शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST

अभिजित कोळपे इन्ट्रो सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत अपयशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मागील काही वर्षांतील विविध विषयांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हे ...

अभिजित कोळपे

इन्ट्रो

सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत अपयशानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मागील काही वर्षांतील विविध विषयांच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न हे जास्त करून शासनाच्या अधिकृत संदर्भ साहित्यातून विचारल्याचे लक्षात आले. मग त्यानुसार नियोजन केले. मुख्यतः National Council of Educational Research and Training अर्थात NCERT च्या दिल्ली बोर्डाच्या पुस्तकातून अभ्यासाला सुरुवात केली. आधीच्या दोन प्रयत्नात भटकलेला फोकस पूर्णतः योग्य दिशेने सुरू झाला. तिसऱ्या प्रयत्नात त्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षा पार करत संपूर्ण देशात ३७६ वी रँक आली. भारतीय आयकर विभागात (आयआरएस) निवड झाली. मात्र पुढे अभ्यास सुरू ठेवला. त्यामुळे २०१५ साली चौथ्या प्रयत्नात १२५ वी रँक प्राप्त झाल्याने भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे मूळच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या भाग्यश्री बाबूराव नवटके सांगतात. सध्या त्या पुण्यातील सायबर विभागात पोलीस उपायुक्त या पदावर कार्यरत आहेत.

बाजारातील भारंभार कोणत्याही लेखकांची पुस्तके घेण्याऐवजी खात्रीशीर आणि अधिकृत संदर्भ साहित्य यूपीएससीच्या परीक्षेत वापरले तर हमखास यश मिळते, असे भाग्यश्री नवटके सांगतात. मी स्वतः तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात हे जाणीवपूर्वक केले. कारण अनेक प्रश्नपत्रिकांची तुलना केल्यानंतर यूपीएससी कोणत्या पुस्तकांचा संदर्भ घेते हे लक्षात आले. विद्यार्थ्यांनी या गोष्टींची तुलना केल्यास त्यांना यूपीएससीची परीक्षा आणखी सोपी होईल. त्यामुळे योग्य आणि अधिकृत संदर्भ फार महत्त्वाचे असतात.

---

* वैविध्यपूर्ण प्रश्नांचा सराव गरजेचा

यूपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत विशेषतः इतिहास, भूगोल आणि सामान्य अध्ययन या विषयांच्या पेपरचा सराव जास्तीत जास्त केल्यास फायदा होतो.

१) पूर्व परीक्षा : या परीक्षेत मुख्यतः सातत्याने गणित सोडवण्याचा सराव करणे, Reasioning Ability, Mental Ability तुलनात्मकरीत्या सोडवणे. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा जास्तीचा कालावधी देऊन सराव करणे आवश्यक आहे.

२) मुख्य परीक्षा : वैकल्पिकचे दोन आणि सामान्य अध्ययनचे चार पेपर असे सहा पेपर सोडवताना प्रश्न कितीही साधा असला तरी. तो समजून घेत तो सोडवावा. कारण बऱ्याच वेळा प्रश्न साधा जरी वाटत असला तरी तो मन विचलित करणारा असतो. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे शासनाच्या अधिकृत संदर्भ साहित्य म्हणजे Economic Survey, NCERT Books, योजना, कुरुक्षेत्र मासिके, गॅझेटचा वापर करणे, भूगोल विषयासाठी नकाशे, डायग्रामचा सराव करणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयाचे वाचन करताना नोटस काढल्याने अंतिम परीक्षेपूर्वी सरावासाठी अत्यंत उपयुक्त असे ते संदर्भ साहित्य असते.

३) मुलाखत : मुलाखतीला जाताना विद्यार्थ्यांनी आपला पेहराव व्यवस्थित नीटनेटका ठेवावा. मुलाखत घेणाऱ्या पॅनलशी संवाद साधताना कोणताही न्यूनगंड न ठेवता स्पष्ट आणि समोरच्याला ऐकू जाईल, अशा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे. साधारणतः १७-१८ प्रश्नांत काही प्रश्नांची उत्तरे नाही आली तरी चालतात, पण उगीच खोटी किंवा थातुरमातुर उत्तरे देऊ नये. कारण तुम्ही बोलताना पॅनलचे इतर सदस्य हे तुमचे हावभाव, देहबोली तपासात असतात. त्यावरून तुमच्या आत्मविश्वासाचा त्यांना अंदाज येतो.

फोटो : भाग्यश्री नवटके