शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

एसएमएस आले; नाव गायब

By admin | Updated: June 28, 2015 00:05 IST

इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस

पिंपरी : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस येऊनही प्रवेश यादीत नावच नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन दिवसांत याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या. या विद्यार्थ्यांना हा एसएमएस कसा आला, याबाबत केंद्रीय प्रवेश समितीने नेमलेल्या मार्गदर्शन केंद्रांवरही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दुसऱ्या यादीची वाट बघा असेच अधांतरी उत्तर त्यांना मिळाले.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशाची आॅनलाईन गुणवत्ता यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर यादीत समावेश असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाविद्यालयाचा कोड नंबर पाठविण्यात आला. तांत्रिक बाजू एमकेसीएलतर्फे सांभाळली जात आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्याची जबाबदारीही एमकेसीएलवर आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. मात्र, या यादीत एसएमएस आलेल्या काही विद्यार्थ्यांची नावेच नसल्याचे समोर आले आहे. शनिवारी पहिल्या यादीतील प्रवेशाचा अखेरचा दिवस असल्याने गरवारे महाविद्यालयात चौकशीसाठी आले होते. (प्रतिनिधी)अशाही तक्रारी... अडचणी...पहिल्या यादीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू होती. पण, त्याचबरोबर अनेक तक्रारीही येत होत्या. प्रवेशावेळी काही अडचणींना विद्यार्थी व पालकांना सामोरे जावे लागले. एक विद्यार्थी जयपूर, तर दुसरा बीड येथून प्रवेशासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नव्हता. प्रवेशावेळी दाखला आवश्यकच असल्याने त्यांना सुरुवातीला प्रवेश मिळणार नाही, असे सांगण्यात आले. पण, काही वेळाने या अडचणीतून मार्ग काढण्यात आला. तसेच मूळ जातप्रमाणपत्र नसल्यामुळेही काही विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. काही विद्यार्थिनी लांबचे महाविद्यालय मिळाले असल्याच्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश हवा, ते विनानुदानित आहे, वसतिगृहाची सुविधा नाही, पाहिजे तो विषय नाही अशा विविध तक्रारी काहींनी केल्या. पण, माहितीपुस्तिकात पुरेशी माहिती देण्यात आली असून, ती नीट न वाचताच पसंतिक्रम भरल्याने या अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.तन्वी घोरपडे या विद्यार्थिनीलाही पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचा एसएमएस आला होता. पण, प्रत्यक्ष यादीत तसेच प्रवेशाच्या संकेतस्थळावर तपासणी केले असता तिचे पहिल्या यादीत नाव नसल्याचे समोर आले. ती वडिलांसह गरवारेमध्ये चौकशी करण्यासाठी आली असता तेथील केंद्रीय समितीच्या प्रतिनिधींनाही ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे ती गोंधळून गेली होती. तिला दुसऱ्या यादीची वाट पाहण्यास सांगण्यात आले. ‘दोन दिवसांपासून याबाबत चौकशी सुरू आहे, पण काहीच कळत नाही. एसएमएस येऊनही यादीत नाव नाही,’ असे तन्वीने सांगितले.