शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

बासमती निर्यातीची सहा राज्यांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:22 IST

काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ

पुणे : काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. ही मागणी कायम ठेवण्यासाठी व बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाना, आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यातूनच बासमती तांदूळ निर्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तांदळाचा नवीन हंगाम पंधरा दिवसांत सुरु होत आहे.भारतात बहुतेक सर्वच भागात तांदळाचे उत्पादन होते.यामध्ये उत्तर भारतातील राज्ये बासमती तांदूळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील तांदळाला प्रामुख्याने बासमतीला जगभरातून चांगली मागणी आहे. परंतु बासमती तांदळामध्ये होणारी भेसळ व दर्जा कायम ठेवण्यासाठी व हाबासमती आयात करणा-या देशाकडून तो नाकारण्याचे प्रमाण करण्यासाठी देशातील सहाच राज्यातील बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. अन्य राज्यातील तांदूळ हा ‘नॉन बासमती’ म्हणून निर्यात होणार असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या या निर्णयामुळे मुळे मात्र बासमती व नॉन बासमतीचे दर कमी होऊ शकतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.भारतातून तांदळाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु निर्यात वाढत असताना बासमती तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जाण्याचे प्रकारही वाढत आहे. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरभारतीय कृषी अनुसंधान संस्थेने सरसकट बासमती निर्यात करण्यास बंदी घातली आहे, असेही शहा यांनी सांगितले.