शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:31 IST

समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत.

पुणे : समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर कथा व्यक्तिजीवनाकडून समूहजीवनाकडे चालली आहे. लेखनावर वास्तववादाचे आक्रमण होत असताना मानवी जीवनाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी केले.दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने प्रा. मिलिंद जोशी लिखित ‘खेळ’ या कथासंग्रहाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते झाले. कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास लेखक आणि संगीतकार आशुतोष जावडेकर, प्रकाशक राजीव बर्वे उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील दि जिनियस या संस्थेच्या कलावंतांनी या निवडक कथांचे अभिवाचन केले.सासणे म्हणाले, ‘‘समाजाला निद्रस्त करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. सध्या माणूस अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. बदलत्या काळात साहित्यात आव्हाने निर्माण झाली, तशी कथेची रूपेही बदलत गेली. कथेतून माणसाच्या आणि समाजाच्या व्यथांवर भाष्य केले जाते. मनोविश्लेषणात्मक आणि आस्थेवाईक कथांची, व्यक्तिजीवनाबद्दल बोलणाऱ्या कथांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून लेखनाला वैश्विक उंची प्राप्त होऊ शकेल.’’प्रकाशक राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. अनुज बर्वे यांनी आभार मानले.१ आशुतोष जावडेकर म्हणाले, मराठीसारखे वैविध्य, समृद्धी इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठीत कमी प्रमाणात का असेना, कथांचे चित्र आशादायी आहे. मल्टिपल स्क्रीनच्या जमान्यात कथेतील गोष्ट मात्र हरवत चालली आहे. साहित्य हा साच्याविरोधात चाललेला अविरत संघर्ष आहे. कथासंग्रहात सुसूत्रता नसावी; मात्र, साचेबद्धपणा नसावा.२ मिलिंद जोशी म्हणाले, कथा ही कल्पना आणि वास्तवाचा खेळ असते. जीवनातील व्यामिश्रता लक्षात घेता, कथेच्या माध्यमातून ठरावीक कंगोºयातून जीवनाचे दर्शन घडवणे हे आव्हान असते. लेखक कथांमधून जीवनाचा अन्वयार्थ मांडतो. माणूस हा नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू असतो. दुभंगलेली मने, हरवलेला संवाद आणि विस्कटलेली नाती हे आजचे चित्र आहे. या परिस्थितीत नात्यातील अवकाश राखणे, आसक्ती अथवा विरक्तीकडे न जाता सुवर्णमध्य काढून नात्यातील संबंध दृढ करावा.कोणत्याही चौकटीत लिहिणारा, अथवा विशिष्ट पालखी वाहणारा लेखक असूच शकत नाही. चौकटीबाहेर विचार करणारा, वास्तव जोखणारा आणि व्यापक दृष्टीने पाहणारा खरा लेखक असतो. संवेदना जपणारा, आतमध्ये थोडे रडू जिवंत असलेला माणूसच लेखक होऊ शकतो. मराठी साहित्य जातीवाद, धर्मवाद, प्रदेशवादात अडकले असताना तटस्थ लिहिणारे, खुल्या अवकाशात वावरणारे लेखक वर्षानुवर्षे लक्षात राहतात.- राजन खान

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या