शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

समाज संवेदनाहीन झालाय

By admin | Updated: February 21, 2017 03:08 IST

समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ

पुणे : समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही. याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. मुक्ता दाभोलकर, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी, मुक्तीवादी संघटनेचे शैलेश सावंत, कॉ. शांताताई रानडे, लता भिसे तसेच महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, सदस्य दीपक गिरमे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहराध्यक्ष माधव गांधी, चित्रलेखा जेम्स, अनीश पटवर्धन उपस्थित होते. मानवतावादी विचारवंतांना संपविण्याची धर्ममार्तंडांची भाषा अधिक धारदार होऊ पाहत आहे. मात्र कार्यकर्ते हा डाव हाणून पाडतील आणि तथाकथित विविध धर्ममार्तंडांवर वचक बसवतील, असे प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. तर सरकारला खुनी आणि सूत्रधार शोधायचेच नाहीत  असे संपलेल्या कालावधीतून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)हत्येला झाले ४२ महिने पूर्ण४डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे, कॉ. गोविंद पानसरेंच्या दोन वर्षे, तर प्रा. डॉ. कलबुर्गी यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या विचारवंतांच्या खून प्रकरणामध्ये आणि मडगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून फरार असलेले सारंग अकोलकर, विनय पवार यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यांना त्वरित पकडण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली.