शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

स्थायी समितीत वादाचा अखेर स्फोट

By admin | Updated: December 9, 2015 00:29 IST

स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष

पुणे : स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष अश्विनी कदम यांच्यात सभा सुरू असतानाच जोरदार शाब्दिक वादावादी झाली. परिणामी, भाजप सदस्यांनी सभात्याग केला, तर अध्यक्ष कदम कार्यालयातूनच निघून गेल्या.समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील तलाव भाडेतत्त्वावर देण्याचा विषय समितीमधील सुप्त वाद चव्हाट्यावर आणण्यास कारणीभूत ठरला. हा तलाव चालवण्याची निविदा यापूर्वी एकदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसादही मिळाला होता; मात्र काही कारणाने निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेने ३५ हजार रूपये निश्चित केले असताना ठेकेदाराने ४२ हजार रुपये पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे ही निविदा मंजूर करावी, असे शिळीमकर यांनी सभेत सुचवले त्याचा कदम यांना राग आला. त्यांनी ‘तुम्ही स्वत:ला समजता कोण? माझ्या प्रभागात लक्ष घालण्याचे कारण नाही’ असे सुनावले. यावर शिळीमकर यांनीही ‘मला पक्षाने शहराचे हित पाहण्यासाठी समितीत पाठविले आहे; त्यामुळे मला माझे काम करू द्या,’ असे प्रत्युत्तर दिले. बराच वेळ हा वाद सुरू होता.या गदारोळात हा विषय तब्बल १ महिना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान दोघांमधील वाद सुरूच होता. अन्य सदस्य तो थांबवण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र दोघेही ऐकत नव्हते. अखेरीस शिळीमकर यांनी सभात्याग करीत असल्याचे जाहीर केले. त्यांच्याबरोबरच भाजपचे सदस्य मुक्ता टिळक, श्रीकांत जगताप व सेनेच्या दीपाली ओसवाल यांनीही सभात्याग गेला. सदस्यांना अध्यक्षांनी याप्रमाणे अपमानास्पद वागणूक देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप सदस्यांनी व्यक्त केली. गेले काही महिने अध्यक्ष कदम व समितीच्या सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुुळेच मध्यंतरी एका सभेला एकही सदस्य उपस्थित राहिला नव्हता. एक प्रकारचा अघोषित बहिष्कारच सभेवर टाकण्यात आला होता. मंजूर झालेल्या अनेक विषयांवर अध्यक्षांकडून स्वाक्षरीच होत नाही, काही विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात असे सदस्यांचे म्हणणे आहे. तर, विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर लगेचच स्वाक्षरी केली जाते, काही विषयांची अध्यक्ष म्हणून प्रशासनाकडून माहिती घेणे आवश्यक वाटते, प्रशासनाकडून ही माहिती दिली जात नाही; त्यामुळे ते विषय प्रलंबित राहतात, असे कदम यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)