शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बासमती निर्यातीची सहा राज्यांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:22 IST

काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ

पुणे : काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. ही मागणी कायम ठेवण्यासाठी व बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाना, आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यातूनच बासमती तांदूळ निर्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तांदळाचा नवीन हंगाम पंधरा दिवसांत सुरु होत आहे.भारतात बहुतेक सर्वच भागात तांदळाचे उत्पादन होते.यामध्ये उत्तर भारतातील राज्ये बासमती तांदूळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील तांदळाला प्रामुख्याने बासमतीला जगभरातून चांगली मागणी आहे. परंतु बासमती तांदळामध्ये होणारी भेसळ व दर्जा कायम ठेवण्यासाठी व हाबासमती आयात करणा-या देशाकडून तो नाकारण्याचे प्रमाण करण्यासाठी देशातील सहाच राज्यातील बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. अन्य राज्यातील तांदूळ हा ‘नॉन बासमती’ म्हणून निर्यात होणार असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या या निर्णयामुळे मुळे मात्र बासमती व नॉन बासमतीचे दर कमी होऊ शकतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.भारतातून तांदळाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु निर्यात वाढत असताना बासमती तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जाण्याचे प्रकारही वाढत आहे. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरभारतीय कृषी अनुसंधान संस्थेने सरसकट बासमती निर्यात करण्यास बंदी घातली आहे, असेही शहा यांनी सांगितले.