शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

स्मार्ट सिटीमुळे महापालिकेच्या अधिकारांवर गंडांतर नको

By admin | Updated: December 8, 2015 00:15 IST

स्मार्ट सिटी व्हायला हवी; मात्र त्यासाठी पालिकेच्या अधिकारांवर गंडातर नको, पालिकेची स्वायत्तता ठेवलीच पाहिजे, असाच बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांचा सूर आहे

पुणे : स्मार्ट सिटी व्हायला हवी; मात्र त्यासाठी पालिकेच्या अधिकारांवर गंडातर नको, पालिकेची स्वायत्तता ठेवलीच पाहिजे, असाच बहुसंख्य पदाधिकारी व नगरसेवकांचा सूर आहे. प्रशासनाने या योजनेसाठी तयार केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी ९ डिसेंबरला (बुधवार) पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा होत असून, त्यात यावरूनच चर्चा होण्याची चिन्हे आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी पीएमपीएल, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी प्राधिकरण, पुणे परिसर विकासासाठी पीएमआरडीए व आता नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या मेट्रोसाठीही स्वतंत्र कंपनी यामुळे महापालिकेचे अधिकार मर्यादित होत चालले आहेत, असे पदाधिकाऱ्यांना वाटते आहे.आता स्मार्ट सिटी योजनेसाठीही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येईल. त्यामुळे पालिकेला काही कामच शिल्लक ठेवायचे नाही, असेच सरकारचे धोरण दिसत असल्याचे त्यांचे मत झाले आहे. त्यामुळे प्रस्तावात कंपनीचा उल्लेख असेल, तर त्याला ठाम विरोध व उल्लेख नसला, तरीही पुढे कंपनी स्थापन करण्यास मनाई, अशी अट टाकून मान्यता असा पवित्रा घेण्याचे काही प्रमुख नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तशी चर्चा त्यांच्यात सुरू असल्याची माहिती मिळाली.पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तळ्यातमळ्यात सुरू आहे. तर काँग्रेसने योजनेत विशेष आर्थिक तरतुदी नसल्याबाबत जाहीर टीका केली आहे. केंद्र सरकारची योजना असल्यामुळे पालिकेतील भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक या योजनेच्या बाजूचे आहेत. शिवसेनेने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा योजनेतील काही गोष्टींना जाहीर विरोध आहे. रिपाइंचे पालिकेत फार मोठे संख्याबळ नसले, तरीही त्यांच्याकडूनही स्मार्ट सिटीमध्ये झोपडपट्टी व वंचित घटकांचा काहीच विचार नसल्याची टीका होत आहे. यातून प्रस्ताव मान्यतेसाठीच्या ९ तारखेच्या विशेष सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. पालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे व या योजनेत मिळणार ५ वर्षांत ५०० कोटी रूपये यावरही अनेकांचा आक्षेप आहे. योजनेत एरिया डेव्हलपमेंट म्हणून एका विशिष्ट परिसराचा विकास करायचा आहे. त्यासाठी तब्बल १ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा विकसित भागावर वेगळा कर लागला जाण्याचीही शक्यता या योजनेत आहे. कंपनी स्थापन झाली, तर असा कर लावण्यासाठी पालिकेच्या परवानगीची गरज लागणार नाही, असे नगरसेवकांना वाटते. हा विषयही सभेत गाजण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)प्रस्तावाचा अभ्यास सुरू आहेप्रशासनाने त्यांचा प्रस्ताव दिला आहे, त्यावर लगेचच मत व्यक्त करणे योग्य नाही. अनेक नव्या गोष्टी होत असतात, त्यात काही चुकीचे असेल, तर चर्चेतून ते सुधारले जाईल. सभा त्यासाठीच आहे. वेगळा कर लावणे अशा गोष्टी नक्की काय आहेत, त्याचा अभ्यास करायला हवा.- दत्तात्रय धनकवडे, महापौर अनेक तरतुदी चुकीच्याप्रस्ताव वाचला, त्यात अनेक चुकीच्या गोष्टी आहेत. कंपनी स्थापन करून काम करण्याचा पालिकेचा अनुभव चांगला नाही. यात पालिकेचे अधिकार कमी होतील, हे स्पष्ट आहे. पैसे कसे उभे करायचे, याबाबत प्रस्तावात काहीही स्पष्ट नाही. किती खर्च येणार, हे दिलेले असले, तरी त्या खर्चाचे विवरण नाही. - आबा बागुल, उपमहापौर