शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजी

By admin | Updated: October 25, 2015 03:43 IST

केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या

पुणे : केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या खासदार, आमदार व पक्षनेत्यांच्या बैठकीत मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेरीस यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्याचे ठरले.महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चर्चेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात घेऊन एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा यावर सोमवारी दुपारपर्यंत एकमताने निर्णय देऊ, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासनाला सांगितले. बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, नीलम गोऱ्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे आदी बैठकीला उपस्थित होते.आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वांना ‘स्मार्ट सिटी’ योजनेत प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. सध्या तिसरा टप्पा सुरू असून त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे. शहरातील एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी योजनेत स्वतंत्र निधी मिळेल असे ते म्हणाले. अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार शिरोळे यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा, असे मत व्यक्त केले. महापालिकेने स्वत:चा फंड तयार होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, त्यामुळे सरकार बदलले, योजनेत काही बदल झाले,निधीचा प्रश्न उभा राहिला तरी त्यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. ‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजीपुणे : केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या खासदार, आमदार व पक्षनेत्यांच्या बैठकीत मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेरीस यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्याचे ठरले.महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चर्चेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात घेऊन एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा यावर सोमवारी दुपारपर्यंत एकमताने निर्णय देऊ, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासनाला सांगितले. बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, नीलम गोऱ्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे आदी बैठकीला उपस्थित होते.आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वांना ‘स्मार्ट सिटी’ योजनेत प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. सध्या तिसरा टप्पा सुरू असून त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे. शहरातील एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी योजनेत स्वतंत्र निधी मिळेल असे ते म्हणाले. अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार शिरोळे यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा, असे मत व्यक्त केले. महापालिकेने स्वत:चा फंड तयार होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, त्यामुळे सरकार बदलले, योजनेत काही बदल झाले,निधीचा प्रश्न उभा राहिला तरी त्यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीसाठी सर्वपक्षीय खासदार, आमदार असे प्रथमच एकत्र आले होते. बापट यांनी या कामात कसलाही पक्षीय अभिनवेश नाही असे स्पष्ट केले, तरीही राष्ट्रवादी व काँग्रेस एका बाजूला, भाजप एकीकडे व मनसे, सेना वेगवेगळे असे चर्चेतून स्पष्ट दिसत होते. खासदार वंदना चव्हाण या बैठकीला उपस्थित नव्हत्या.स्थानिक कंपन्यांच्या समावेशाचा मुद्दा सेनेच्या गोऱ्हे यांनी उपस्थित करताच मनसेच्या राजेंद्र वागस्कर यांनी मनसेचे २८ नगरसेवकांना सोडून कोणालाच पुुढे जाता येणार नाही असे सांगितले. त्यावर बापट यांनी मोठा भाऊ, मोठा भाऊ अशी टिप्पणी करताच गोऱ्हे यांनी यावर वेगळी चर्चा होऊ शकते’ असे उत्तर दिले.एरिया डेव्हलमेंटच्या मुद्द्यावर सर्वांचे एकमत व्हावे अशी बापट यांची अपेक्षा होती. मात्र आमदार गोऱ्हे तसेच काँग्रेसचे पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्याला विरोध केला. याबाबत पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे, त्यामुळे थोडा कालावधी द्यावा असे ते म्हणाले. संमती द्यावी यासाठी पालक मंत्री गिरीश बापट सुरूवातीला आग्रही होते, मात्र गोऱ्हे यांनी वेळ द्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतल्यानंतर याबाबत सोमवारी निर्णय देऊ, असे आयुक्तांना सांगितले. सध्या तिसरा टप्पा सुरू असून एरिया डेव्हलपमेंटसाठी एखाद्या परिसराची निवड करायची आहेप्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे.