शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी

दौंड : दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी केले.आलेगाव येथे खडकवासला कालव्याच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. सोनवडी व खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा फार मोठा उपयोग होतो. या बंधाऱ्यातून पूर्व भागातील सुमारे २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु हक्काचे पाणी मिळविण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु तालुक्यातील काही स्वार्थी व्यक्ती या भागात पाणी मिळू नये, यासाठी राजकारण करीत आहेत. तेव्हा अशा राजकीय लोकांपासून शेतकऱ्यांनी दूर रहावे. भीमा नदीमुळे नदीकाठच्या गावांना वर्षभर पुरेसे पाणी मिळते मात्र उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी सोनवडी आणि खोरवडी येथील बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वरदान ठरते. मात्र अलीकडच्या काळात हक्काचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, रासपाचे आमदार राहुल कुल, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. परंतु जादा सोडलेले पाणी काही स्थानिक लोकांनी बंधाऱ्यांना ढापे टाकून अडविल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोहचू शकले नाही; तरी देऊळगावराजे, शिरापूर या भागात पाणी पोहोचणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे काळे म्हणाले. या वेळी भाऊसाहेब काळे, सुभ्रदा काळे, उमेश काळे, राहुल चितारे, माणिक काळे, अशोक कदम, गोविंद कदम, श्रीकांत गुणवरे, शिवाजी ढमढेरे, मोहन काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)