शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पीएमपीची सेवा हवी स्मार्ट

By admin | Updated: July 17, 2017 04:22 IST

दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या त्या ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहोचवतात, अशा सुविधा पुणे शहरात दिसत नाही. काळाची गरज आणि मागणीप्रमाणे नागरिकांना बसची सुविधा मिळायला हवी. पीएमपीचा दर्जा सुधारायला हवा तसेच जुन्या बसेस बंद व्हायला हव्यात. नियोजित वेळेत, स्वच्छ आणि सुरक्षित बससेवा पुण्यासारख्या स्मार्ट शहरात असायला हवी, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी केले. पीएमपी प्रवासी मंचतर्फे स्मार्ट पुणे-स्मार्ट व सुरक्षित पीएमपी हा विषय घेऊन इंद्रधनुष्य सभागृह येथे पीएमपी प्रवासी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवाडिया यावेळी उपस्थित होते. यावेळी पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या अनिल घुले, रोहन निघोजकर, निळकंठ मांढरे, यतिश देवाडिगा, जयदीप साठे, वैभव कामथ, माधुरी जाधव, देवधर, दत्तानंद कुलकर्णी, विपुल पाटील यांना मोफत पास देऊन सन्मान करण्यात आला. पीएमपी सक्षम व्हावी, यासाठी पीएमपीच्या समस्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र जगताप म्हणाले, पीएमपीच्या अ‍ॅप सोबतच बसस्टॉपवर देखील बसबाबत माहिती असायला हवी. देशातील कोणत्याही शहरात बस वापरासाठी एकच युनिव्हर्सल कार्ड असायला हवे, तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक बसदेखील वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रथम प्राथमिक स्तरावर बस आणल्या जातील. या बस ८ ते ९ तास चालतात. तसेच एका वेळी ३०० किलोमीटर अंतर जाऊ शकतात. मोहन सीतापुरे म्हणाले, की डीएसके विश्व धायरी येथे जवळपास २५ हजार रहिवासी आहेत. मध्यवस्तीतून तेथे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत. या बस त्वरित सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मूकबधिर प्रवाशांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या