शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सामाजिक कामाला प्रतिष्ठा हवी - भरत वाटवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 03:15 IST

समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते.

पुणे : समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात. याला समाज जबाबदार नाही तर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा दृष्टिकोन कारणीभूत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवाणी यांनी व्यक्त केले.पूना सिटीझन डॉक्टर फोरमतर्फे डॉ. भरत वाटवाणी यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मंदा आमटे, डॉक्टर अरुण गद्रे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व शारदा बापट यांनी डॉ. वाटवानी यांची मुलाखत घेतली.भरत वाटवानी यांनी सांगितले, देशातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये महिला आणि पुरुषांचे प्रमाण सारखेच आहे. पण एकूण व्यवस्थेमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात घराबाहेर पडत असल्यामुळे स्किझोफ्रेनियामुळे विपन्नावस्थेत रस्त्यावर फिरणारे पुरुष जास्त आढळून येतात. तर उलटपक्षी स्किझोफ्रेनियाग्रस्त महिला मात्र घरात असल्यामुळे त्यांच्या आजाराविषयी फार वाच्यता होत नाही. मी या आजाराविषयीचे सेवा केंद्र दहिसर येथे सुरू केले, त्यावेळी त्या परिसरातील लोकांनी मला खूप विरोध केला. ते माझ्या विरोधात न्यायालयातदेखील गेले. आजही मानसिक व्याधींचा स्वीकार आपल्याकडे खुलेपणाने केला जात नाही, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. समाज मनोरुग्णांना स्वीकारायला तयार नसल्याने त्यांच्यावरील उपचार, त्यांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.समाजामध्ये देणगी देणारे खूप लोक आहेत; परंतु त्यांचा मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रहदूषित आहे. अनेक जण शिक्षण, महिला सबलीकरण यासाठी देणगी देतात; परंतु आजही समाजामध्ये मानसिक आजार याबद्दल जनजागृती होण्याची गरज आहे, असे वाटवानी यांनी सांगितले. समाजाच्या विविध घटकांसाठी झोकून देऊन काम करणारे आमटे कुटुंबीय हीच माझ्या कार्याची प्रेरणा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.सामाजिक कार्यात करुणा हा महत्त्वाचा धागाकरुणा हा समाजसेवकाच्या मनाचा स्थायीभाव असतो. तेच त्याच्या कार्याची प्रेरणा असते. बाबांच्या मनात हीच प्रेरणा जागृत झाल्याने आनंदवनआणि हेमलकसा यासारखे प्रकल्प उभे राहिले.करुणा हाच दोन समाजसेवकांमधील समान धागा असतो. वाटवानींसारख्या भारावलेल्या तरुणांमुळे बाबा खूप प्रभावित व्हायचे.करुणा आणि इतरलोकांबद्दल वाटणारे दु:ख जर संपले तर तुमच्यातील सामाजिक कार्यकर्ता हीसंपून जातो, असे प्रकाश आमटे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या