शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महामार्ग चौपदरीकरणाचे संथ काम ठरतेय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:50 IST

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम, अपघातप्रवण क्षेत्रात सूचनाफलकांचा अभाव, रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे पुणे-नाशिक मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

सचिन कांकरियानारायणगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे संथ गतीने सुरू असलेले काम, अपघातप्रवण क्षेत्रात सूचनाफलकांचा अभाव, रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे पुणे-नाशिक मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या ८ महिन्यांमध्ये या मार्गावर २१ अपघात होऊन जवळपास ३१ जणांचा मृत्यू झाला आहे़पुणे ते नाशिक हा प्रवाशांसाठी महत्त्वाचा रस्ता मानला जातो़ या मार्गावरील अपघातांच्या मालिकांमुळे हा रस्ता धोकादायक झाला आहे. नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर-पुणे एसटीच्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले होते़ यातील अनेक जखमी आजही उपचार घेत आहेत़ राष्ट्रीय महामार्ग क्ऱ ५० असलेल्या या रस्त्याचे दुसºया टप्प्याचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे़ चौपदरीकरणापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६२ यांच्याकडे देखरेखीसाठी ठेवण्यात आला होता़ मात्र चौपदरीकरणाचे काम सुरू होण्याआधीच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आला़. खेड ते सिन्नर या दुसºया टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. खेड ते चाळकवाडी ४९.३ कि़ मी़ चा रस्ता असून, त्यापैकी बाह्यवळणाचे २६.९ कि़ मी़ चे काम प्रलंबित आहे. काही भागांत काम सुरू आहे तर काही भागात ठप्प आहे़ सध्या वाहनचालक चौपदरीकरण असलेल्या २२.४ किमीने ये-जा करत आहेत, तर उर्वरित बाह्यवळण असलेले २६.९ किमी काम बाकी असल्याने जुन्या रस्त्याने प्रवाशांना प्रवास करावा लागतो. जुन्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वारंवार वाहनांचे अपघात होऊन अनेकांना मृत्यूस सामोरे जावे लागले, तर शेकडो वाहनचालक अपघात होऊन ते जखमी झाले आहेत़ बºयाच वाहनचालकांना गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झालेले आहे़ दि. १ जानेवारी २०१७ पासून ते दि़ ३० आॅगस्ट २०१७ अखेर एकूण २१ अपघात होऊन ३१ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे़ राष्ट्रीय महामार्गावर अनेक सुविधांचा अभाव असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे़ सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जुन्या महामार्गावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत़ हा रस्ता दुरुस्त करण्याची तसदी राष्ट्रीय प्राधिकरण विभाग घेत नाही़ एसटी अपघातात ९ जणांचा बळी जाऊनदेखील अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही़ प्राधिकरणाने चाळकवाडी येथे टोलनाका सुरू करून दिला; परंतु अद्याप अनेक सुविधा दिलेल्या नाहीत़अपघात झाल्यास क्रेनची व्यवस्था तसेच अ‍ॅम्ब्युलन्स सुविधा टोलवर उपलब्ध नाही़ अपघात झाल्यास प्रवाशांना रुग्णालयात नेण्याची जबाबदारी टोल कंपनीची आहे़ असे असताना देखील दि़ २८ आॅगस्ट रोजी झालेल्या एसटी व आयशर टेम्पोच्या अपघातात टोलचालकाकडून कोणतीही सुविधा पुरविली गेली नाही़ याबाबत नागरिकांमध्य संताप व्यक्त होत आहे.साईडपट्ट्या खचल्याजुन्या रस्त्यालगत साईडपट्ट्या पावसामुळे निघून गेलेल्या आहेत. यामुळे देखील वारंवार अपघात होतात़ याकडे देखील राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष आहे़ ज्या भागात वारंवार अपघात घडतात, त्या भागात अपघात ठिकाणांची माहिती दर्शविणे आवश्यक आहे़ मात्र, याकडेदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनी यांचे दुर्लक्ष केले आहे. ८ महिन्यांमध्ये ३१ प्रवाशांचा मृत्यू होऊ नदेखील प्राधिकरण व टोलचालक रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे़ चाळकवाडीयेथील टोलनाका दि़ २१ फेब्रुवारी २०१७ पासून सुरू करण्यात आला. प्रवाशांना टोल भरावा लागतो. असे असताना प्रवाशांनी खड्डे असलेल्या रस्त्यासाठी टोल भरावा का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.