शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:10 IST

अभिजित कोळपे इन्ट्रो पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) ...

अभिजित कोळपे

इन्ट्रो

पहिल्या प्रयत्नापासून वरिष्ठ मित्र आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार लेखनाचा सातत्याने सराव केला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रत्येक प्रयत्नात त्यामुळे यश मिळाले. या परीक्षेत ''ज्ञाना''बरोबरच वस्तुनिष्ठ दृष्टिकोन (प्रॅक्टिकल अप्रोच) ठेवून सातत्याने ''लेखन'' सराव फार महत्त्वाचा आहे. या बाबींचे तंतोतंत पालन करीत मार्गक्रमण केल्याने सलग तीन परीक्षेत यश मिळाले. पहिल्या प्रयत्नात ५०३ रँक, दुसऱ्या प्रयत्नात ३६१ वी रँक तर चौथ्या प्रयत्नात १५१ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे पंढरपूरचे अभयसिंह देशमुख सांगतात. महाराष्ट्र कॅडरमध्येच त्यांची निवड झाली आहे. सध्या हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण संस्थेत त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयात पदवी मिळवलेले अभयसिंह देशमुख हे मूळचे पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे. आई-वडील दोघेही शेतकरी. त्यांनी हवे ते करण्यासाठी पहिल्यापासून स्वातंत्र्य आणि भक्कम पाठिंबा दिला. २०१५ ला सिविल इंजिनिअरिंग केल्यानंतर सुरुवातीला एक वर्ष एल अँड टी कंपनीत काम केले. त्यानंतर मित्रांचा सल्ला, मार्गदर्शनात यूपीएससीची तयारी सुरू केली.

ग्रुप स्टडीमुळे ८ जण झाले आयएएस, आयपीएस

अभयसिंह सांगतात, आम्ही ८ मित्रांनी मिळून पुण्यात एक फ्लॅट घेतला होता. बिल्डिंगजवळच अभ्यासिका आणि खानावळ होती. त्यामुळे अनावश्यक वाया जाणारा वेळ वाचायचा. आम्ही सर्व मित्र स्वयं अभ्यासाबरोबरच ग्रुप स्टडी करायचो. सातत्याने चालू-घडामोडी, पूर्व आणि मुख्य परीक्षेतील सी-सॅट, जनरल स्टडीज तसेच वैकल्पिक विषय आदींची तयारी ग्रुप स्टडीमधून करायचो. त्यामुळे वेळेचे बचत होऊन अभ्यासाची गुणवत्ता वाढत होती. त्याचा आमच्या संपूर्ण ग्रुपला फायदा झाला. ग्रुपमधील ५ जणांची भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तर ३ जणांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली.

६० प्रश्नपत्रिका सोडवल्या

यूपीएससीची मुख्य परीक्षा ही ‘ज्ञाना’पेक्षा ‘लेखन’ सरावाची परीक्षा अधिक आहे. माझा वैकल्पिक विषय मानववंश शास्त्र होता. मी वैकल्पिक आणि सामान्य अध्ययनाबरोबरच निबंध असे जवळपास ६० प्रश्नपत्रिका सोडवल्या. तसेच प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर ते वरिष्ठांकडून तपासून घ्यायचो. नंतर रात्री रूमवर मित्रांबरोबर प्रत्येक पेपर सोडवल्यानंतर चर्चा करायचो. त्यामुळे याचा आम्हाला अंतिम परीक्षेत खूप फायदा झाल्याचे अभयसिंह देशमुख सांगतात.

लहान वयात विद्यार्थ्यांवर दबाव टाकू नका; पदवी पातळीवर अभ्यास सुरू करा

आपल्याकडे शालेय किंवा स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक पातळीवर विनाकारण ''बाऊ'' केला जातो. मला आजही अनेक पालकांचे फोन येतात. ते म्हणतात आमचा मुलगा अथवा मुलगी आता ८ वी, ९ वीत किंवा १२ वीत आहे, तर यूपीएससीची तयारी कशी करायची. मी त्या सर्वांना हेच सांगतो, की एवढ्या लवकर या परीक्षेची तयारी करायची गरज नाही. सध्या ते जे शालेय स्तरावर आहेत ते व्यवस्थित करू द्या. विनाकारण ''बाऊ'' केल्यास लहान वयात विद्यार्थी दबाव घेतात. त्यामुळे त्यांच्या शालेय पातळीवरच्या परीक्षेवर वाईट परिणाम होतो. मी स्वतः सिविल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. तसेच पूर्ण फोकसने अभ्यास केल्याने मला प्रत्येक परीक्षेत यश मिळत गेले. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विनाकारण लहान वयात दबाव टाकू नये, असे अभयसिंह देशमुख सांगतात.

फोटो : अभयसिंह देशमुख (आयपीएस)

(एज्यू कनेक्ट पानासाठी मुलाखत)