शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

अभिजित कोळपे इन्ट्रो पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ...

अभिजित कोळपे

इन्ट्रो

पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रत्येक प्रयत्नात त्यामुळे यश मिळाले. या परीक्षेत ''ज्ञाना''बरोबरच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन (प्रॅक्टिकल अप्रोच) ठेवून सातत्याने ''लेखन'' सराव फार महत्त्वाचा आहे. या बाबींचे तंतोतंत पालन करीत मार्गक्रमण केल्याने सलग तीन परीक्षेत यश मिळाले. पहिल्या प्रयत्नात ५०३ रँक, दुसऱ्या प्रयत्नात ३६१ वी रँक तर चौथ्या प्रयत्नात १५१ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे पंढरपूरचे अभयसिंह देशमुख सांगतात. महाराष्ट्र कॅडरमध्येच त्यांची निवड झाली आहे. सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण संस्थेत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात पदवी मिळवलेले अभयसिंह देशमुख हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे. आई-वडील दोघेही शेतकरी. त्यांनी हवे ते करण्यासाठी पहिल्यापासून स्वातंत्र्य आणि भक्कम पाठिंबा दिला. २०१५ ला सिविल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरुवातीला एक वर्ष एल अँड टी कंपनीत काम केले. त्यानंतर मित्रांचा सल्ला, मार्गदर्शनात यूपीएससीची तयारी सुरू केली.

ग्रुप स्टडीमुळे ८ जण झाले आयएएस, आयपीएस

अभयसिंह सांगतात, आम्ही ८ मित्रांनी मिळून पुण्यात एक फ्लॅट घेतला होता. बिल्डिंगजवळच अभ्यासिका आणि खानावळ होती. त्यामुळे अनावश्यक वाया जाणारा वेळ वाचायचा. आम्ही सर्व मित्र स्वयं अभ्यासाबरोबरच ग्रुप स्टडी करायचो. सातत्याने चालू-घडामोडी, पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सी-सॅट, जनरल स्टडीज तसेच वैकल्पिक विषय आदींची तयारी ग्रुप स्टडीमधून करायचो. त्यामुळे वेळेचे बचत होऊन अभ्यासाची गुणवत्ता वाढत होती. त्याचा आमच्या संपूर्ण ग्रुपला फायदा झाला. ग्रुपमधील ५ जणांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तर ३ जणांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली.

६० प्रश्नपत्रिका सोडवल्या

यूपीएससीची मुख्य परीक्षा ही ‘ज्ञाना’पेक्षा ‘लेखन’ सरावाची परीक्षा अधिक आहे. माझा वैकल्पिक विषय मानववंश शास्त्र होता. मी वैकल्पिक आणि सामान्य अध्ययनाबरोबरच निबंध असे जवळपास ६० प्रश्नपत्रिका सोडवल्या. तसेच प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर ते वरिष्ठांकडून तपासून घ्यायचो. नंतर रात्री रूमवर मित्रांबरोबर प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर चर्चा करायचो. त्यामुळे याचा आम्हाला अंतिम परीक्षेत खूप फायदा झाल्याचे अभयसिंह देशमुख सांगतात.

लहान वयात विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका; पदवी पातळीवर अभ्यास सुरू करा

आपल्याकडे शालेय किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक पातळीवर विनाकारण ''बाऊ'' केला जातो. मला आजही अनेक पालकांचे फोन येतात. ते म्हणतात आमचा मुलगा अथवा मुलगी आता ८ वी, ९ वीत किंवा १२ वीत आहे, तर यूपीएससीची तयारी कशी करायची. मी त्या सर्वांना हेच सांगतो, की एवढ्या लवकर या परीक्षेची तयारी करायची गरज नाही. सध्या ते जे शालेय स्तरावर आहेत ते व्यवस्थित करू द्या. विनाकारण ''बाऊ'' केल्यास लहान वयात विद्यार्थी दबाव घेतात. त्यामुळे त्यांच्या शालेय पातळीवरच्या परीक्षेवर वाईट परिणाम होतो. मी स्वतः सिविल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तसेच पूर्ण फोकसने अभ्यास केल्याने मला प्रत्येक परीक्षेत यश मिळत गेले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विनाकारण लहान वयात दबाव टाकू नये, असे अभयसिंह देशमुख सांगतात.

फोटो : अभयसिंह देशमुख (आयपीएस)

(एज्यू कनेक्ट पानासाठी मुलाखत)