शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

स्थायी समितीत वादाचा अखेर स्फोट

By admin | Updated: December 9, 2015 00:29 IST

स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष

पुणे : स्थायी समिती अध्यक्ष व अन्य सदस्यांमध्ये गेले काही महिने सुरू असलेल्या सुप्त वादाचा अखेर मंगळवारी स्फोट झाला. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राजेंद्र शिळीमकर व अध्यक्ष अश्विनी कदम यांच्यात सभा सुरू असतानाच जोरदार शाब्दिक वादावादी झाली. परिणामी, भाजप सदस्यांनी सभात्याग केला, तर अध्यक्ष कदम कार्यालयातूनच निघून गेल्या.समतानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलातील तलाव भाडेतत्त्वावर देण्याचा विषय समितीमधील सुप्त वाद चव्हाट्यावर आणण्यास कारणीभूत ठरला. हा तलाव चालवण्याची निविदा यापूर्वी एकदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याला प्रतिसादही मिळाला होता; मात्र काही कारणाने निविदा पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली. पालिकेने ३५ हजार रूपये निश्चित केले असताना ठेकेदाराने ४२ हजार रुपये पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे ही निविदा मंजूर करावी, असे शिळीमकर यांनी सभेत सुचवले त्याचा कदम यांना राग आला. त्यांनी ‘तुम्ही स्वत:ला समजता कोण? माझ्या प्रभागात लक्ष घालण्याचे कारण नाही’ असे सुनावले. यावर शिळीमकर यांनीही ‘मला पक्षाने शहराचे हित पाहण्यासाठी समितीत पाठविले आहे; त्यामुळे मला माझे काम करू द्या,’ असे प्रत्युत्तर दिले. बराच वेळ हा वाद सुरू होता.या गदारोळात हा विषय तब्बल १ महिना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान दोघांमधील वाद सुरूच होता. अन्य सदस्य तो थांबवण्याचा प्रयत्न करीत होते; मात्र दोघेही ऐकत नव्हते. अखेरीस शिळीमकर यांनी सभात्याग करीत असल्याचे जाहीर केले. त्यांच्याबरोबरच भाजपचे सदस्य मुक्ता टिळक, श्रीकांत जगताप व सेनेच्या दीपाली ओसवाल यांनीही सभात्याग गेला. सदस्यांना अध्यक्षांनी याप्रमाणे अपमानास्पद वागणूक देणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप सदस्यांनी व्यक्त केली. गेले काही महिने अध्यक्ष कदम व समितीच्या सदस्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुुळेच मध्यंतरी एका सभेला एकही सदस्य उपस्थित राहिला नव्हता. एक प्रकारचा अघोषित बहिष्कारच सभेवर टाकण्यात आला होता. मंजूर झालेल्या अनेक विषयांवर अध्यक्षांकडून स्वाक्षरीच होत नाही, काही विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जातात असे सदस्यांचे म्हणणे आहे. तर, विषय मंजूर झाल्यानंतर त्यावर लगेचच स्वाक्षरी केली जाते, काही विषयांची अध्यक्ष म्हणून प्रशासनाकडून माहिती घेणे आवश्यक वाटते, प्रशासनाकडून ही माहिती दिली जात नाही; त्यामुळे ते विषय प्रलंबित राहतात, असे कदम यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)