्त गाळच साचलेला दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत ते गाळाने भरू लागल्याने महाराष्ट्रातील हा पहिलावहिलाच पायलट प्रकल्प गाळाच्या गर्तेत सापडला आहे. आदिवासी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना राबविण्यात आली. आहुपे खोऱ्यातील बोरघर, अडिवरे, कोकणेवाडी, फुलवडे येथे; तर पाटण खोऱ्यात पाटण, साकेरी, महाळुंगे व तळपेवाडी येथे सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्चून पाटबंधारे विभागाने आठ बुडीत बंधारे बांधले. यामुळे २० आदिवासी गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच काहीअंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावता येईल, हा यामागचा उद्देश होता. काही वर्षे या पाण्याचा या भागाला दिलासाही मिळाला.या बंधाऱ्यांची उंची साडेपाच मीटर, पाया अडीच ते तीन मीटर, लांबी ५० मीटरपासून १०० मीटरपर्यंत अपेक्षित होती. मात्र, डिंभे धरण पाणलोट क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात येत असल्याने हे बंधारे बांधण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी व स्टील या वस्तूंच्या वहातुकीसाठी त्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीवर ठेकेदारांनी या बंधाऱ्यांची कामे उरकती घेतली. यामुळे बंधाऱ्यांचा पाया कच्चा राहिला, तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट झाले. परिणामी, आज अनेक बंधारे धरणातील पाणी कमी होऊ लागताच कोरडे ठणठणीत पडूत आहेत. सध्या तर या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.पावसाच्या पाण्याबरोबर दर वर्षी या धरणात डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती या बुडीत बंधाऱ्यांत साठून राहते.