शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
5
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
6
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
7
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
8
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
9
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
10
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
11
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
12
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
13
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
14
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
15
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
16
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
17
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
18
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
19
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
20
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
Daily Top 2Weekly Top 5

‘सोमेश्वर’ने आडमुठे धोरण दूर ठेवावे

By admin | Updated: January 2, 2015 23:28 IST

कायदेशीररीत्या ‘एफआरपी’ द्या; अन्यथा कारवाई करू, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. कारखाने मात्र एफआरपी देणे टाळत आहेत. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले.

सतीश काकडे - बारामतीकायदेशीररीत्या ‘एफआरपी’ द्या; अन्यथा कारवाई करू, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. कारखाने मात्र एफआरपी देणे टाळत आहेत. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. साखरेबरोबर उपपदार्थही विकले जात आहेत. यामुळे ऊसउत्पादक सभासदांना कारखान्यांनी एफआरपी देणे शक्य आहे. यासाठी कारखान्यांनी आडमुठेपणाचे धोरण दूर ठेवावे. कारखान्यांनी कायद्याप्रमाणे ‘एफआरपी’ द्यावी. एफआरपी देणे शक्य आहे, अशी शेतकरी कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. मात्र, जाणीवपूर्वक साखरेचे दर घसरले आहेत. बँकेने कमी मूल्यांकन केले आहे. कारखाने शॉर्ट मार्जिणमध्ये आहेत, अशी चुकीची कारणे देत आहेत. ज्या कारखान्यांचे सहवीज प्रकल्प आहेत, त्यांना तर दहा वर्षांसाठी परचेस टॅक्स माफ आहे. मात्र, ज्या कारखान्यांचे उपपदार्थ प्रकल्प नाहीत, अशा कारखान्यांचाही परचेस टॅक्स माफ केला आहे. तसेच, मोलासीसवर आंतरराज्य बंदी उठविली आहे. बगॅसचे दर वाढणार आहेत. हा फायदाही कारखान्यांना होणार आहे. सध्याची कारखान्यांचा आजचा साखर उतारा पाहता जिल्ह्यातील कारखान्यांना एक टन उसाला साखरेचे सव्वा पोते मिळत आहे. मात्र, हे कारखादार १०० किलो साखरेचाच हिशेब सांगतात. वरील २५ किलो साखरेचे मूल्यांकन कारखादार करतच नाहीत. केंद्र सरकारने इथेनॉलचे दर ६ रुपयांनी वाढविले, सहवीज प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या विजेला ६ रुपये १२ पैसे दर दिला. अशा अनेक प्रकारे कारखान्यांना फायदा रोख स्वरूपात होणार असल्याने यामधून कारखादार एफआरपी देऊ शकतात. यासाठी केंद्र व राज्य सरकारची गरज नाही. संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा४साखर कारखाने एफआरपी देत नसतील, तर सरकारने अशा कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. साखर आयुक्तांनीही प्रत्येक कारखान्यांचे आरआरसी तयार करून कायदेशिररीत्या तो आरआरसीचे अहवाल प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. ४जे कारखाने एफआरपी देत नाहीत, अशा कारखान्यांची खाती गोठविणे, साखर जप्त करणे, मालमत्ता जप्त करणे, असे अधिकार साखर आयुक्तांना आहेत. मालमत्ता जप्त करून साखर आयुक्त एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांना अदा करू शकतात. कायद्यातील तरतुदीप्रमाणे संचालक मंडळावर ते गुन्हे दाखल करू शकतात. गेल्या वर्षीचे केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या दृष्टीने निष्क्रिय होते. कारखाने मोडून पैसे नकोतशेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या धोरणांना वैयक्तिक माझा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचा विरोध आहे. पाटील यांची पहिल्या हप्त्याबाबत मागणी अवास्तव आहे; मात्र कारखानदारांनी कारखाने मोडून पैसे द्यावेत, अशी आमची भूमिका नाही. कारखाने मोडून पैसे नकोत, सहकारी कारखानदारी टिकली पाहिजे. खासदार शेट्टी यांची भूमिका रास्त आहे. त्यांनी मागणी केलेली २७०० रुपयांची एफआरपी रास्त आहे. ही एफआरपी एकरकमी देताना केंद्र सरकारने अनुदान स्वरूपात २०० ते ३०० रुपये मदत केल्यास, २७०० रुपये एफआरपी मिळू शकते. एफआरपी देण्यात काहीही अडचण नाही४शेतकऱ्यांबद्दलची भूमिका चुकीची होती. सहकार आणि शेतकरी खड्ड्यात घालण्याची भूमिका आघाडी सरकारची होती. आघाडी सरकारने जे १५ वर्षांत केले नाही, ते सध्याच्या केंद्र सरकारने अवघ्या ६ महिन्यांत केले. ४यामध्ये इथेनॉलचे दर वाढविले. सहवीज प्रकल्पातील विजेचे युनिटचे दर वाढविले. साखर निर्यातीला परवानगी देऊन त्याला अनुदानही दिले, तर राज्य सरकारने ऊस खरेदीकर माफ केल्याने याचा सर्व कारखान्यांना फायदा झाला. या सर्व कारणांमुळे कारखान्यांना एफआरपी देण्यात काहीही अडचण होऊ शकत नाही.