शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

स्थायी समितीत वादाचा अखेर स्फोट

By admin | Updated: December 9, 2015 00:29 IST

स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष

पुणे : स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष अश्विनी कदम यांच्यात सभा सुरू असतानाच जोरदार शाब्दिक वादावादी झाली. परिणामी, भाजप सदस्यांनी सभात्याग केला, तर अध्यक्ष कदम कार्यालयातूनच निघून गेल्या.समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील तलाव भाडेतत्त्वावर देण्याचा विषय समितीमधील सुप्त वाद चव्हाट्यावर आणण्यास कारणीभूत ठरला. हा तलाव चालवण्याची निविदा यापूर्वी एकदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसादही मिळाला होता; मात्र काही कारणाने निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेने ३५ हजार रूपये निश्चित केले असताना ठेकेदाराने ४२ हजार रुपये पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे ही निविदा मंजूर करावी, असे शिळीमकर यांनी सभेत सुचवले त्याचा कदम यांना राग आला. त्यांनी ‘तुम्ही स्वत:ला समजता कोण? माझ्या प्रभागात लक्ष घालण्याचे कारण नाही’ असे सुनावले. यावर शिळीमकर यांनीही ‘मला पक्षाने शहराचे हित पाहण्यासाठी समितीत पाठविले आहे; त्यामुळे मला माझे काम करू द्या,’ असे प्रत्युत्तर दिले. बराच वेळ हा वाद सुरू होता.या गदारोळात हा विषय तब्बल १ महिना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान दोघांमधील वाद सुरूच होता. अन्य सदस्य तो थांबवण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र दोघेही ऐकत नव्हते. अखेरीस शिळीमकर यांनी सभात्याग करीत असल्याचे जाहीर केले. त्यांच्याबरोबरच भाजपचे सदस्य मुक्ता टिळक, श्रीकांत जगताप व सेनेच्या दीपाली ओसवाल यांनीही सभात्याग गेला. सदस्यांना अध्यक्षांनी याप्रमाणे अपमानास्पद वागणूक देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप सदस्यांनी व्यक्त केली. गेले काही महिने अध्यक्ष कदम व समितीच्या सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुुळेच मध्यंतरी एका सभेला एकही सदस्य उपस्थित राहिला नव्हता. एक प्रकारचा अघोषित बहिष्कारच सभेवर टाकण्यात आला होता. मंजूर झालेल्या अनेक विषयांवर अध्यक्षांकडून स्वाक्षरीच होत नाही, काही विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात असे सदस्यांचे म्हणणे आहे. तर, विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर लगेचच स्वाक्षरी केली जाते, काही विषयांची अध्यक्ष म्हणून प्रशासनाकडून माहिती घेणे आवश्यक वाटते, प्रशासनाकडून ही माहिती दिली जात नाही; त्यामुळे ते विषय प्रलंबित राहतात, असे कदम यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)