शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

स्मरणिकेतून उलगडणार भाषासंस्कृतीचे अनुबंध; बडोदा साहित्य संमेलनात होणार प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:58 IST

महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे.

ठळक मुद्देस्मरणिकेच्या ३,००० हून अधिक प्रतींची केली जाणार छपाई गुजरातमधील साहित्य परंपरा आणि मराठी अनुवाद आदी विषयांवर टाकण्यात आला प्रकाश

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : महाराष्ट्र आणि गुजरात यांनी अनेक दशकांपासून साहित्यिक आणि सांस्कृतिक अनुबंध जोपासले आहेत. या अनुबंधांच्या आठवणी आणि साहित्यिक-सांस्कृतिक देवाण-घेवाणीची झलक स्मरणिकेच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. बडोदा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी या अनोख्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. स्मरणिका मराठीमध्ये प्रकाशित होणार असून, गुजराथी भाषेत तिचा अनुवाद करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेल्या बडोदानगरीत १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलन म्हटले, की स्मरणिकेबाबत उत्सुकता असतेच. विविध लेखांनी माहितीपूर्ण अशी स्मरणिका साहित्यरसिकांच्या आवडीचा विषय असतो. यंदाच्या संमेलनात प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चंद्रशेखर अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या समितीने स्मरणिकेतील लेखांचे संकलन केले असून, उषा तांबे या समितीच्या मार्गदर्शक आहेत. स्मरणिकेच्या ३,००० हून अधिक प्रतींची छपाई केली जाणार आहे.स्मरणिकेमध्ये बडोद्यातील साहित्यिकांचे लेखक, गुजरातमधील साहित्य परंपरा, गुजराती साहित्य आणि मराठी अनुवाद आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मृणालिनी कामत, चंद्रकांत नाशिककर, क्रिश्मा करोगल, डॉ. धनंजय मुजुमदार, जयश्री जोशी, सुषमा लेले आदी लेखकांनी भाषा, साहित्य, संस्कृतीच्या विविध पैलूंवर आपल्या लेखनातून भाष्य केले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला समृद्ध साहित्यिक वारसा लाभला आहे. 

१६ फेब्रुवारीला स्मरणिकेचे प्रकाशनसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी, १६ फेब्रुवारी रोजी स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाला उपस्थित राहावे, यासाठी आयोजक संस्था उत्सुक आहे. या प्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते रघुवीर चौधरी, गुजराथी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सीतांशू यशश्चंद्र प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये १९२१मध्ये बडोद्याला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. नरहर चिंतामणी केळकर हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे १९३२ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या संमेलनाचे सयाजीराव गायकवाड अध्यक्ष होते. न. चिं. केळकर आणि सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षीय भाषणांचा समावेश स्मरणिकेमध्ये करावा, अशी सूचना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे करण्यात आली आहे. भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अनुबंध दोन राज्यांनी पूर्वीपासून वृद्धिंगत केले आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी तेथील साहित्य-संस्कृतीला चालना देत दूरदृष्टीने काम केले. या समृद्ध इतिहासाची झलक स्मरणिकेत पाहायला मिळणार असल्याची माहिती मराठी वाङ्मय परिषदेचे दिलीप खोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Baroda Sahitya Samelanबडोदा साहित्य संमेलनPuneपुणे