शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर उपसा तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:45 IST

गणेश मुळीक : २४ दिवस बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात ओढा खोलीकरणाच्या कामांना सुरवात झाली असून रिसे-पिसे, राजुरी या गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेतून खोलीकरणाची कामे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मंजूर केल्याची माहिती युवासेनेचे तालुका समन्वयक गणेश मुळीक यांनी दिली.

मुळीक म्हणाले, ‘‘रिसे-पिसेमधील ओढ्यावर असलेल्या सिमेंट नाला बंडिंगमधील गाळ काढण्याची एकूण ७ कामे पूर्ण झाली असून, ६ कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ६ लाख ४२ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत. यापूर्वीच्या ७ कामांवर ६ लाख रुपये खर्च झालेले आहेत. त्यामुळे ओढ्याची साठवण क्षमता चांगली वाढणार असून, त्याचा दोन्ही गावांतील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. जनाई-शिरसाई योजनेच्या पाण्याचा या ओढ्यात साठा केला जातो. राजुरी गावातील ४ खोलीकरणाच्या कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठी ८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येत आहे. पिसे गावचे सरपंच सोमनाथ मुळीक, रिसेच्या सरपंच नीता कामठे, माजी उपसरपंच मंजुळा हांडे, रमेश हांडे, राजुरीचे उपसरपंच विपुल भगत, माजी उपसरपंच कृष्णाजी भगत, अंकुश भगत व ग्रामस्थांनी या खोलीकरण कामाची मागणी केली होती. त्यानुसार राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.रब्बी पिके धोक्यात, लाभार्थी गावांची मागणीभुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेले २४ दिवस बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात आली आहेत. यामुळे ही योजना तातडीने सुरू करण्याची मागणी लाभार्थी गावांतील शेतकºयांनी केली आहे.

सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे रब्बी हंगामातील पाणी सुरू आहे. राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत येतात. यामुळे राज्य शासन उपसा सिंचण एकूण वीजबिलाच्या ८१ टक्के भार भरत असून लाभार्थी शेतकरी १९ टक्के रक्कम भरून पाणी घेत आहेत. यामुळे यंदा पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एवढ्या आडचणी कधीच आल्या नाहीत. मात्र, या वर्षी या योजनेचे योग्य नियोजन झाले नाही. यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले. योजना एक दिवसही बंद राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र, दीपावलीच्या सुटीत ही योजना बंद होती. त्यानंतर शिंदवणे येथे अचानक व्हॉल्व्ह सोडल्याने पुन्हा सुरळीत चालू असणारी योजना बंद पडली. त्यानंतर ५ डिसेंबरला माळशिरस वितरिकेचे पाणी राजेवाडी वितरिकेला दिल्याने जादा पाणी झाल्याने दाब येऊन राजेवाडी वितरिका तुटली. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले पाणी १५ डिसेंबरपासून बंद झाले. वास्तविक, पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुरुस्ती करणाºया विभागाने याकडे पूर्णत: काणाडोळा केला.नेत्यांच्या शिफारशी; अधिकाºयांची कसरत1दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाणीमागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पहिले पाणी कोणाला द्यायचे? या प्रश्नावर या योजनेच्या अधिकाºयांची तारेवरची कसरत झाली आहे. यासाठी स्थानिक नेत्यांच्या शिफारशी वाढत चालल्या आहेत.2 ही योजना बंद असताना कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे गळणारे एअरव्हॉल्व्ह आजतागायत कधीच दुरुस्त होत नाहीत. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. याचा भुर्दंड नियमित पैसे भरणाºया शेतकºयांच्या डोक्यावर पडतो.3देशात एकमेव इस्राईलच्या धर्तीवर ठिबक सिंचनाचा वापर करून नियोजनात असणाºया या योजनेची उर्वरित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे.4मुळा-मुठा नदीतून येणारे पाणी शुद्धीकरण करून ठिबक सिंचनाखाली आणून शेती करणे गरजेचे आहे. यामुळे आजही वंचित राहिलेले क्षेत्र ओलिताखाली येईल.

टॅग्स :Puneपुणे