शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

एसएमएस आले; नाव गायब

By admin | Updated: June 28, 2015 00:05 IST

इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस

पिंपरी : इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाल्याचे एसएमएस आले. पण, त्यातील काही विद्यार्थ्यांना एसएमएस येऊनही प्रवेश यादीत नावच नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन दिवसांत याबाबत अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या. या विद्यार्थ्यांना हा एसएमएस कसा आला, याबाबत केंद्रीय प्रवेश समितीने नेमलेल्या मार्गदर्शन केंद्रांवरही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. दुसऱ्या यादीची वाट बघा असेच अधांतरी उत्तर त्यांना मिळाले.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशाची आॅनलाईन गुणवत्ता यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर यादीत समावेश असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या महाविद्यालयाचा कोड नंबर पाठविण्यात आला. तांत्रिक बाजू एमकेसीएलतर्फे सांभाळली जात आहे. विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्याची जबाबदारीही एमकेसीएलवर आहे. प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आली आहे. मात्र, या यादीत एसएमएस आलेल्या काही विद्यार्थ्यांची नावेच नसल्याचे समोर आले आहे. शनिवारी पहिल्या यादीतील प्रवेशाचा अखेरचा दिवस असल्याने गरवारे महाविद्यालयात चौकशीसाठी आले होते. (प्रतिनिधी)अशाही तक्रारी... अडचणी...पहिल्या यादीतील प्रवेशाचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी धावपळ सुरू होती. पण, त्याचबरोबर अनेक तक्रारीही येत होत्या. प्रवेशावेळी काही अडचणींना विद्यार्थी व पालकांना सामोरे जावे लागले. एक विद्यार्थी जयपूर, तर दुसरा बीड येथून प्रवेशासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नव्हता. प्रवेशावेळी दाखला आवश्यकच असल्याने त्यांना सुरुवातीला प्रवेश मिळणार नाही, असे सांगण्यात आले. पण, काही वेळाने या अडचणीतून मार्ग काढण्यात आला. तसेच मूळ जातप्रमाणपत्र नसल्यामुळेही काही विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. काही विद्यार्थिनी लांबचे महाविद्यालय मिळाले असल्याच्या तक्रारी घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश हवा, ते विनानुदानित आहे, वसतिगृहाची सुविधा नाही, पाहिजे तो विषय नाही अशा विविध तक्रारी काहींनी केल्या. पण, माहितीपुस्तिकात पुरेशी माहिती देण्यात आली असून, ती नीट न वाचताच पसंतिक्रम भरल्याने या अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.तन्वी घोरपडे या विद्यार्थिनीलाही पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचा एसएमएस आला होता. पण, प्रत्यक्ष यादीत तसेच प्रवेशाच्या संकेतस्थळावर तपासणी केले असता तिचे पहिल्या यादीत नाव नसल्याचे समोर आले. ती वडिलांसह गरवारेमध्ये चौकशी करण्यासाठी आली असता तेथील केंद्रीय समितीच्या प्रतिनिधींनाही ठोस उत्तर देता आले नाही. त्यामुळे ती गोंधळून गेली होती. तिला दुसऱ्या यादीची वाट पाहण्यास सांगण्यात आले. ‘दोन दिवसांपासून याबाबत चौकशी सुरू आहे, पण काहीच कळत नाही. एसएमएस येऊनही यादीत नाव नाही,’ असे तन्वीने सांगितले.