शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

क्रीडा शिक्षकांचे असहकार्य

By admin | Updated: October 15, 2015 01:13 IST

शिक्षकांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांच्या शिक्षकांनाच कात्री लावण्याच्या शासननिर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी

पुणे : शिक्षकांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांच्या शिक्षकांनाच कात्री लावण्याच्या शासननिर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी शारीरिक शिक्षकांनी सणस मैदानावरील शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बुधवारी सणस मैदानावर एकही स्पर्धा झाली नाही. विद्यार्थ्यांच्या स्पर्धांना आपला विरोध नसून, स्पर्धा घेण्यासाठी ही यंत्रणा नाही व त्यासाठीही शारीरिक शिक्षकच आवश्यक आहेत, हे दाखवून देण्यासाठी स्पर्धांना असहकार्य केल्याचे मत उपस्थित क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केले.जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण मंडळ पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपासून पुणे शहर आंतरशालेय मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार होती. बुधवारी १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा होणार होत्या. यासाठी शहरातील विविध शाळांतील शारीरिक शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. तब्बल १,५०० विद्यार्थी उपस्थित होते; मात्र शासनाने क्रीडा/शारीरिक शिक्षकांना कमी करण्याविषयी अध्यादेश काढल्याने या शिक्षकांनी स्पर्धांना असहकार्य करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, हा शासननिर्णय बालकांच्या व उद्याच्या भावी पिढीच्या आरोग्य व सुदृढतेच्या दृष्टीने घातक आहे. मुलांच्या नैसर्गिक खेळण्याच्या ऊर्मीलाच डावलले जाणार आहे. अभ्यासाच्या तणावातून खेळाद्वारे मुक्त होता येते; मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. अध्यादेश काय आहे ?शासनाच्या अध्यादेशानुसार, राज्यातील सहावी ते आठवीच्या शंभरपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी आता या विषयांचे शिक्षकच असणार नाहीत, तर मोठ्या शाळांमध्ये या विषयाचे अतिथी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कला, क्रीडा व कार्यानुभव या क्षेत्रांत शहराचे किंवा गावाचे नाव उज्ज्वल केलेल्या व्यक्तींमधून मानधन न स्वीकारणाऱ्या व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. मानधन न घेता काम करणारे शिक्षक मिळाले नाहीत तर मानधन देणार आहे.या शिक्षकांना प्रतितास ५० रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. महिन्याचे कमाल मानधन अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये, असेही शासनाने म्हटले आहे. शंभरपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना या शिक्षकांसाठीचे मानधन शासकीय तिजोरीतून मिळणार नाही. लोकसहभागातून किंवा सीएसआरच्या माध्यमातून छोट्या शाळांनी मानधनाची सोय करायची आहे.अतिथी शिक्षकाकडून सातत्य मिळणार का ?अतिथी शिक्षक हा कोणता तरी खेळाडू असेल. स्वयंसेवा म्हणून तो येणार. त्यात सातत्य असेलच याची काय खात्री? शिवाय, निश्चित केलेला अभ्यासक्रम शिकविण्याची त्यांच्यात क्षमता असेलच याबाबतही कोण ठरवणार? या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार. याची भरपाई कशी होईल, असेही मत व्यक्त केले जात होते.पालकही शिक्षकांच्या बाजूनेस्पर्धा अचानक रद्द झाल्याने सुरुवातीला पालक वैतागले होते. विद्यार्थ्यांना वेठीस धरून हे प्रकार करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रीडा शिक्षकांची बाजू समजून पाठिंबा देता येईल का, यासाठी प्रयत्न करण्याचे मत व्यक्त केले.