शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

बासमती निर्यातीची सहा राज्यांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:22 IST

काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ

पुणे : काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. ही मागणी कायम ठेवण्यासाठी व बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाना, आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यातूनच बासमती तांदूळ निर्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तांदळाचा नवीन हंगाम पंधरा दिवसांत सुरु होत आहे.भारतात बहुतेक सर्वच भागात तांदळाचे उत्पादन होते.यामध्ये उत्तर भारतातील राज्ये बासमती तांदूळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील तांदळाला प्रामुख्याने बासमतीला जगभरातून चांगली मागणी आहे. परंतु बासमती तांदळामध्ये होणारी भेसळ व दर्जा कायम ठेवण्यासाठी व हाबासमती आयात करणा-या देशाकडून तो नाकारण्याचे प्रमाण करण्यासाठी देशातील सहाच राज्यातील बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. अन्य राज्यातील तांदूळ हा ‘नॉन बासमती’ म्हणून निर्यात होणार असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या या निर्णयामुळे मुळे मात्र बासमती व नॉन बासमतीचे दर कमी होऊ शकतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.भारतातून तांदळाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु निर्यात वाढत असताना बासमती तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जाण्याचे प्रकारही वाढत आहे. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरभारतीय कृषी अनुसंधान संस्थेने सरसकट बासमती निर्यात करण्यास बंदी घातली आहे, असेही शहा यांनी सांगितले.