शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा ही आता वस्तुस्थितीवर आधारितपेक्षा (फॅक्ट) स्वत:च्या ...

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा ही आता वस्तुस्थितीवर आधारितपेक्षा (फॅक्ट) स्वत:च्या मतावर आधारित (ओपिनियन बेस) जास्त झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विविध विषयांबद्दल स्वत:चे मत असणे फार गरजेचे झाले आहे. पूर्व, मुख्य परीक्षो असो की थेट मुलाखत. या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याचे मत विचारात घेतले जात असून, त्याला जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे एकएकट्याने अभ्यास करू नका. गटागटांत अभ्यास करा. तुम्हाला प्रत्येक विषयावर इतरांचीही मतं कळतात. त्यातून तुम्हाला स्वत:मध्ये बदल करता येतात. एकट्याने अभ्यास करताना तुमची दिशा भरकटू शकते. किमान चार-पाच जणांचा ग्रुप तयार करून एकत्रित अभ्यास करणे फार आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला त्रिपुरा राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव किरण गित्ते हे विद्यार्थ्यांना देतात.

किरण गित्ते हे मूळचे बीड जिल्ह्यातील परळीजवळील बेलांबा गावचे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले आहे. पुण्यात टेल्को कंपनीत नोकरी करतच त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी), तर नंतर यूपीएससीची परीक्षा दिली. दोन्हीही परीक्षेत त्यांना यश मिळाले आहे. एमपीएससीमधून त्यांना तहसीलदार हे पद मिळाले होते. मात्र, त्यांना ‘आयएएस’च व्हायचे असल्याने त्यांनी नोकरी करतच वेळेचे नियोजन करत यूपीएससींची तयारी सुरू ठेवली. भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) त्यांची २००५ साली निवड झाली आहे. महाराष्ट्रात त्यांनी प्रतिनियुक्तीवर पाच वर्षे काम केले आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षे, तर पुण्यात पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

स्पर्धापरीक्षेचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक स्तरावर स्पर्धा असतेच. प्रत्येक विषयावर अनेक संदर्भ पुस्तके आहेत. यूपीएससी परीक्षेचा पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. पदवी शिक्षणानंतर यूपीएससीची तयारी करणे अवघड, कठीण जाऊ शकते. त्यामुळे उच्च महाविद्यालयीन पदवी शिक्षण घेत असतानाच साधरण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षांपासून यूपीएससीची तयारी सुरू करणे गरजेचे आहे.

यूपीएससीची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीला बदललेला संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यावा. त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करावी. अनेक जणांना रोज अभ्यास किती तास करायचा, हा प्रश्न पडलेला असतो. साधारण रोज आठ ते दहा तास अभ्यास केला तरी पुरेसा आहे. पण तो करताना मन लावून गुणात्मक (क्वाॅलिटी) अभ्यास व्हायला हवा. कोणत्याही विषयाची मूळ पुस्तके (टेक्स्ट बुक) वाचायला हवी. आजकाल अनेक विद्यार्थी गाईड किंवा इतरांच्या नोट्सचा वापर करतात. मात्र, गाईडच्या वापराऐवजी एनसीआरटी दिल्ली बोर्डाची (NCERT) पाचवी ते बारावी इयत्तेपर्यंतची मूळ पुस्तके वाचणे फार आवश्यक आहे. प्रत्येक विषयाचे अथवा वर्तमानपत्राचे वाचन करताना स्वत:च्या नोट्स काढणे फार गरजेचे आहे.

यूपीएससीची तयारी करताना पूर्व, मुख्य अथवा मुलाखतीच्या तीनही टप्प्यांवर प्रत्येकाने क्लास लावलाच पाहिजे असे काही नाही. तुम्ही वैयक्तिक तयारी देखील करू शकता. मात्र, त्यासाठी त्या-त्या विषयांच्या शिक्षक, तज्ज्ञ अथवा यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांकडून ठराविक वेळेनंतर किंवा अडचण आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

फोटो : किरण गित्ते