शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

धायरीची वाहतूककोंडी सोडवा..!

By admin | Updated: January 15, 2015 00:16 IST

धायरी उड्डाणपूल कार्यान्वीत होऊनही सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.

पुणे : धायरी उड्डाणपूल कार्यान्वीत होऊनही सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे पालिकेचे नगरसेवक, अधिकारी व वाहतूक पोलिसांनी एकत्रित येऊन धायरीतील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत आपल्या दारी’च्या व्यासपीठावर आज केली. त्या वेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. प्रभाग क्र. ५४ मधील धायरी फाटा, गावठाण, गणेशनगर व सनसिटी येथील नागरिकांच्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ हा कार्यक्रम मुक्ताई गार्डन येथे बुधवारी झाला. त्यावेळी स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, वृक्ष संवर्धन समिती सदस्य मिलिंद पोकळे, सहायक आयुक्त जयंत भोसेकर, पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) एम. जी. काळे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे, विभागीय आरोग्य निरीक्षक गणेश कांबळे, उपअभियंता संजय पागे, जयंत नाझरे, अतिक्रमण विभागाचे शशीकांत टाक आदी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘आक्रमक पत्रकारिता करीत असतानाच लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांमध्ये संवादाचा पूल बांधणे ही ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमामागील कल्पना आहे. नागरिकांना समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ यामुळे मिळाले आहे.’’ (प्रतिनिधी)