शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी

दौंड : दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी केले.आलेगाव येथे खडकवासला कालव्याच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. सोनवडी व खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा फार मोठा उपयोग होतो. या बंधाऱ्यातून पूर्व भागातील सुमारे २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु हक्काचे पाणी मिळविण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु तालुक्यातील काही स्वार्थी व्यक्ती या भागात पाणी मिळू नये, यासाठी राजकारण करीत आहेत. तेव्हा अशा राजकीय लोकांपासून शेतकऱ्यांनी दूर रहावे. भीमा नदीमुळे नदीकाठच्या गावांना वर्षभर पुरेसे पाणी मिळते मात्र उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी सोनवडी आणि खोरवडी येथील बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वरदान ठरते. मात्र अलीकडच्या काळात हक्काचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, रासपाचे आमदार राहुल कुल, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. परंतु जादा सोडलेले पाणी काही स्थानिक लोकांनी बंधाऱ्यांना ढापे टाकून अडविल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोहचू शकले नाही; तरी देऊळगावराजे, शिरापूर या भागात पाणी पोहोचणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे काळे म्हणाले. या वेळी भाऊसाहेब काळे, सुभ्रदा काळे, उमेश काळे, राहुल चितारे, माणिक काळे, अशोक कदम, गोविंद कदम, श्रीकांत गुणवरे, शिवाजी ढमढेरे, मोहन काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)