शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

सामाजिक कामाला प्रतिष्ठा हवी - भरत वाटवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:15 IST

समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते.

पुणे : समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात. याला समाज जबाबदार नाही तर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा दृष्टिकोन कारणीभूत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवाणी यांनी व्यक्त केले.पूना सिटीझन डॉक्टर फोरमतर्फे डॉ. भरत वाटवाणी यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मंदा आमटे, डॉक्टर अरुण गद्रे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व शारदा बापट यांनी डॉ. वाटवानी यांची मुलाखत घेतली.भरत वाटवानी यांनी सांगितले, देशातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये महिला आणि पुरुषांचे प्रमाण सारखेच आहे. पण एकूण व्यवस्थेमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात घराबाहेर पडत असल्यामुळे स्किझोफ्रेनियामुळे विपन्नावस्थेत रस्त्यावर फिरणारे पुरुष जास्त आढळून येतात. तर उलटपक्षी स्किझोफ्रेनियाग्रस्त महिला मात्र घरात असल्यामुळे त्यांच्या आजाराविषयी फार वाच्यता होत नाही. मी या आजाराविषयीचे सेवा केंद्र दहिसर येथे सुरू केले, त्यावेळी त्या परिसरातील लोकांनी मला खूप विरोध केला. ते माझ्या विरोधात न्यायालयातदेखील गेले. आजही मानसिक व्याधींचा स्वीकार आपल्याकडे खुलेपणाने केला जात नाही, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. समाज मनोरुग्णांना स्वीकारायला तयार नसल्याने त्यांच्यावरील उपचार, त्यांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.समाजामध्ये देणगी देणारे खूप लोक आहेत; परंतु त्यांचा मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रहदूषित आहे. अनेक जण शिक्षण, महिला सबलीकरण यासाठी देणगी देतात; परंतु आजही समाजामध्ये मानसिक आजार याबद्दल जनजागृती होण्याची गरज आहे, असे वाटवानी यांनी सांगितले. समाजाच्या विविध घटकांसाठी झोकून देऊन काम करणारे आमटे कुटुंबीय हीच माझ्या कार्याची प्रेरणा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.सामाजिक कार्यात करुणा हा महत्त्वाचा धागाकरुणा हा समाजसेवकाच्या मनाचा स्थायीभाव असतो. तेच त्याच्या कार्याची प्रेरणा असते. बाबांच्या मनात हीच प्रेरणा जागृत झाल्याने आनंदवनआणि हेमलकसा यासारखे प्रकल्प उभे राहिले.करुणा हाच दोन समाजसेवकांमधील समान धागा असतो. वाटवानींसारख्या भारावलेल्या तरुणांमुळे बाबा खूप प्रभावित व्हायचे.करुणा आणि इतरलोकांबद्दल वाटणारे दु:ख जर संपले तर तुमच्यातील सामाजिक कार्यकर्ता हीसंपून जातो, असे प्रकाश आमटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या