शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:48 IST

सुतारपाडा येथे मंगळवार दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना लागोपाठ चावे घेऊन गंभीर जखमी केल्याने परिसरात एकच घबराट पसरली.

तलासरी : सुतारपाडा येथे मंगळवार दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना लागोपाठ चावे घेऊन गंभीर जखमी केल्याने परिसरात एकच घबराट पसरली. काकड्या वळवी, राजेश उंबरसडा, नवसाद अली, शमू शाह, चैतु डावरे, संती हडळ या सहा जणांना हे कुत्रे एका पाठोपाठ चावत सुटल्याने भीतीने महिलांनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन घरात आश्रय घेतला गंभीर जखमी झालेल्या या सहा जणांना नागरिकांनी तात्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना बलसाड येथील रुग्णालयात हलविले. सध्या या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा उपद्रव वाढला आहे, रात्री एकट्याने फिरणे धोकादायक झाले आहे. पिसाळलेला हा कुत्रा अजून मोकाट फिरत आहे.>नालासोपाऱ्यात कुत्री सर्वाधिक : वसई विरार पालिका आता हा भटक्या कुत्र्याचा विषय गंभीरतेने घेत असली तरी देखील आता फार उशीर झाला असल्याचे बोलले जात आहे. वसई तालुक्यातील लोकसंख्येत, अनधिकृत बांधकामात, गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या नालासोपारा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या देखील प्रथम क्रमांकावर आहे.परिणामी कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांना ये-जा करणे मुश्किल केले आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे व त्यावर काम सुरु आहे असे पालिकेने सांगितले आहे. मात्र अजून ते कधी पूर्ण होणार हे स्पष्ट झाले नसल्याने कुत्र्यांची दहशत कायम आहे.>वसई-विरारमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत सुरूचविरार : वसई-विरार मध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरवर नियंत्रण ठेवण्यात पालिका हतबल होताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये पालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे आता भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणा बाहेर गेली आहे. याचाच त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना जीव देखील गमवावे लागले. विरार, नालासोपारा, वसई च्या गलो गल्लीत भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. भटक्या कुत्र्यांचे हल्लेही लोकांवर दिवसेंदिव वाढतच चालले आहेत. पालिकेने अधिकृतपणे आतापर्यंत श्वानगणना केली नसली तरी ३५ हजारांहून अधिक भटकी कुत्री आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना रस्त्यावरून चालणे भटक्या कुत्र्यांनी कठीण केले आहे. शहराच्या काही भागात नाक्या-नाक्यावर रात्रीच्या वेळेस चोरांसारखे भटके कुत्रे अगदी टोळीने उभे असतात. दुचाकी आली की त्यांच्या मागे हे कुत्रे एका मागून एक धावू लागतात. यामुळे अपघातही घडले आहेत. पालिकेच्या रुग्णालयानुसार गेल्या ६ महिन्यात ३ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला असून खाजगी रुग्णालयाची आकडेवारी यात जोडली तर हि संख्या दुप्पट होईल. दर महिन्याला हजार लोकांना तरी हे कुत्रे चावे घेत असल्याचा अंदाज आहे. पालिकेने पाचही प्रभाग समित्यांमध्ये किमान दोन-दोन श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करून एकाचवेळी प्रभावीपणे निर्बिजीकरणाची मोहीम राबविल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. गेल्या सहा वर्षात पालिकेचे एकमेव श्वाननिर्बिजीकरण केंद्र नवघर पूर्व येथे चालू आहे. पालिकेने पाच ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्याचा ठराव साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी केला होता. मात्र पुढे त्याची अंमलबजावणी झाली तर नाहीच मात्र जे होते त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे.