शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्मार्ट सिटीत वाहतूक सायडिंगला

By admin | Updated: September 23, 2015 03:45 IST

मोठ्या शहरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटीबरोबरच अटल मिशन शहरी परिवर्तन आणि पुनरुज्जीवन (अमृत मिशन) योजना जाहीर केली आहे

पुणे : मोठ्या शहरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटीबरोबरच अटल मिशन शहरी परिवर्तन आणि पुनरुज्जीवन (अमृत मिशन) योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात केंद्राकडून पाणीपुरवठा आणि मलनि:सारण प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे शहर स्मार्ट होताना, तब्बल ३७ टक्के पुणेकरांनी प्राधान्याने दिलेली वाहतूक समस्या साईड ट्रॅकवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मोठ्या शहरांच्या विकासासाठी तत्कालीन आघाडी सरकारने सुरू केलेली जेएनएनयूआरएम योजना भाजपा सरकारने केंद्रात सत्तेत आल्यानंतर बंद केली. या योजनेऐवजी अमृत मिशन योजना आणली. त्यात पाणीपुरवठा, मलनि:सारण, मैला व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, उद्याने यांच्या सेवासुविधांमध्ये वाढ करण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी केंद्राने मानांकने निश्चित केली आहेत. त्या मानांकनामध्ये बसणाऱ्या शहरांना या योजनेंतर्गत सेवासुविधांच्या सुधारणांसाठी निधी उपलब्ध होणार आहे. जेएनएनयूआरएम योजनेत पालिकेला सर्वाधिक निधी वाहतूक सुधारणांसाठी मिळाला होता. जेएनएनयूआरएममध्ये संबंधित शहराची प्रमुख समस्या लक्षात घेऊन त्यानुसार प्रकल्प मागविले जात होते. मात्र, आता ‘अमृत’मध्ये ही जबाबदारी संबंधित शहरावर न ठेवता प्राधान्यक्रम ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार, राज्यशासनाने पाणीपुरवठा आणि मलनि:सारण प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे.राज्य शासनाने अमृत योजनेसाठी शहरांच्या आवश्यकतेऐवजी शहरांमध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या पाणी आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पुणे शहरात वाहतूक प्रमुख समस्या असली, तरी त्यासाठी पुरेसा निधी मिळण्यास महापालिकेला आणखी वाट पाहावी लागणार आहे. ‘अमृत’मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक शहराच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. मात्र, सर्व शहरांसाठी एका वेळी एकच सुविधा देण्याचा निकष असल्याने तूर्तास तरी पुण्याला वाहतूक समस्या सोडविण्यासाठी निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.महापालिका प्रशासनाने शहराचा पाणीपुरवठा आणि मलनि:सारण सुविधा यांच्या सद्य:स्थितीचा अहवाल (स्लिप) राज्य शासनाकडे पाठविला आहे. या अहवालांतर्गत शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रकल्पासाठी ९३५ कोटी, तर मलनि:सारणासाठी ४२३ कोटी रुपये असा तब्बल १ हजार ३५८ कोटींचा आराखडा सादर करण्यात आला आहे. मलनि:सारण सुविधांच्या सद्य:स्थितीचा आराखडा सादर करण्यात आला आहे.मलनि:सारणाच्या सुधारणांसाठी स्लिपमध्ये महापालिकेने ४२३ कोटींच्या प्रकल्पांचा आराखडा दिला आहे. त्यात प्रामुख्याने शहरातील ज्या भागात मलवाहिन्या नाहीत त्या ठिकाणी मलवाहिन्या टाकण्यासाठी १८५ कोटींचा प्रकल्प, तर सांडपाणी व्यवस्थापन २३८ कोटी १३ लाख अशा ४२३ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्याचा समावेश आहे.