शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

पाण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी

दौंड : दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी केले.आलेगाव येथे खडकवासला कालव्याच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. सोनवडी व खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा फार मोठा उपयोग होतो. या बंधाऱ्यातून पूर्व भागातील सुमारे २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु हक्काचे पाणी मिळविण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु तालुक्यातील काही स्वार्थी व्यक्ती या भागात पाणी मिळू नये, यासाठी राजकारण करीत आहेत. तेव्हा अशा राजकीय लोकांपासून शेतकऱ्यांनी दूर रहावे. भीमा नदीमुळे नदीकाठच्या गावांना वर्षभर पुरेसे पाणी मिळते मात्र उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी सोनवडी आणि खोरवडी येथील बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वरदान ठरते. मात्र अलीकडच्या काळात हक्काचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, रासपाचे आमदार राहुल कुल, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. परंतु जादा सोडलेले पाणी काही स्थानिक लोकांनी बंधाऱ्यांना ढापे टाकून अडविल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोहचू शकले नाही; तरी देऊळगावराजे, शिरापूर या भागात पाणी पोहोचणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे काळे म्हणाले. या वेळी भाऊसाहेब काळे, सुभ्रदा काळे, उमेश काळे, राहुल चितारे, माणिक काळे, अशोक कदम, गोविंद कदम, श्रीकांत गुणवरे, शिवाजी ढमढेरे, मोहन काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)