शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समाजाने जागते व्हावे

By admin | Updated: February 16, 2016 01:08 IST

शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील.

पिंपरी : शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील. मात्र, समाजाने जागते व्हावे. आत्महीनता नव्हे, तर आत्मगौरव निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. देशातील शिक्षण क्षेत्रातील प्रयोगांचा समावेश शिक्षानीतीत करावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात सोमवारी केली.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आयोजित एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, मुकुल कानिटकर (नागपूर), रवींद्र शर्मा, (आदिलाबाद), इंदुमती काटदरे (अहमदाबाद), महेश शर्मा (झाबूआ), विश्वेश्वर शास्त्री द्रविड (वाराणसी), हेमेंद्र शहा, शांतीलाल मुथा, डॉ. वामनराव गोगटे (पुणे), सुनील देशपांडे (लवादा), रमेश पतंगे (मुंबई), डॉ. भीमराव गस्ती (बेळगाव), लक्ष्मीबाई गोरडे, शशिकला मेहता (पिंपरी-चिंचवड) यांचा गौरव करण्यात आला.‘दहा वर्षांपूवी याच ठिकाणी मी कार्यक्रमास आलो होतो, त्या वेळी केलेली कल्पना आज साकारताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रातला हा उत्तम प्रयोग आहे,’ असे सांगून भागवत म्हणाले, ‘‘मानवाच्या मुलांना शिक्षण देणे आवश्यक असते. पशूंना शिक्षण द्यावे लागत नाही. ते सहज सान्निध्याने उपलब्ध होते. मरेपर्यंत जीवन बऱ्यापैकी जगला, अशा व्यक्तीला काहीही विचार नसतो. त्याच्यापुढे आत्महत्येचाही विचार नसतो. जगतो की मरतो, याचेही त्याला काही घेणे-देणे नसते. विचार नावाची प्रवृत्ती पशूंना नसते. ती माणसाला असते. सगळीच माणसं माणसासारखी जगतातच, असे नाही. त्यांना माणसासारखे जगायला शिकवावे लागते. संवेदनाक्षम मन, सर्वगामी विवेकी बुद्धी, प्रतिभा ज्ञान, करुणा, आत्मीयता शिक्षणातून मिळायला हवी.’’भटक्या समाजाचा विसर पडलाभागवत म्हणाले, ‘‘भटका समाज आमचा आहे, याचा आम्हालाच विसर पडला. लढणारे हे लोक आहेत. सत्ताकारणी लोकांनी अशा स्वाभिमानी लोकांचे खच्चीकरण करण्याचे काम केले म्हणून काही जण उत्तर जहाजातून दूर देशी जाऊन तिथे नवा भारत उभा केला. देशातच राहिले त्यांना याद्यांतून काढून टाकले. अशा समाजांना पुनरपी आत्मीयता, अनुभव देऊन त्यांना आत्मगौरव मिळू देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.’’आळशी पुंडलिक नसावा‘जगात मान उंचावण्यालायक काही निर्माण झालं, त्यात मी होतो. हे भाग्य आपल्या ठायी येण्यासाठी प्रयत्न करावा. ‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’ यानुसार पुंडलिका भेटी परब्रह्म आले. परंतु, पुंडलिक निर्बुद्ध, आळशी असेल तर, असे भागवत यांनी म्हणताच हास्यलाट उसळली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना दहा वर्षांपूवी झाली. भटक्या विमुक्त जातीतील मुलांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. सध्या ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सव झाला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्था आणि व्यक्तींचा गौरवही करण्यात आला. (प्रतिनिधी)