शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 02:31 IST

समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत.

पुणे : समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर कथा व्यक्तिजीवनाकडून समूहजीवनाकडे चालली आहे. लेखनावर वास्तववादाचे आक्रमण होत असताना मानवी जीवनाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी केले.दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने प्रा. मिलिंद जोशी लिखित ‘खेळ’ या कथासंग्रहाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते झाले. कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास लेखक आणि संगीतकार आशुतोष जावडेकर, प्रकाशक राजीव बर्वे उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील दि जिनियस या संस्थेच्या कलावंतांनी या निवडक कथांचे अभिवाचन केले.सासणे म्हणाले, ‘‘समाजाला निद्रस्त करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. सध्या माणूस अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. बदलत्या काळात साहित्यात आव्हाने निर्माण झाली, तशी कथेची रूपेही बदलत गेली. कथेतून माणसाच्या आणि समाजाच्या व्यथांवर भाष्य केले जाते. मनोविश्लेषणात्मक आणि आस्थेवाईक कथांची, व्यक्तिजीवनाबद्दल बोलणाऱ्या कथांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून लेखनाला वैश्विक उंची प्राप्त होऊ शकेल.’’प्रकाशक राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. अनुज बर्वे यांनी आभार मानले.१ आशुतोष जावडेकर म्हणाले, मराठीसारखे वैविध्य, समृद्धी इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठीत कमी प्रमाणात का असेना, कथांचे चित्र आशादायी आहे. मल्टिपल स्क्रीनच्या जमान्यात कथेतील गोष्ट मात्र हरवत चालली आहे. साहित्य हा साच्याविरोधात चाललेला अविरत संघर्ष आहे. कथासंग्रहात सुसूत्रता नसावी; मात्र, साचेबद्धपणा नसावा.२ मिलिंद जोशी म्हणाले, कथा ही कल्पना आणि वास्तवाचा खेळ असते. जीवनातील व्यामिश्रता लक्षात घेता, कथेच्या माध्यमातून ठरावीक कंगोºयातून जीवनाचे दर्शन घडवणे हे आव्हान असते. लेखक कथांमधून जीवनाचा अन्वयार्थ मांडतो. माणूस हा नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू असतो. दुभंगलेली मने, हरवलेला संवाद आणि विस्कटलेली नाती हे आजचे चित्र आहे. या परिस्थितीत नात्यातील अवकाश राखणे, आसक्ती अथवा विरक्तीकडे न जाता सुवर्णमध्य काढून नात्यातील संबंध दृढ करावा.कोणत्याही चौकटीत लिहिणारा, अथवा विशिष्ट पालखी वाहणारा लेखक असूच शकत नाही. चौकटीबाहेर विचार करणारा, वास्तव जोखणारा आणि व्यापक दृष्टीने पाहणारा खरा लेखक असतो. संवेदना जपणारा, आतमध्ये थोडे रडू जिवंत असलेला माणूसच लेखक होऊ शकतो. मराठी साहित्य जातीवाद, धर्मवाद, प्रदेशवादात अडकले असताना तटस्थ लिहिणारे, खुल्या अवकाशात वावरणारे लेखक वर्षानुवर्षे लक्षात राहतात.- राजन खान

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या