शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणात दडली होती असामान्य प्रतिभा, सराफ यांनी जागवल्या श्रीदेवीच्या आठवणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 19:25 IST

व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्या वागण्यातून तिचा निगर्वीपणा जाणवला तर ती जमिनीवर आहे असे म्हणायला हवे...ती तशीच होती...साधी सरळ आणि मेकअप शिवाय बघितली तर लक्षातही येणार नाही इतका साधेपणा तिच्यात होता...

 पुणे- व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्या वागण्यातून तिचा निगर्वीपणा जाणवला तर ती जमिनीवर आहे असे म्हणायला हवे...ती तशीच होती...साधी सरळ आणि मेकअप शिवाय बघितली तर लक्षातही येणार नाही इतका साधेपणा तिच्यात होता...आजही त्या आठवणींना ३० नाही तर ३ वर्षांचा ताजेपणा आहे. ...पुण्याच्या मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रॉचे संस्थापक सदस्य प्रमोदकुमार सराफ अभिनेत्री श्रीदेवीच्या आठवणी जागवत होते. रविवारची सकाळ भारतीय सिनेरसिकांसाठी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी घेऊनच उगवली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने साऱ्यांनाच हळहळ वाटली. अनेक जण आपल्या लाडक्या 'चांदनी'च्या आठवणींवर प्रकाश टाकत होते. त्यातील एक नाव म्हणजे मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्रॉचे प्रमोदकुमार सराफ. साधारण १९८७साली पुरस्कार सोहळे किंवा रियालिटी शो असं काहीही नसल्याने सिनेकलाकारांना कार्यक्रम करण्यासाठी ऑर्केस्ट्रॉच्या कार्यक्रमाशिवाय पर्याय नसायचा. याला श्रीदेवी यासुद्धा अपवाद नव्हत्या. त्यांना भारताबाहेर अनेक कार्यक्रमांची निमंत्रणे येत होती. मात्र एकटीने दोन तासांचा शो करणे अशक्य असल्याने त्यांनी मेलडी मेकर्ससोबत दौरे काढण्यास सुरुवात केली. याबाबत सराफ यांना विचारले असता त्यांनी त्यावेळच्या तालमी जुहू येथील हॉलिडे इन हॉटेलमध्ये चालायचे असे सांगितले. पुढे ते म्हणाले की, श्रीदेवी साध्या तर होत्याच पण प्रचंड कष्टाळू होत्या. सच्चा कलाकाराकडे लागणारी जिद्द आणि चिकाटी त्यांच्यात पुरेपूर होती. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्याकडून नृत्याचे धडे घेताना अनेकदा सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंतही त्यांचा सराव सुरु असायचा.त्यावेळीही कोणतीही नवी गोष्ट शिकताना त्यांचा उत्साह वाखडण्याजोगा असायचा असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. दौऱ्यात त्यांच्यासोबत आई आणि बहीणही असायच्या. मात्र तरीही प्रत्येक सहकाऱ्याला काय हवं नको याकडे त्यांचे व्यक्तिशः लक्ष असायचे. कितीही वेळ तालम चालली तरी तितक्याच थकणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.  नागीन चित्रपटातलं गाणं सादर करताना त्यांना अक्षरशः जमिनीवर लोळण घ्यावी लागायची. त्याप्रकारचे नागीन नृत्य करतानाही त्या अत्यंत सहजपणे वावरत असायच्या. त्यांच्या प्रत्येक नृत्यानंतर प्रेक्षक प्रचंड खुश असायचे. त्याकाळात इतकी प्रसिद्धी मिळाल्यावरही रंगमंचावर त्यांचं स्वतःला झोकून काम करणं सुरूच होतं. सादरीकरणासाठी रंगमंच असो किंवा सत्तर एम.एम.चा पडदा. श्रीदेवी त्यांच्यातल्या वेगळेपणामुळे कायमच उठून दिसल्या यात शंका नाही.-----------------

भाषेचा अडसर नाहीच !श्रीदेवी यांची जन्मभाषा तामिळ होती. त्यामुळे हिंदी आणि काही वेळा इंग्रजीही बोलताना त्यांना अडचण यायची. पण तरीही कलेची भाषा आत्मसात केल्यामुळे त्या जमेल तशी आणि समोरच्याला समजेल अशा भाषेत त्या बोलत होत्या असेही सराफ यांनी सांगितले.