शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेसाठी लहान विद्यापीठांची निर्मिती गरजेची

By admin | Updated: March 20, 2017 04:14 IST

देशातील विद्यापीठांची संख्या सुमारे ७१५ असून, या विद्यापीठांचा व्याप मोठा आहे. त्यामुळेच देशातील विद्यापीठांची गणना जागतिक विद्यापीठांच्या यादीत होत

देशातील विद्यापीठांची संख्या सुमारे ७१५ असून, या विद्यापीठांचा व्याप मोठा आहे. त्यामुळेच देशातील विद्यापीठांची गणना जागतिक विद्यापीठांच्या यादीत होत नाही, असे नमूद करून खेडकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या सुमारे ७००च्या घरात आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या कुलगुरूंची आणि अधिकाऱ्यांची शक्ती या महाविद्यालयांचे प्रश्न सोडविण्यातच खर्ची होते. परिणामी मोठ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना विद्यापीठाची आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे देशभरात सुमारे ४ ते ५ हजार लहान-लहान विद्यापीठांची निर्मिती होणे आवश्यक आहे. अमेरिका व चीन यासारख्या देशांमध्ये लहान विद्यापीठांची संख्या मोठी असल्यानेच या देशातील अधिकाधिक विद्यापीठांची गणना जागतिक विद्यापीठांच्या यादीत होत आहे.खेडकर म्हणाले, विद्यापीठांचा पसारा लहान असल्यामुळे कुलगुरूंना विकासकामे करणे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे सहज शक्य होते. तसेच संशोधनाशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात संशोधनासाठी अधिकाधिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसेच प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे.शासकीय विद्यापीठांबरोबरच खासगी व अभिमत विद्यापीठे शिक्षण क्षेत्रात मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. अलीकडच्या काळात या विद्यापीठांमधील विद्यापीठांचे प्रवेश शासनामार्फत केले जात आहेत. त्यामुळे या विद्यापीठांसमोर निधी उभा करण्याचे मोठे आव्हान आहे, असे नमूद करून खेडकर म्हणाले, देशातील आयआयटी, आयआयएम यासारख्या संस्थामध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी परदेशात जातात. शासनाकडून या संस्थांमधील विद्यार्थ्यांवर मोठा खर्च केला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा उपयोग देशाच्या विकासाला हातभार लावून घेण्यासाठी कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे.‘एमबीए’विषयी बोलताना खेडकर म्हणाले, जागतिक मंदीमुळे ‘एमबीए’च्या विद्यार्थ्यांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. परंतु , आता परिस्थिती बदलली आहे त्यामुळे व्यवस्थापन क्षेत्रात काम करत देशाचे आणि जगाचे नेतृत्व करण्याची संधी एमबीएच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनातर्फे डिजिटल इंंडिया, स्टार्ट अप, स्किल इंडिया यासारख्या महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. देशात तरुणांची संख्या जास्त असल्याने या योजनांचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाल्याशिवाय उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढणार नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.नवीन विद्यापीठ कायद्याबाबत खेडकर म्हणाले, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात अनेक महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठातील निर्णयप्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमधून नवे नेतृत्व उभे राहू शकेल अशी अपेक्षाही खेडकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)