शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

अभिजित कोळपे इन्ट्रो पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ...

अभिजित कोळपे

इन्ट्रो

पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रत्येक प्रयत्नात त्यामुळे यश मिळाले. या परीक्षेत ''ज्ञाना''बरोबरच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन (प्रॅक्टिकल अप्रोच) ठेवून सातत्याने ''लेखन'' सराव फार महत्त्वाचा आहे. या बाबींचे तंतोतंत पालन करीत मार्गक्रमण केल्याने सलग तीन परीक्षेत यश मिळाले. पहिल्या प्रयत्नात ५०३ रँक, दुसऱ्या प्रयत्नात ३६१ वी रँक तर चौथ्या प्रयत्नात १५१ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे पंढरपूरचे अभयसिंह देशमुख सांगतात. महाराष्ट्र कॅडरमध्येच त्यांची निवड झाली आहे. सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण संस्थेत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात पदवी मिळवलेले अभयसिंह देशमुख हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे. आई-वडील दोघेही शेतकरी. त्यांनी हवे ते करण्यासाठी पहिल्यापासून स्वातंत्र्य आणि भक्कम पाठिंबा दिला. २०१५ ला सिविल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरुवातीला एक वर्ष एल अँड टी कंपनीत काम केले. त्यानंतर मित्रांचा सल्ला, मार्गदर्शनात यूपीएससीची तयारी सुरू केली.

ग्रुप स्टडीमुळे ८ जण झाले आयएएस, आयपीएस

अभयसिंह सांगतात, आम्ही ८ मित्रांनी मिळून पुण्यात एक फ्लॅट घेतला होता. बिल्डिंगजवळच अभ्यासिका आणि खानावळ होती. त्यामुळे अनावश्यक वाया जाणारा वेळ वाचायचा. आम्ही सर्व मित्र स्वयं अभ्यासाबरोबरच ग्रुप स्टडी करायचो. सातत्याने चालू-घडामोडी, पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सी-सॅट, जनरल स्टडीज तसेच वैकल्पिक विषय आदींची तयारी ग्रुप स्टडीमधून करायचो. त्यामुळे वेळेचे बचत होऊन अभ्यासाची गुणवत्ता वाढत होती. त्याचा आमच्या संपूर्ण ग्रुपला फायदा झाला. ग्रुपमधील ५ जणांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तर ३ जणांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली.

६० प्रश्नपत्रिका सोडवल्या

यूपीएससीची मुख्य परीक्षा ही ‘ज्ञाना’पेक्षा ‘लेखन’ सरावाची परीक्षा अधिक आहे. माझा वैकल्पिक विषय मानववंश शास्त्र होता. मी वैकल्पिक आणि सामान्य अध्ययनाबरोबरच निबंध असे जवळपास ६० प्रश्नपत्रिका सोडवल्या. तसेच प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर ते वरिष्ठांकडून तपासून घ्यायचो. नंतर रात्री रूमवर मित्रांबरोबर प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर चर्चा करायचो. त्यामुळे याचा आम्हाला अंतिम परीक्षेत खूप फायदा झाल्याचे अभयसिंह देशमुख सांगतात.

लहान वयात विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका; पदवी पातळीवर अभ्यास सुरू करा

आपल्याकडे शालेय किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक पातळीवर विनाकारण ''बाऊ'' केला जातो. मला आजही अनेक पालकांचे फोन येतात. ते म्हणतात आमचा मुलगा अथवा मुलगी आता ८ वी, ९ वीत किंवा १२ वीत आहे, तर यूपीएससीची तयारी कशी करायची. मी त्या सर्वांना हेच सांगतो, की एवढ्या लवकर या परीक्षेची तयारी करायची गरज नाही. सध्या ते जे शालेय स्तरावर आहेत ते व्यवस्थित करू द्या. विनाकारण ''बाऊ'' केल्यास लहान वयात विद्यार्थी दबाव घेतात. त्यामुळे त्यांच्या शालेय पातळीवरच्या परीक्षेवर वाईट परिणाम होतो. मी स्वतः सिविल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तसेच पूर्ण फोकसने अभ्यास केल्याने मला प्रत्येक परीक्षेत यश मिळत गेले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विनाकारण लहान वयात दबाव टाकू नये, असे अभयसिंह देशमुख सांगतात.

फोटो : अभयसिंह देशमुख (आयपीएस)

(एज्यू कनेक्ट पानासाठी मुलाखत)