शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

सोनपावलांनी आली गौराई; घरोघरी पंचपक्वानांचा नैवेद्य

By admin | Updated: September 21, 2015 14:44 IST

गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते.

पुणे : गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते. पहिल्या दिवशी तिला भाजीभाकरीचा नैवैद्य दाखवतात. लाडू, चिवडा, करंजी असे फराळाचे पदार्थ करून तिचे कोडकौतुक केले जाते. गणपतीबरोबरच तिची मनोभावे आरती केली जाते. भाद्रपद षष्ठी ही गौरी म्हणजेच महालक्ष्मी बसविण्याची तिथी असते. दुसऱ्या दिवशी गौरीजेवण. म्हणजेच १५ भाज्या, विविध कोशिंबिरी आणि गोडधोडाचे जेवण. यातही पुरणपोळीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असते. भाद्रपद महिन्यात शेती पिकांनी फुललेली असल्याने गौरीला वेगवेगळी फुले आणि पत्री वाहण्याची प्रथा आहे. यात केवडा, दवणा, शमी, कमळफूल याचा समावेश असतो. गौरी जेवणाच्या दिवशी संध्याकाळी नातेवाईक, आप्तेष्ट यांना गौरीच्या हळदी-कुंकवासाठी आमंत्रण दिले जाते. त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. मग तिसऱ्या दिवशी या गौरी सर्वांचे मन प्रसन्न करून गणपतीसोबत निरोप घेतात. या दिवशी दहीभात आणि खीर याचा नैवेद्य असतो.