शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

समाजाने जागते व्हावे

By admin | Updated: February 16, 2016 01:08 IST

शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील.

पिंपरी : शिक्षण पद्धती बदलण्याच्या दृष्टीने शिक्षण नीती तयार करण्याचे काम सरकार करीत आहे. शासन, प्रशासन हलतील, तेव्हा हलतील. मात्र, समाजाने जागते व्हावे. आत्महीनता नव्हे, तर आत्मगौरव निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. देशातील शिक्षण क्षेत्रातील प्रयोगांचा समावेश शिक्षानीतीत करावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात सोमवारी केली.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आयोजित एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे आदी उपस्थित होते.या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, मुकुल कानिटकर (नागपूर), रवींद्र शर्मा, (आदिलाबाद), इंदुमती काटदरे (अहमदाबाद), महेश शर्मा (झाबूआ), विश्वेश्वर शास्त्री द्रविड (वाराणसी), हेमेंद्र शहा, शांतीलाल मुथा, डॉ. वामनराव गोगटे (पुणे), सुनील देशपांडे (लवादा), रमेश पतंगे (मुंबई), डॉ. भीमराव गस्ती (बेळगाव), लक्ष्मीबाई गोरडे, शशिकला मेहता (पिंपरी-चिंचवड) यांचा गौरव करण्यात आला.‘दहा वर्षांपूवी याच ठिकाणी मी कार्यक्रमास आलो होतो, त्या वेळी केलेली कल्पना आज साकारताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रातला हा उत्तम प्रयोग आहे,’ असे सांगून भागवत म्हणाले, ‘‘मानवाच्या मुलांना शिक्षण देणे आवश्यक असते. पशूंना शिक्षण द्यावे लागत नाही. ते सहज सान्निध्याने उपलब्ध होते. मरेपर्यंत जीवन बऱ्यापैकी जगला, अशा व्यक्तीला काहीही विचार नसतो. त्याच्यापुढे आत्महत्येचाही विचार नसतो. जगतो की मरतो, याचेही त्याला काही घेणे-देणे नसते. विचार नावाची प्रवृत्ती पशूंना नसते. ती माणसाला असते. सगळीच माणसं माणसासारखी जगतातच, असे नाही. त्यांना माणसासारखे जगायला शिकवावे लागते. संवेदनाक्षम मन, सर्वगामी विवेकी बुद्धी, प्रतिभा ज्ञान, करुणा, आत्मीयता शिक्षणातून मिळायला हवी.’’भटक्या समाजाचा विसर पडलाभागवत म्हणाले, ‘‘भटका समाज आमचा आहे, याचा आम्हालाच विसर पडला. लढणारे हे लोक आहेत. सत्ताकारणी लोकांनी अशा स्वाभिमानी लोकांचे खच्चीकरण करण्याचे काम केले म्हणून काही जण उत्तर जहाजातून दूर देशी जाऊन तिथे नवा भारत उभा केला. देशातच राहिले त्यांना याद्यांतून काढून टाकले. अशा समाजांना पुनरपी आत्मीयता, अनुभव देऊन त्यांना आत्मगौरव मिळू देण्यासाठी प्रयत्न करायला हवा.’’आळशी पुंडलिक नसावा‘जगात मान उंचावण्यालायक काही निर्माण झालं, त्यात मी होतो. हे भाग्य आपल्या ठायी येण्यासाठी प्रयत्न करावा. ‘पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा’ यानुसार पुंडलिका भेटी परब्रह्म आले. परंतु, पुंडलिक निर्बुद्ध, आळशी असेल तर, असे भागवत यांनी म्हणताच हास्यलाट उसळली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना दहा वर्षांपूवी झाली. भटक्या विमुक्त जातीतील मुलांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते. सध्या ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. त्या निमित्ताने एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सव झाला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. संस्था आणि व्यक्तींचा गौरवही करण्यात आला. (प्रतिनिधी)