शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:07 IST

फोकस पद्धतीने स्वयंअध्ययन केल्यास पहिल्या प्रयत्नातही मिळते यश : अक्षय अग्रवाल अभिजित कोळपे योग्य मार्गदर्शन, संदर्भ साहित्याचा वापर आणि ...

फोकस पद्धतीने स्वयंअध्ययन केल्यास पहिल्या प्रयत्नातही मिळते यश : अक्षय अग्रवाल

अभिजित कोळपे

योग्य मार्गदर्शन, संदर्भ साहित्याचा वापर आणि नियोजन करून अभ्यास केल्यास तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पहिल्या प्रयत्नातदेखील यशस्वी होऊ शकता. अगदी कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासशिवाय हे यश मिळवू शकता, हे धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे अक्षय अग्रवाल यांनी दाखवून दिले आहे. घरीच राहून स्वयंअध्ययन करत त्यांनी २०१८ साली पहिल्या प्रयत्नात संपूर्ण देशात ४३ वी रँक मिळवत जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. ओडिशातील केंद्रपाडा येथे एक वर्ष सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर सध्या मसुरी येथे आयएएस फेज-२ चे प्रशिक्षण ते घेत आहेत.

मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अक्षय अग्रवाल यांनी पुण्यातून बी. टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे. तसेच सिंगापूर येथून अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी केले आहे. वडील व्यावसायिक तर आई गृहिणी आहे. दोघांनीही उच्च शिक्षण आणि यूपीएससीच्या तयारीसाठी पहिल्यापासून प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्याचे अक्षय अग्रवाल सांगतात.

--------

तीव्र गतीने लिहिण्याचा सराव हवा

मी स्वतः कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. मात्र, तुम्हाला गरज असेल तर कोचिंग क्लासची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके मार्गदर्शनासाठी वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासावेळी सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळावा. दिवसात ६-८ तास एक वर्षभर नियमितपणे अभ्यास करावा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुस्तके वाचल्यावर प्रश्न सोडवण्याचा वारंवार सराव करावा. तीव्र गतीने पेपर सोडविण्याचा सातत्याने सराव गरजेचा आहे. तरच अंतिम परीक्षेत याचा फायदा होतो.

-----

पूर्व, मुख्य अन् मुलाखतीची तयारी एकत्रित करा

यूपीएससीत पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी एकत्रित करावी लागते. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेचा ७० टक्के अभ्यासक्रम जवळजवळ सारखाच आहे. त्यामुळे सुरुवातीला ५-६ महिने दोन्ही परीक्षेचा सोबत अभ्यास करावा. तसेच पूर्वपरीक्षा संपल्यावर लगेच मुख्य परीक्षेवर फोकस करावा. मुख्य परीक्षेच्या आधी तीन महिने प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा.

-------

वैकल्पिक विषय विचारपूर्वक निवडा

मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वैकल्पिक विषय विचारपूर्वक निवडावा. परीक्षेत एकही प्रश्न रिकामा राहणार नाही, याची खात्री करावी. मुलाखतीसाठी डिटेल अप्लिकेशन फॉर्म आणि वैकल्पिक विषय पुन्हा तयार करून जावे. नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

फोटो : अक्षय अग्रवाल